शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
3
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
4
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
5
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
6
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
7
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
8
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
9
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
10
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
11
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
12
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
13
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
14
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
15
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
16
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
18
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
19
आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
20
अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...

प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांचा पालघर मार्च जिल्हाधिका-यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 03:32 IST

निवड श्रेणी व वरिष्ठ वेतन श्रेणी बाबत काढण्यात आलेला अन्यायकारक शासन निर्णय रद्द करणे, शिक्षकांना दिलेली आॅनलाइन व अशैक्षणिक कामे बंद करणे आदी प्रलंबित मागण्यासाठी शुक्रवारी पालघर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वा खाली विविध तेरा संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता.

पालघर : निवड श्रेणी व वरिष्ठ वेतन श्रेणी बाबत काढण्यात आलेला अन्यायकारक शासन निर्णय रद्द करणे, शिक्षकांना दिलेली आॅनलाइन व अशैक्षणिक कामे बंद करणे आदी प्रलंबित मागण्यासाठी शुक्रवारी पालघर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वा खाली विविध तेरा संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता.शिक्षकांची संकल्पना अलीकडच्या काळात बदलत चालली असून अध्यापन व विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास व त्यांच्या गुणवत्ता वाढीस लावण्याच्या त्याच्या मूळ हेतू पासून त्यांना पनरावृत्ती केले जात आहे. त्यांच्यावर आॅनलाइन कामे, विविध दिन, अभियाने साजरे करणे, नाना प्रकारची अशैक्षणिक उपक्र मे राबविणे, त्यांची फोटोसह अहवाल तयार करणे ही कामे शिक्षण विभागा कडून रात्री-बेरात्री व्हाट्सअँप वर येत असल्याने एकाबाजूला अशैक्षणिक कामांचा भडिमार तर दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ते बाबतचा दबाव ह्यामुळे शिक्षक वर्ग प्रचंड मानिसक दबावाखाली वावरत होता.ह्यावेळी २७ फेब्रुवारीचा महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास विभागाने काढलेल्या बदली शासन निर्णयात आवश्यक त्या सुधारणा व दुरु स्त्या करून इतर शासकीय कर्मचाºया प्रमाणे नोव्हेंबर २०१७ मध्ये बदल्या न करता त्या मे २०१८ मध्ये करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, डिसीपीएस पेन्शन योजना बंद करून जुनीच पेन्शन योजना लागू करावी व करण्यात आलेली कपातीचा हिशेब मिळावा आदी मागणी साठी शुक्रवारी प्राथमिक शिक्षक संघ, आदिवासी शिक्षक संघ,स्वाभिमान शिक्षक संघ, महाराष्ट्र शिक्षक भरागी संघ,पदवीधर शिक्षक संघ आदी संघटनांचे समन्वय समिती सदस्य प्रदीप पाटील, रवींद्र संखे,मनीष पाटील, अंकलेश्वर पाटील,सुभाष सोंडे, जितेंद्र वड आदींसह शेकडो शिक्षकांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्च्या चे आयोजन केले होते. जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे ह्यांनी निवेदन स्वीकारले.गुणवत्तेचा दर्जा घसरलाअतिरिक्त कामाचे अनेक दुष्परिणाम ग्रामीण भागातील शाळातील विद्यार्थ्यांना जाणवू लागले असून गुणवत्तेचा दर्जा घसरला आहे.त्यामुळे शिक्षकांना देण्यात येणारी सर्व अशैक्षणकि व आॅनलाइन कामे बंद करून केंद्र शाळा स्तरावर सर्व प्रकारच्या आॅनलाइन कामासाठी संगणक डाटा आॅपरेटर ची नेमणूक करण्याची मागणी मोर्चेकºयांनी आज केली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार