शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' माशांना वाचवण्यासाठी बांगलादेशनं उतरवलं सैन्य दल; बंगालच्या खाडीत पाठवल्या १७ युद्धनौका
2
‘कोस्टल’वर थेट १४० चा हायस्पीड: ...तर मग गुन्हाच होईल दाखल; वाहतूक पोलिसांकडून दिवसाला ५०० ई-चालानची कारवाई
3
FD करुन तुम्ही कधीही श्रीमंत होणार नाही? CA ने दिला इशारा, म्हणाले खऱ्या कमाईसाठी गुंतवणूक धोरण बदला
4
Video - अरे बापरे! ऑर्डर केला iPhone 16; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत अजब भानगड
5
Tata Capital IPO: प्रतीक्षा संपली! तुमच्या खिशात आहेत का १४,९९६ रुपये? तर बनू शकता टाटांच्या कंपनीचे प्रॉफिट पार्टनर
6
इवलीशी मुंबई झाली महाकाय ! त्या त्या भागानुसार प्रति स्क्वेअर फुटाचा दर काय... पहाल तर...
7
"प्यार मे सौदेबाजी...", अरबाज खान दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर मलायका अरोराची क्रिप्टिक पोस्ट
8
सोनम वांगचुक यांच्या अटकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, पत्नीने दाखल केली याचिका
9
Kantara Chapter 1: साऊथने पुन्हा एकदा करून दाखवलं! फक्त ४ दिवसांत 'कांतारा'ने कमावले ३०० कोटी
10
पतीच्या मृत्यूनंतर पुन्हा जोडीदाराची इच्छा पडली महागात; मॅट्रिमोनियल साइटवरून शिक्षिकेला कोट्यवधींचा गंडा!
11
Post Office Scheme: दर महिन्याला होईल ₹६१,००० ची कमाई; जबरदस्त आहे ही सरकारी स्कीम, कोट्यधीशही बनवेल
12
Jaipur Hospital Fire: जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
13
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २४,९१० च्या वर; सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी
14
Jaipur Hospital Fire: '२० मिनिटांपूर्वी आगीची माहिती दिली, पण डॉक्टर पळून गेले'; SMS रुग्णालयातील प्रत्यक्षदर्शींचा धक्कादायक दावा
15
Video:...तर भारताच्या 'या' खेळाडूला मारायचंय; पाकिस्तानी स्पिनर अबरार अहमदचं विधान चर्चेत
16
पती अन् दोन मुलांना सोडून शेजाऱ्यासोबत सुरू होतं अफेअर; 'ओयो'मध्ये प्रियकर गर्लफ्रेंडसोबत दिसला अन्...
17
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
18
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
19
उत्खनन क्षेत्रात छत्तीसगडची ऐतिहासिक झेप; खनिज महसूल २५ वर्षांत ३४ पटीने वाढला!
20
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा

ग्रामस्थच करतात यंत्रणा दुरुस्त

By admin | Updated: May 12, 2017 01:24 IST

पश्चिम किनारपट्टीवर वसलेल्या पंचवीस ते तीस गावांतील ग्रामस्थ वीज महावितरणाचा भोंगळ कारभारामुळे कमालीचे वैतागले

शौकत शेख । लोकमत न्यूज नेटवर्कडहाणू : पश्चिम किनारपट्टीवर वसलेल्या पंचवीस ते तीस गावांतील ग्रामस्थ वीज महावितरणाचा भोंगळ कारभारामुळे कमालीचे वैतागले असून दुप्पट तिप्पट वीज बिल भरून ही एक तासही वीजपुरवठा सुरळीत राहत नाही. वारंवार तांत्रिक बिघाड होऊन फ्यूज, डिपी उडतातात. तक्रारी करूनही ही वायरमन गाव, पाडयावर येत नसल्याने दिवसा, रात्री-बेरात्री ग्रामस्थाना जीव धोक्यात घालून फ्यूज बदलून वीज पुरवठा सुरळीत करावा लागतो आहे. विशेष म्हणजे फ्यूज, डिपीसाठी लागणाऱ्या तांब्याच्या तारा येथील ग्रामस्थ वर्गणी करून खरेदी करीत असल्याने या परिसरातील नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे. डहाणूच्या बंदरपट्टी भागांतील वीज यंत्रणा पन्नास वर्षापूर्वीची असून, सडलेले पोल, लोंबकळणाऱ्या विद्युत तारा, कमकुवत ट्रान्सफार्मर यामुळे अगोदरच गाव, खेडोपाडयातील नागरिकांत त्रस्त झाले आहेत. त्यात भर म्हणून विजेच्या अव्वाचे सव्वा येणाऱ्या वीज बिलामुळे त्यात भर पडली आहे. महावितरणाच्या या कारभाराविरोधात अनेक वेळा तक्रार, मोर्चे, आंदोलन करूनही गेल्या पाच वर्षात कोणताही फरक पडलेला नाही. या परिसरात वीज पूरवठा सुरळीत राहावा यासाठी वीज महाविरण कंपनी कडून कोणतीच उपाय योजना केली जात नसल्याचे वीजेअभावी येथील हजारो लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. दिवसातून होणारे भारनियमनामुळे शेती, डायमेकिंग व्यवसाय तसेच घरगुती कामामध्ये अडथळे निर्माण होतात. तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील चिंचणी, वाढवण, वशेर, तडियाळ, गुगवाडा, बाडापोक्षरण, धा. डहाणू इत्यादी तीस ते पस्तीस गावात सुमारे पंचवीस हजार कुशल, अकुशल तरूण डायमेकींगचा व्यवसाय करीत असतात. त्यांना वीजेवरच अवलंबुन रहावे लागते. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून दिवसांतून पंधरा ते वीस वेळा वीज पुरवठा खंडीत होत आहे. दोन, तीन तास वीजपुरवठा खंडीत होणे ही तर नित्याचीच बाब झाल्याने येथील शेतकरी, डायमेकर्स हवालदील झाले आहेत. महावितरणने याची वेळीच दखल घेऊन सुधारणा न केल्यास जनतेचा तीव्र प्रक्षोभ होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या गंभीर समस्येकडे एकही लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही. मध्यंतरी उर्जामंत्र्यांनी घेतलेली बैठकही निष्फळ ठरली आहे.