शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

पाणीटंचाई कायमची दूर करा

By admin | Updated: February 5, 2017 02:21 IST

सुमारे १ लाख १४ हजार लोकसंख्या असलेल्या या तालुक्याची पिण्याची पाण्याची समस्या दिवसेंदिवस उग्र स्वरुप धारण करीत आहे़ तिच्यावर टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी तात्पुरती

विक्रमगड : सुमारे १ लाख १४ हजार लोकसंख्या असलेल्या या तालुक्याची पिण्याची पाण्याची समस्या दिवसेंदिवस उग्र स्वरुप धारण करीत आहे़ तिच्यावर टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी तात्पुरती मलमपट्टी करण्याऐवजी ती कायमस्वरुपी दूर केली जावी, त्यासाठी लागणारा निधी आमदार, खासदार यांनी आपल्या निधीतून द्यावा अशी मागणी देखील जनता करीत आहे. तालुक्यातील मागास गाव चिंचपाडा येथे तर गेल्या अनेक वर्षांपासून नळ योजना राबविलेली नाही़ त्यातच जलस्वराज्य प्रकल्पातील विहिरींच्या बांधकामातदेखील अपहार झाल्याने त्या अर्धवट आहेत. तर पूर्ण झालेल्या अनेक विहिरी कायमस्वरूपी जलस्त्रोतांचा शोध न घेताच खोदून ठेवल्याने त्यातील पाण्याने तळ गाठायला सुरुवात केली आहे़ या पार्श्वभूमीवर श्रमजीवीचे तालुका सचिव कैलास तुंबडा यांनी लोकमतला सांगितले की प्रशासनाकडून गावांना टँकरने पाणी पुरविले जाते. परंतु ही परिस्थिती अजून किती काळ राहणार. ती बदलण्यासाठी येथे नविन धरण उभारणे आवश्यक आहे. कायमस्वरूनी जलस्त्रोतांचा शोध घेऊन मोठया पाणी योजना राबविणे, ज्या ग्रामपंचायतीच्या नळयोजना काही कारणास्तव बंद आहेत त्यातील त्रुटी दुर करुन त्या चालू करणे. बंधारे, वनराई बंधारे,व असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन व संवर्धन करणे आवश्यक आहे़ वर्षानुवर्षे नुसता टँकरने पाणीपुरवठा करुन टंचाईवर कितपत मात करणाऱ? अंधेरी, चिंचपाडा येथील रहिवासी खडड्यांतील माती मिश्रीत व नदीतील, बंधा-यातील तळाचे पाणी वापरून आपली तहान भागवतात़ त्यासाठी एकतर पाण्याचे हंडे डोक्यावर आणावे लागतात किंवा कावडी पाण्यासाठी, ४ ते ५ मैल बैलगाडीने, टॅकरने, रिक्षाने पाणी आणण्यासाठी पैसेही मोजावे लागतात हे दृश्य में महिन्यांत जास्त प्रमाणात दिसते़ जलस्वराज्य प्रकल्पाअंतर्गत विहिरी मंजूर केल्या व राबविल्या देखील परंतु तेही असमाधानकारक असल्याने विक्रमगड तालुक्यातील पाणी टंचाईवर कायम उपाया योजना करण्याची गरज आहे़ त्यासाठी येथील आमदार, खासदार व मंत्री महोदयांनी आपल्या निधीतून योजनांची दुरुस्ती, वीजबीले भरणे, ही कामे केली तरी पाणीटंचाईची झळ कमी होईल.विक्रमगड नगरपंचायतीच्या नविन पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावाला पालकमंत्री विष्णू सवरा यांनी मंजुरी मिळवावी व त्याची अंमलबजावणी तातडीने करून दाखवावी अशी विक्रमगड वासियांकडून मागणी होत आहे. जलयुक्त शिवार सारखी योजना या तालुक्यात कशी आणि किती राबविली गेली? तिचा काय लाभ झाला, ही माहितीही जनता विचारते आहे.़ (वार्ताहर)विक्रमगड तालुक्यातील पाणी पुरवठा विभागातील सर्वच पदे रिक्त आहेत़ माझ्याकडे अ‍ॅडीशनल चार्ज असल्याने मला जव्हार, मोखाडा व विक्रमगड तालुक्यांचा कार्यभार सांभाळावा लागतो आहे. ़तरीही मी अर्धवट, बंद, नादुरूस्त पाणी योजनांचा आढावा घेऊन त्याची कामे मार्गी लावण्याकरीता प्रयत्न करीत आहे़ तसेच संभाव्य पाणीटंचाई निवारण आराखडा तयार करण्यात आला असून टंचाईग्रस्त गाव-पाडयाकरीता १० टँकरची मागणी केली आहे़ - एस बी कदम, पाणीपुरवठा अभियंता