शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

पर्यावरण हानीबद्दल उद्योग-सीईटीपीकडून १६० कोटी वसूल करा- सर्वोच्च न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 00:32 IST

उद्योग व सीईटीपीकडून १६० कोटी रुपये वसूल करण्यात यावे, अशी शिफारस राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) नेमलेल्या विशेष समितीने नुकतीच सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालात केली आहे.

पंकज राऊतबोईसर : तारापूर एमआयडीसीतील कारखान्यासह सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र (सीईटीपी) द्वारे परिसराच्या सर्व थरावर पर्यावरणाची झालेली प्रचंड मोठी हानी भरून काढण्यासाठी तारापूर येथील उद्योग व सीईटीपीकडून १६० कोटी रुपये वसूल करण्यात यावे, अशी शिफारस राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) नेमलेल्या विशेष समितीने नुकतीच सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालात केली आहे.तारापूर औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांमधून व नंतर सीईटीपीतून रासायनिक प्रदूषित सांडपाण्यावर पुरेशी प्रक्रिया न करताच ते सांडपाणी नवापूरच्या समुद्रात व नाल्यात अनधिकृतपणे सोडण्यात येत असल्याने त्याचे गंभीर परिणाम किनारपट्टी भागातील मच्छीमार आणि परिसरातील शेत जमिनीवर तसेच नागरिकांच्या आरोग्यावर होतात. याविरोधात पुण्यातील राष्ट्रीय हरित लवादाकडे अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेने २०१६ साली याचिका दाखल करून सातत्याने केलेल्या पाठपुराव्याच्या यशाची पहिली पायरी ठरली आहे.तारापूर एमआयडीसीतील २५ एमएलडी क्षमतेच्या सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या व्यवस्थापनाची जबाबदारी तारापूर एन्व्हायर्न्मेंट प्रोटेक्शन सोसायटी (टीईपीएस) कडे असून सप्टेंबर २०१९ या महिन्यात हरित लवादाने टीईपीएसला नुकसान भरपाईपोटी दहा कोटी रुपयांची दंडात्मक रक्कम भरण्याच्या दिलेल्या आदेशाविरुद्ध टीईपीएसने सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावल्यानंतर एनजीटीने नेमलेल्या समितीच्या वतीने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) वतीने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रक सादर केले होते. तारापूर औद्योगिक क्षेत्राद्वारे झालेल्या समुद्रातील प्रदूषणापोटी ५ कोटी ९४ लाख रुपये व खाडी आणि खाडीलगत असलेल्या खाजण जमिनी व जलकुंभांच्या झालेल्या अवस्थेसाठी ७९ कोटी १० लाख रुपये असे सुमारे ८५ कोटी याबरोबरच विविध प्रकारे पर्यावरणाचे झालेले नुकसान व त्यामध्ये करायच्या सुधारणांसाठी ७५ कोटी रुपये असे १६० कोटी रुपये वसूल करण्याची महत्त्वपूर्ण शिफारस अहवालात करण्यात आली आहे.।अहवालातील ठळक वैशिष्ट्येप्रदूषित रासायनिक सांडपाणी नैसर्गिक नाले व खाडीमार्गे समुद्रात मिसळत असल्यामुळे मत्स्यसंपदेची प्रचंड हानी.समुद्र व समुद्रकिनाऱ्यावरील पारंपरिक मासेमारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाºया मच्छीमारांच्या जीवनावर व मासेमारीवर प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष परिणाम.प्रक्रिया न करताच सोडण्यात येत असलेल्या रासायनिक सांडपाण्यामुळे किनारपट्टी भागात अनेक वेळा मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी. अशा घटनांमुळे नागरिकांसह अल्प उत्पन्न असलेल्यांचे प्रदूषित झालेले अन्न व पाणी तसेच नष्ट झालेली जैवविविधता.दंडाची किमान ८८ हजार तर कमाल दहा कोटी रुपयांपर्यंत वसूल करण्यात येणार असल्याचे अहवालात नमूद केले आहे.