शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
4
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
5
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
7
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
8
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
9
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
10
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
11
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
12
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
13
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
14
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
15
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
16
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
17
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
18
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
19
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
20
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!

बोअरच्या पाण्यावर टोमॅटोचे विक्रमी पीक

By admin | Updated: March 28, 2017 05:12 IST

सिंचनाचे कोणतेही साधन उपलब्ध नसताना वाडा तालुक्यातील देवघर येथील शेतकऱ्यांनी स्वत: कूपनलिका खोदून तिच्या

वसंत भोईर / वाडासिंचनाचे कोणतेही साधन उपलब्ध नसताना वाडा तालुक्यातील देवघर येथील शेतकऱ्यांनी स्वत: कूपनलिका खोदून तिच्या पाण्यावर टॉमेटोचे विक्रमी पीक घेतले आहे. यंदा भावही चांगला असल्याने शेतकरी आनंदात आहेत. टॉमेटेची शेती लाभदायक ठरत असल्याचे येथील शेतकऱ्यांचे म्हणणं आहे. डोंगराच्या कुशीत वसलेले देवघर हे एक खेडेगाव. या गावाच्या आजूबाजूला कोणतीही नदी अथवा मोठा तलाव, कालवा नाही. मात्र येथील शेतकऱ्यांनी कूपनलिका खोदून तिच्या पाण्यावर ते विविध प्रकारची पिके घेत आहेत. भातपिकानंतर येथील शेतकरी टॉमेटेची लाभदायक शेती करीत आहेत. टॉमेटोच्या अलंकार, अभिनव या वाणाचे बियाणे आणून ते स्वत:च रोप तयार करतात व त्याची लागवड करून रोपे उरली तर त्यांची विक्रीसुद्धा करतात. सर्वप्रथम भातपीक काढल्यानंतर शेताची नांगरणी करून वाफे तयार केले जातात. त्यानंतर नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये त्यात त्याची लागवड केली जाते. साधारणपणे ५० ते ६० दिवसांनी फळधारणा होते. त्यानंतर चार दिवसांनी फळे काढणीला येतात. योग्य वेळी फळ तोडणी झाली तर पुढचे फळ व्यवस्थित होते. एका एकरातून १५०० क्रेट टॉमेटे निघतात. त्याचे वजन ५० ते ५५ टन भरते. एका एकराला अंदाजे दीड लाख रु पये खर्च येतो. मात्र जसा बाजारभाव असेल त्या प्रमाणे नफा-तोटा होतो. या वर्षी प्रति क्रेटला ४०० रूपये भाव मिळत असल्याने एकराला चार लाखापर्यंत उत्पन्न मिळेल असा अंदाज शेतकऱ्यांनी वर्तविला आहे. अलंकार या जातीच्या वाणाची लागवड येथील शेतकरी मोठयÞा प्रमाणात करतात. कारण हे फळ मोठे असते व उष्णतेत ते टिकते. साधारणपणे पंधरा दिवसांपर्यत या फळाला काहीही होत नाही. त्यामुळे या वाणाला बाजारात जास्त मागणी आहे. बुधाजी पाटील या शेतकऱ्याने आपल्या चार एकर अशा विस्तीर्ण जागेत टॉमेटे शेती केली आहे. संपूर्ण जागेत ठिबक सिंचन केले असून औषधेही ठिबक सिंचनातून दिली जातात.येथील जमीन टोमॅटोसाठी अत्यंत उपयुक्तया पिकाला फारशी मशागत करावी लागत नाही तसेच ठिबक सिंचनामुळे मजूर कमी लगातात. अशी माहिती बुधाजी पाटील यांनी दिली. येथील जमीन टॉमेटोसाठी पोषक असल्याने रोगाचे प्रमाणही कमी असते असेही त्यांनी सांगितले. दैनंदिन आहारात टॉमेटो हा महत्त्वाचा घटक आहे. उन्हाळ्याच्या दिवसात टॉमेटेला पसंती दिली जाते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून येथील शेतकऱ्यांनी टॉमेटो उत्पादनात गेल्या अनेक वर्षापासून आपला लौकिक कायम राखला आहे. तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती नसल्याने हा माल दलालामार्फत विकला जातो. मुंबई, वाशी, वसई, ठाणे येथील व्यापारी हा माल घेण्यासाठी जागेवर जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी दराने माल विकावा लागतो अशी माहिती युवा शेतकरी नेते प्रफुल्ल पाटील यांनी दिली. तरूणांनी शेतीकडे वळून आधुनिक शेती करण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.