शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बोअरच्या पाण्यावर टोमॅटोचे विक्रमी पीक

By admin | Updated: March 28, 2017 05:12 IST

सिंचनाचे कोणतेही साधन उपलब्ध नसताना वाडा तालुक्यातील देवघर येथील शेतकऱ्यांनी स्वत: कूपनलिका खोदून तिच्या

वसंत भोईर / वाडासिंचनाचे कोणतेही साधन उपलब्ध नसताना वाडा तालुक्यातील देवघर येथील शेतकऱ्यांनी स्वत: कूपनलिका खोदून तिच्या पाण्यावर टॉमेटोचे विक्रमी पीक घेतले आहे. यंदा भावही चांगला असल्याने शेतकरी आनंदात आहेत. टॉमेटेची शेती लाभदायक ठरत असल्याचे येथील शेतकऱ्यांचे म्हणणं आहे. डोंगराच्या कुशीत वसलेले देवघर हे एक खेडेगाव. या गावाच्या आजूबाजूला कोणतीही नदी अथवा मोठा तलाव, कालवा नाही. मात्र येथील शेतकऱ्यांनी कूपनलिका खोदून तिच्या पाण्यावर ते विविध प्रकारची पिके घेत आहेत. भातपिकानंतर येथील शेतकरी टॉमेटेची लाभदायक शेती करीत आहेत. टॉमेटोच्या अलंकार, अभिनव या वाणाचे बियाणे आणून ते स्वत:च रोप तयार करतात व त्याची लागवड करून रोपे उरली तर त्यांची विक्रीसुद्धा करतात. सर्वप्रथम भातपीक काढल्यानंतर शेताची नांगरणी करून वाफे तयार केले जातात. त्यानंतर नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये त्यात त्याची लागवड केली जाते. साधारणपणे ५० ते ६० दिवसांनी फळधारणा होते. त्यानंतर चार दिवसांनी फळे काढणीला येतात. योग्य वेळी फळ तोडणी झाली तर पुढचे फळ व्यवस्थित होते. एका एकरातून १५०० क्रेट टॉमेटे निघतात. त्याचे वजन ५० ते ५५ टन भरते. एका एकराला अंदाजे दीड लाख रु पये खर्च येतो. मात्र जसा बाजारभाव असेल त्या प्रमाणे नफा-तोटा होतो. या वर्षी प्रति क्रेटला ४०० रूपये भाव मिळत असल्याने एकराला चार लाखापर्यंत उत्पन्न मिळेल असा अंदाज शेतकऱ्यांनी वर्तविला आहे. अलंकार या जातीच्या वाणाची लागवड येथील शेतकरी मोठयÞा प्रमाणात करतात. कारण हे फळ मोठे असते व उष्णतेत ते टिकते. साधारणपणे पंधरा दिवसांपर्यत या फळाला काहीही होत नाही. त्यामुळे या वाणाला बाजारात जास्त मागणी आहे. बुधाजी पाटील या शेतकऱ्याने आपल्या चार एकर अशा विस्तीर्ण जागेत टॉमेटे शेती केली आहे. संपूर्ण जागेत ठिबक सिंचन केले असून औषधेही ठिबक सिंचनातून दिली जातात.येथील जमीन टोमॅटोसाठी अत्यंत उपयुक्तया पिकाला फारशी मशागत करावी लागत नाही तसेच ठिबक सिंचनामुळे मजूर कमी लगातात. अशी माहिती बुधाजी पाटील यांनी दिली. येथील जमीन टॉमेटोसाठी पोषक असल्याने रोगाचे प्रमाणही कमी असते असेही त्यांनी सांगितले. दैनंदिन आहारात टॉमेटो हा महत्त्वाचा घटक आहे. उन्हाळ्याच्या दिवसात टॉमेटेला पसंती दिली जाते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून येथील शेतकऱ्यांनी टॉमेटो उत्पादनात गेल्या अनेक वर्षापासून आपला लौकिक कायम राखला आहे. तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती नसल्याने हा माल दलालामार्फत विकला जातो. मुंबई, वाशी, वसई, ठाणे येथील व्यापारी हा माल घेण्यासाठी जागेवर जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी दराने माल विकावा लागतो अशी माहिती युवा शेतकरी नेते प्रफुल्ल पाटील यांनी दिली. तरूणांनी शेतीकडे वळून आधुनिक शेती करण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.