शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

बोअरच्या पाण्यावर टोमॅटोचे विक्रमी पीक

By admin | Updated: March 28, 2017 05:12 IST

सिंचनाचे कोणतेही साधन उपलब्ध नसताना वाडा तालुक्यातील देवघर येथील शेतकऱ्यांनी स्वत: कूपनलिका खोदून तिच्या

वसंत भोईर / वाडासिंचनाचे कोणतेही साधन उपलब्ध नसताना वाडा तालुक्यातील देवघर येथील शेतकऱ्यांनी स्वत: कूपनलिका खोदून तिच्या पाण्यावर टॉमेटोचे विक्रमी पीक घेतले आहे. यंदा भावही चांगला असल्याने शेतकरी आनंदात आहेत. टॉमेटेची शेती लाभदायक ठरत असल्याचे येथील शेतकऱ्यांचे म्हणणं आहे. डोंगराच्या कुशीत वसलेले देवघर हे एक खेडेगाव. या गावाच्या आजूबाजूला कोणतीही नदी अथवा मोठा तलाव, कालवा नाही. मात्र येथील शेतकऱ्यांनी कूपनलिका खोदून तिच्या पाण्यावर ते विविध प्रकारची पिके घेत आहेत. भातपिकानंतर येथील शेतकरी टॉमेटेची लाभदायक शेती करीत आहेत. टॉमेटोच्या अलंकार, अभिनव या वाणाचे बियाणे आणून ते स्वत:च रोप तयार करतात व त्याची लागवड करून रोपे उरली तर त्यांची विक्रीसुद्धा करतात. सर्वप्रथम भातपीक काढल्यानंतर शेताची नांगरणी करून वाफे तयार केले जातात. त्यानंतर नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये त्यात त्याची लागवड केली जाते. साधारणपणे ५० ते ६० दिवसांनी फळधारणा होते. त्यानंतर चार दिवसांनी फळे काढणीला येतात. योग्य वेळी फळ तोडणी झाली तर पुढचे फळ व्यवस्थित होते. एका एकरातून १५०० क्रेट टॉमेटे निघतात. त्याचे वजन ५० ते ५५ टन भरते. एका एकराला अंदाजे दीड लाख रु पये खर्च येतो. मात्र जसा बाजारभाव असेल त्या प्रमाणे नफा-तोटा होतो. या वर्षी प्रति क्रेटला ४०० रूपये भाव मिळत असल्याने एकराला चार लाखापर्यंत उत्पन्न मिळेल असा अंदाज शेतकऱ्यांनी वर्तविला आहे. अलंकार या जातीच्या वाणाची लागवड येथील शेतकरी मोठयÞा प्रमाणात करतात. कारण हे फळ मोठे असते व उष्णतेत ते टिकते. साधारणपणे पंधरा दिवसांपर्यत या फळाला काहीही होत नाही. त्यामुळे या वाणाला बाजारात जास्त मागणी आहे. बुधाजी पाटील या शेतकऱ्याने आपल्या चार एकर अशा विस्तीर्ण जागेत टॉमेटे शेती केली आहे. संपूर्ण जागेत ठिबक सिंचन केले असून औषधेही ठिबक सिंचनातून दिली जातात.येथील जमीन टोमॅटोसाठी अत्यंत उपयुक्तया पिकाला फारशी मशागत करावी लागत नाही तसेच ठिबक सिंचनामुळे मजूर कमी लगातात. अशी माहिती बुधाजी पाटील यांनी दिली. येथील जमीन टॉमेटोसाठी पोषक असल्याने रोगाचे प्रमाणही कमी असते असेही त्यांनी सांगितले. दैनंदिन आहारात टॉमेटो हा महत्त्वाचा घटक आहे. उन्हाळ्याच्या दिवसात टॉमेटेला पसंती दिली जाते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून येथील शेतकऱ्यांनी टॉमेटो उत्पादनात गेल्या अनेक वर्षापासून आपला लौकिक कायम राखला आहे. तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती नसल्याने हा माल दलालामार्फत विकला जातो. मुंबई, वाशी, वसई, ठाणे येथील व्यापारी हा माल घेण्यासाठी जागेवर जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी दराने माल विकावा लागतो अशी माहिती युवा शेतकरी नेते प्रफुल्ल पाटील यांनी दिली. तरूणांनी शेतीकडे वळून आधुनिक शेती करण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.