शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

मीरा-भार्इंदर पालिकेच्या बोधचिन्हाला मान्यता

By admin | Updated: August 9, 2016 02:07 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या सध्या वापरात असलेल्या बोधचिन्हास अखेर केंद्र शासनाच्या व्यापार चिन्ह नोंदणी विभागाने नोंदणीकृत करत त्यास प्राथमिक मंजुरी दिली आहे

मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या सध्या वापरात असलेल्या बोधचिन्हास अखेर केंद्र शासनाच्या व्यापार चिन्ह नोंदणी विभागाने नोंदणीकृत करत त्यास प्राथमिक मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता पालिकेच्या परवानगीशिवाय हे बोधचिन्ह वापरणे बेकायदेशीर ठरणार आहे. यामुळे पालिकेचे बोधचिन्ह स्वत:च्या कंपनीच्या नावे नोंदणीकृत करण्याचे भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या पत्नीचे प्रयत्न फसल्यात जमा आहे. तब्बल २५ वर्षांनी पालिकेचे बोधचिन्ह नोंदणीकृत होत आहे. १९९१ साली तत्कालीन मीरा-भार्इंदर नगरपरिषदेच्या पहिल्या निवडणुकीनंतर नियोजन समितीचे सभापती लिओ कोलासो यांनी पालिकेचे बोधचिन्ह तयार केले होते. कोलासो हे स्वत: जे.जे. कला महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. त्यामुळे स्थानिकांचा पारंपरिक व्यवसाय व त्यांना बोधचिन्हात स्थान दिले होते. या बोधचिन्हास स्थायी तसेच नियोजन समितीने मान्यता दिली होती. तेव्हापासूनच पालिका हे बोधचिन्ह वापरत होती. २००२ मध्ये महापालिका अस्तिवात आल्यानंतरही आधीच्याच बोधचिन्हाचा वापर सुरू आहे. त्यानंतर पालिकेचे बोधचिन्ह सर्रास खाजगी वाहनांवर बेकायदेशीरपणे वापरले जाऊ लागले. त्यात नगरसेवकांपासून ठेकेदार, राजकीय नेत्यांचाही समावेश होता. विशेषत: टोलमधून सूट मिळवण्यासाठी, तर बहुतांशी लोकांनी बोधचिन्ह लावण्याचा फंडा वापरला. पालिकेकडे याविरोधात तक्रारी सुरूच आहेत. पालिकेनेदेखील पोलिसांना कारवाई करण्यासाठी पत्र दिले, पण कारवाईदरम्यान हे बोधचिन्ह नोंदणीकृत आहे का, या प्रश्नावर मात्र पालिकेची अडचण झाली. २०१३ साली महासभेने बोधचिन्ह नोंदणीकृत करून घेण्याचा ठराव केला. मात्र, योग्य पद्धतीने पाठपुरावाच केला गेला नाही. मार्च २०१४ मध्ये सेव्हन इलेव्हन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने विद्यमान आमदार आणि तत्कालीन पालिका विरोधी पक्षनेते नरेंद्र मेहता यांची पत्नी सुमन यांनी पालिकेला नोटीस पाठवून बोधचिन्हाचा वापर थांबवावा, असे कळवले. १८ जानेवारी २०१४ रोजी सुमन मेहता यांनी सेव्हन इलेव्हन ग्रुप आॅफ कंपनीजच्या नावे केवळ मीरा-भार्इंदर महापालिका हा शब्द वगळून एमबीएमसी शब्द व बोधचिन्ह केंद्र शासनाच्या व्यापार चिन्ह नोंदणी विभागाकडे नोंदणीकृत करण्यासाठी अर्ज केल्याचे उघड झाले. बोधचिन्हच गमावल्यास नाचक्की होईल, या धास्तीने खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने कृष्णा इंटरनॅशनल या एजन्सीला नियुक्त करून २०१४ मध्ये बोधचिन्ह नोंदणीकृत करण्यासाठी अर्ज केला. (प्रतिनिधी)