शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

हितेंद्रांच्या किल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी रवींद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 23:36 IST

भाजपची नीती : लोकसभा निवडणुकीत बालेकिल्ल्यांना पाडली खिंडारे, या निवडणुकीत ते करणार भुईसपाट

रविंद्र साळवे।मोखाडा : आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांना मंत्रीमंडळातून डच्चू दिल्यानंतर पालघरचे पालकमंत्रीपद रिक्त होते. यावेळी मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय असलेल्या चव्हाण यांच्याकडे पालकमंत्रीपदाची धुरा सोपवून ठाकुरांच्या बालेकिल्ला सुरुंग लावण्याची व्यूहरचना केली असून जिल्ह्यातील सहाही मतदारसंघ युतीच्या ताब्यात यावेत यांसाठी ही खेळी खेळण्यात आली आहे.

कारण तशी राजकीय कार्यक्षमता चव्हाणांकडे आहे लोकसभा व पोटनिवडणुकीत राजेंद्र गावीत यांना निवडून आणण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती यामुळे पालघर जिल्हा काबिज करण्याच्यादृष्टीने टाकलेले हे महत्वाचे पाऊल असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.सवरा यांची मंत्रीपदाची कारकिर्द तशी पक्षासाठी राजकीयदृष्ठ्या फायद्याची ठरली नव्हती. पालघर जिल्ह्यातील एकाही निवडणुकीत सवरा आपला ठसा उमटू शकले नव्हते. निष्क्रीयतेचा ठपका असलेल्या पालकमंत्री सवरा यांना जिल्ह्यात पक्षातूनच विरोध होता. त्यामुळे मंत्रीमंडळ विस्तारात सवरा यांना डच्चू दिला जाईल, असे गृहीतच धरण्यात आले होते.सवरा यांना आदिवासी मंत्री तथा पालकमंत्रीपदावरून दूर केल्यानंतर आदिवासी बहुल जिल्ह्यात भाजपाचे स्थान डळमळीत होऊ नये, यासाठी मुख्यमंत्र्यांनी लगेचच माजी आमदार विवेक पंडित यांना आदिवासी विकास योजना आढावा समितीचे अध्यक्षपद देऊन राज्यमंत्रीपदाचा दर्जाही दिला होता. खरेतर पंडित यांना आदिवासी विकास महामंडळाचे अध्यक्षपद देण्याचा निर्णय दीड वर्षांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच घेतला होता. मात्र, त्यावेळी सवरा यांच्यासह अनेक आदिवासी नेत्यांनी त्याला विरोध केला होता. तसेच आदिवासी विकास महामंडळावर बिगर आदिवासी व्यक्तीची अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय घटनाबाह्य असेल अशा तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता आढावा समितीचे अध्यक्षपद देऊन मुख्यमंत्र्यांनी पंडितांच्या माध्यमातून पालघरसह राज्यातील आदिवासी भागात राज्य सरकारच्या आदिवासींसाठी असलेल्या योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून भाजपाचेस्थान मजबूत करण्याचे काम केले आहे.वसई, नालासोपारा, बोईसर युतीकडे खेचण्याची चव्हाणांवर जबाबदारीआता पालघर जिल्ह्यावर थेट नियंत्रण ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आपल्या खास मर्जीतील राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावर पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवल्याचे सांगितले जाते. सवरा यांची प्रशासनावरही पकड नव्हती. संघटनात्मकदृष्टयाही सवरा नापास झाले होते. त्यामानाने चव्हाण आक्र मक आणि रिझल्ट ओरिएन्टेड असल्याचे यंदाच्या लोकसभा निवडणुकीतून दिसून आले आहे. लोकसभा निवडणुकीत राजेंद्र गावीत यांच्या विजयात चव्हाण यांचे मोठे योगदान आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांच्या जोडीला चव्हाण पालघरमध्ये ठाण मांडून बसले होते. पालघरवर वर्चस्व मिळविण्यासाठी वसई विरारवरील हितेंद्र ठाकूर यांच्या सत्तेला सुरूंग लावण्याची मुख्यमंत्र्यांची खेळी आहे. त्यादृष्टीने पालघर लोकसभा निवडणूक रंगीत तालीम ठरली होती. त्यात मुख्यमंत्री यशस्वी ठरल्याचे मानले जाते. पालघर जिल्ह्यात सहा विधानसभा मतदार संघ आहेत. त्यापैकी तीन विधानसभा ठाकूरांच्या ताब्यात आहेत. पालघरची जागा शिवसेनेकडे तर विक्र मगड आणि डहाणूची जागा भाजपाकडे आहे. आता उर्वरित तीनही विधानसभा मतदारसंघ युतीकडे खेचण्याचे प्रयत्न आहेत. त्यासाठीच चव्हाण यांच्या खांद्यावर पालघरच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिल्याचे मानले जाते.