शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

दुरुस्तीअभावी रावढळ पुलाला तडे

By admin | Updated: December 25, 2014 22:14 IST

म्हाप्रळ - पंढरपूर राज्यमार्गावरील रावढळ गावाजवळ असलेल्या नागेश्वरी नदीवरील पूल जीर्ण झाला आहे. पुलाच्या बांधकामाला तडे गेले

दासगाव : म्हाप्रळ - पंढरपूर राज्यमार्गावरील रावढळ गावाजवळ असलेल्या नागेश्वरी नदीवरील पूल जीर्ण झाला आहे. पुलाच्या बांधकामाला तडे गेले आहे तर अनेक ठिकाणी पुलाचे कपचे उडाल्याने हा पूल धोकादायक बनला आहे. यामुळे या पुलाची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील नागरिक व वाहनचालक करीत आहेत. म्हाप्रळ-पंढरपूर राज्यमार्गाचे काम झाले तेव्हा रावढळ गावाजवळ पूल बांधण्यात आला. येथील खाडीतील रसायनयुक्त खारे पाणी, पावसाळ्यात नागेश्वरी नदीला येणाऱ्या पुराचे पाणी आणि डोंगरातून वाहत येणाऱ्या नागेश्वरी नदीच्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग यामुळे हा पूल आता जीर्ण होत चालला आहे. अनेक ठिकाणी पुलाला तडे गेले आहेत. पुलाच्या खांबांचे कपचे उडाले आहेत. या नादुरुस्तीमुळे आर.सी.सी. पद्धतीच्या या खांबातील लोखंडी सळ्या गंजण्याचे प्रमाण वाढले आहे. म्हाप्रळ-पंढरपूर हा मार्ग कोकण आणि घाटाला जोडणारा मार्ग आहे. महाडच्या खाडी पट्ट्यातील ग्रामस्थ महाडमध्ये येण्यासाठी याच मार्गाचा प्रामुख्याने वापर करतात. त्यामुळे हा मार्गावर कायम वाहनांची वर्दळ असते. या परिसरात मोठ्या प्रमाणावर वीट आणि वाळू वाहतूक होत असल्याने अवजड वाहनांचीही कायम वर्दळ असते. या पुलावरुन पावसाळ्यात नदीच्या पुराचे पाणी देखील जाते. यामुळे पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक देखील ठप्प होते. महाड-म्हाप्रळ मार्ग ज्यावेळी झाला त्यावेळी या पुलाची उभारणी करण्यात आली आहे. तिथपासून आजतागायत या पुलाची मोठी दुरुस्ती करण्यात आलेली नाही. काळाच्या ओघात हा पूल आता जीर्ण होत चालला असून तो धोकादायक बनत आहे. (वार्ताहर)