शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

वसईतील राऊत वाड्याला झालीत १३५ वर्षे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 00:06 IST

वसईतील होळी गावातील राऊत कुटुंबियांच्या वाड्याला १३५ वर्ष पूर्ण झाली आहेत.

नालासोपारा : वसईतील होळी गावातील राऊत कुटुंबियांच्या वाड्याला १३५ वर्ष पूर्ण झाली आहेत. वसईतील आणि देशातील अनेक घडामोडींना साक्षी असलेला हा वाडा अजूनही दिमाखात उभा आहे. आणि १०० वर्षाहुनही अधिक काळ उलटूनही या वाड्यात प्रतिवर्षी नवरात्रौत्सव पारंपारिक पद्धतीने जल्लौषपूर्ण वातावरणात साजरा केला जात असतो.सद्या सगळीकडे शारदीय नवरात्रौत्सवाची धामधूम सुरू असलेली पहायला मिळत आहे.वसईतील होळी येथील राऊत कुटुंबीयांच्या घरातही नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.मात्र या नवरात्रौत्सवास तब्बल शंभर वर्षाहूनही अधिक परंपरा असल्याचे घरातील सदस्य आशय राऊत यांनी सांगितले.वंशवेल वाढू लागल्यानंतर आता राऊत कुटुंबातील सदस्यांनी वेगवेगळी घरे बांधली आहेत.मात्र पूर्वीपासून राऊत कुटुंबिय दरवर्षी गणेशोत्सव , नवरात्रौत्सव ,दिवाळी अशा सणांना या वाड्यात एकत्र येत असतात.मोठ्या उत्साहात व जल्लौषपुर्ण वातावरणात दुर्गेची आराधना राऊत कुटूंबीय एकत्ररीत्या करीत असतात.राऊत कुटूंबीयांची खाजगी मालमत्ता असलेला हा पुरातन असलेला वाडा जतन करण्याचा संकल्प कुटुंबियांनी केला आहे.या घराण्यातील भास्कर रघुनाथ राऊत यांनी या वाड्याचा तसेच कुटुंबाचा एक इतिहास लिहिला असून त्यावरून पुरावे उपलब्ध आहेत. १८८३ साली शिवा राऊत यांनी हा वाडा बांधला. आज १३५ वर्ष वाड्याला पूर्ण झाली तरी वाडा जुन्या बांधकाम पद्धती व इतिहासाची साक्ष देत आपल्या जागेवर उभा आहे. या वाड्याने स्वातंत्र्यपूर्व आणि आतापर्यंतचा काळ पहिला आहे. राऊत कुटुंबियांचा आधीपासूनच सामाजिक पिंड आहे. त्यामुळे अनेक दिग्गजांचे पाय या वाड्याला लागले आहेत. त्याकाळी दानशूर व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेले भायजी जगू राऊत हे याच घरातील होत.या वाड्यात येणारा प्रत्येक जण वाड्याच्या प्रेमात पडतो. इंग्रजांची राजवटीत एका इंग्रज अधिकाऱ्याने या वाड्याला भेट दिली होती. राऊत घराण्याच्या इतिहासात त्याची नोंद आहे. राऊत कुटुंब जवळपास १६० जणांचे आहे.>राऊत कुटुंबातील प्रत्येक सदस्य दरवर्षी गणेशोत्सव, नवरात्रौत्सव व दिवाळी सणानिमीत्त एकत्र येत असतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत मोठ्या उत्साहात सामिल होत असतात.हा वाडा आमचा श्वास आहे.-आशय राऊत,राऊत कुटुंबातील सदस्य