शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

ग्रामीण महिला व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांचा आर्थिक स्तर उंचावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 23:25 IST

आदिवासी महिलांना जोडव्यवसायाची संधी

रवींद्र साळवेमोखाडा : निसर्गाच्या लहरीपणामुळे पारंपरिक शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. यामुळे शेतीला जोड व्यवसायाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी उत्पादित मालावर प्रक्रि या करून विक्री करता यावी या दृष्टीने महिला बचत गटांना कुकुटपालन या जोड व्यवसायाच्या माध्यमातून प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

मोखाडा तालुक्यातील कुर्लोद, बोटोशी, आसे येथील अल्पभूधारक व भूमिहीन सहा महिला बचत गटातील ६० महिलांना कुक्कटपालन व्यवसायासाठी प्रत्येकी गटाला १०० कोंबड्या देण्यात आल्या असून सहा गटांना ६०० कोंबड्या देण्यात आल्या आहेत.

या दोन महिन्याच्या कोंबड्यांना ठेवण्यासाठी पिंजरा तसेच दोन महिने पुरेल एवढे खाद्य देण्यात आले, सोबतच व्यवस्थापन करण्यासाठी गटातील सदस्यांना तज्ज्ञांकडून प्रशिक्षण देण्यात आले. या व्यवसायाच्या अंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना अंडे विक्र ी करून आर्थिक उत्पादनासोबतच आपल्या मुलांना सकस आहार देण्यासाठी देखील मदत होणार तसेच या गटांना अमृत आहार योजनेसोबत जोडण्याचा मानस असून त्याद्वारे गावातच बाजारपेठ उपलब्ध होईल व मुलांना देखील चांगल्या दर्जाची अंडी उपलब्ध होतील, असे आरोहण संस्थेचे पदाधिकारी गणेश सरोदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.आदिवासींना फायदेशीर जोडधंदा मागेल त्याला काम आणि १५ दिवसात दाम या तत्त्वावर रोजगार हमी योजना कार्यरत आहे, परंतु मागेल त्याला कामही मिळते आणि दाम देखील मिळत नाही, अशी रोजगार हमी योजनेची अवस्था आहे. यामुळे या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव स्थलांतरित होत असतो, परंतु आरोहण संस्थेने बचत गटातील आदिवासी महिलांना कुक्कुटपालनाच्या माध्यमातून मोफत आणि फायदेशीर जोडधंदा उपलब्ध करून दिल्याने आरोहण संस्थेचा हा उपक्र म कौतुकास्पद मानला जात आहे.