शहरं
Join us  
Trending Stories
1
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
2
अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली! विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
3
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
4
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
5
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
6
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
7
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
8
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
9
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
10
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
11
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
12
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
13
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा
14
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
15
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
16
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
17
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
18
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
19
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
20
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप

पावसाळी रानभाज्या होताहेत दुर्मिळ

By admin | Updated: July 7, 2015 22:26 IST

पावसाळा आला की, पूर्वी खेड्यापाड्यातच नव्हे तर शहरातही रोजच्या जेवणात रानभाज्यांची रेलचेल असायची. गरीब कुटुंबे पावसाळाभर या रानभाज्यावरच बहुधा अवलंबून असत.

कासा : पावसाळा आला की, पूर्वी खेड्यापाड्यातच नव्हे तर शहरातही रोजच्या जेवणात रानभाज्यांची रेलचेल असायची. गरीब कुटुंबे पावसाळाभर या रानभाज्यावरच बहुधा अवलंबून असत. मात्र ग्रामिण भागात वाढत्या बांधकामामुळे या रानभाज्या सध्या दुर्मिळ झाल्याचे चित्र असून रानावनात दिसणाऱ्या रानभाज्याही जंगलाच्या ऱ्हासामुळे आता दिसेनाशा झाल्या आहेत.पावसाळ्यात रानात झाडी झुडुपात शेवली, कोलीभाजी, अळू, कोरल, आफीम, घोळू, कुरडू, बाफळी, शेवगाचा पाला, माठभाजी आदी पालेभाज्या, कर्टूले, पेढरं, काकडं, टेटवी, शिंद (बांबु), अभईच्या शेंगा या फळभाज्या तर कंद, कडुकंद (वली), अळूचे कंद, करांदे, कणक, कसऱ्या आदी कंदभाज्या उगवतात. यापैकी बऱ्याच वनस्पती औषधी गुणधर्माच्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात त्या मानवी आरोग्यासाठी गुणकारी असतात. मात्र आता त्या दुर्मिळ होऊ लागल्याने खेड्या पाड्यातही त्याचा वापर आहारात कमीच झाला आहे.बांबुच्या झाडाच्या जमिनीलगत येणारे नवीन अंकुर भाजीत वापरले जात असून त्यास ग्रामीण भागात शिंद संबोधले जाते. बांबुना काप देवून ती तयार केली जाते. बाफळी ही पालेभाजी जंगलातील कपारीत एखाद्या ठिकाणीच आढळत असून ती गुणकारी आहे. त्यामध्ये औषधी गुणधर्म असल्याचे सांगितले जाते. तर टेटवी, करंटोळी, पेढरं, कुरडू हे झाडी झुडूपातही आढळतात. कडूकंदापासून वली बनवितात मात्र त्यातील कडवटपणा कमी करण्यासाठी त्या राखाडी टाकून धुवून घेतात. रानमाळावर उगवणारी आळींब या वनस्पतीला मोठ्या प्रमाणात मागणी असते मात्र रानभाज्या दिवसेंदिवस दुर्मिळ होत जात आहेत. (वार्ताहर)