शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
3
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
4
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
5
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
6
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
7
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
8
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
9
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
10
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
11
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
12
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
13
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
14
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
15
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
16
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
17
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
18
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
19
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
20
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..

विसर्जनासाठी पाऊसफुले

By admin | Updated: September 22, 2015 03:37 IST

पालघर जिल्ह्यातील आठही तालुक्यांत गौरी-गणपतीचे विसर्जन उत्साहात पार पडले. दुपारी २ नंतर भक्तांनी आपल्या मूर्ती विसर्जनासाठी नेण्यास सुरुवात केली

पालघर जिल्ह्यातील आठही तालुक्यांत गौरी-गणपतीचे विसर्जन उत्साहात पार पडले. दुपारी २ नंतर भक्तांनी आपल्या मूर्ती विसर्जनासाठी नेण्यास सुरुवात केली. सोमवारी विसर्जनाच्या वेळेस पावसानेही हजेरी लावली. मात्र, कोणतेही अडथळे निर्माण झाले नाहीत. वसई, पालघर, डहाणू, वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा व तलासरी या आठ तालुक्यांत पोलीस व स्थानिक प्रशासकीय यंत्रणांनी योग्य ती यंत्रणा उभी केली. त्यामुळे विसर्जन सुरळीत पार पडले. समुद्रकिनारी असलेल्या गावांमध्येही अनेक गणपती तसेच गौरींचे विसर्जन करण्यात आले. या वेळी प्रशासनातर्फे विसर्जनाच्या कामावर बारकाईने लक्ष ठेवले होते. सायंकाळी उशिरापर्यंत कोणतीही अप्रिय घटना घडली नसल्याचे विविध पोलीस ठाण्यांतर्फे सांगण्यात आले. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... अशा घोषणांमध्ये गणपतीने आपल्या भक्तांचा निरोप घेतला.वसई : वसई-विरार परिसरातील गौरी-गणपतींचे विसर्जन शांततेत पार पडले. दोन दिवसांपूर्वी आलेल्या गौराईच्या वास्तव्यानंतर सोमवारी दुपारनंतर अनेक भाविकांनी विसर्जनास सुरुवात केली. दिवसभरात कोणतीही अप्रिय घटना घडली नसल्याचे विविध पोलीस ठाण्यांतर्फे सांगण्यात आले.दुपारी ३ वाजल्यानंतर अनेक भाविकांनी आपल्या मूर्ती विसर्जनासाठी बाहेर काढल्या. बॅण्ड, डीजे, लेझीम आणि ढोलताशांच्या गजरात बाप्पाला गौरीसह निरोप देण्यात आला. विसर्जनासाठी निघालेल्या मिरवणुकांमध्ये लहान मुलांसह अबालवृद्धही सहभागी झाले. शहरी भागातील तलावांमध्ये विसर्जन सोहळा पार पडला. प्रत्येक तलावाच्या ठिकाणी मनपा प्रशासनाने स्टेज उभारले होते. तसेच विसर्जन करण्यासाठी तरुणांचे पथक तैनात होते. वसई, नालासोपारा, विरार तसेच वसई रोड या ४ शहरांसमवेत ग्रामीण भागात एकूण साडेपाच हजार गणपतींचे विसर्जन करण्यात आले. विसर्जनावेळी बाप्पाला निरोप देताना भक्तांना फारच क्लेश होत होते. रात्री उशिरापर्यंत ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा घोषणांमध्ये मिरवणुका विसर्जनस्थळी येत होत्या. मनपाचे अधिकारी व्यवस्थेवर नियंत्रणाचे काम करीत होते. तसेच वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक व स्थानिक पोलिसांनी परिपूर्ण व्यवस्था निर्माण केली होती. त्यामुळे विसर्जनाच्या मिरवणुकीचा स्थानिक नागरिकांना कोणताही त्रास झाला नाही. (प्रतिनिधी)वसई परिसरात गणरायाला भावपूर्ण निरोप; गौराईमाताही सासरी४पारोळ : वसई, विरार परिसरात पाच दिवसाच्या सार्वजनिक तसेच घरगुती गणरायाला भक्तांनी भावपूर्ण निरोप दिला. तसेच सोनपावलांनी माहेरी आलेल्या व अडीच दिवसाचा माहेरचा पाहुणचार घेत गौरी देखील सासरी रवाना झाल्या. वसई ग्रामीण भागात नदी, ओहळ, विहिरीवर पाच दिवसाच्या गणरायाचे विसर्जन केले. ४पारंपारीक पद्धतीने टाळमृदूंगाच्या मंजुळ स्वरानी बाप्पांना निरोप दिला. तसेच निसर्गाचे रूपात आलेली गौरी मातेचे घरातील सुवासींनींनी आपल्या शेतावर विसर्जन केले. यावेळी विसर्जनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून विसर्जनासाठी गर्दी होईल अशा स्थळांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.मनोर परिसरात १९८ गणपती, ९७ गौरींचे विसर्जनमनोर : मनोर परिसरातील पाच दिवसाचे श्री गणेश आणि गौरींचे वैतरणा, सुर्या, देहरजा, हातनदी, तानसा नद्यांच्या गणेश कुंडात वाजत गाजत मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले.मनोर परिसरातील टेण, सावरखंड, मासवण, नागझरी, किराट, लालोंडे, ढेकाळी, नावझे, करळगाव, अशा अनेक गावातील सार्वजनिक मंडळाचे ५६, घरगुती १४२ बाप्पांचे, तर ४५ घरगुती २५ सार्वजनिक गौरींचे सोमवारी पारंपारीक पद्धतीने वाजत गाजत भजन, किर्तनाच्या गजराने मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले. मनोर पोलीस ठाण्याचे सहा. पो. नि. मारोती पाटील व उपविभागीय पोलीस अधिक्षक जयंत बजबळे यांनी सर्व गावामध्ये चोख बंदोबस्त तैनात केले होते. कुठेही अनुचित प्रकार घडले नाही.मनोर परिसरातील सर्वत्र ठिकाणातील रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्यामुळे गौरी गणपतीची मिरवणूक काढताना त्या खड्ड्यातुन मार्ग काढावे लागले. त्यामुळे नागरीकांकडून सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधीत ग्रामपंचायत विरोधात संताप होता. (वार्ताहर)