शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

विसर्जनासाठी पाऊसफुले

By admin | Updated: September 22, 2015 03:37 IST

पालघर जिल्ह्यातील आठही तालुक्यांत गौरी-गणपतीचे विसर्जन उत्साहात पार पडले. दुपारी २ नंतर भक्तांनी आपल्या मूर्ती विसर्जनासाठी नेण्यास सुरुवात केली

पालघर जिल्ह्यातील आठही तालुक्यांत गौरी-गणपतीचे विसर्जन उत्साहात पार पडले. दुपारी २ नंतर भक्तांनी आपल्या मूर्ती विसर्जनासाठी नेण्यास सुरुवात केली. सोमवारी विसर्जनाच्या वेळेस पावसानेही हजेरी लावली. मात्र, कोणतेही अडथळे निर्माण झाले नाहीत. वसई, पालघर, डहाणू, वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा व तलासरी या आठ तालुक्यांत पोलीस व स्थानिक प्रशासकीय यंत्रणांनी योग्य ती यंत्रणा उभी केली. त्यामुळे विसर्जन सुरळीत पार पडले. समुद्रकिनारी असलेल्या गावांमध्येही अनेक गणपती तसेच गौरींचे विसर्जन करण्यात आले. या वेळी प्रशासनातर्फे विसर्जनाच्या कामावर बारकाईने लक्ष ठेवले होते. सायंकाळी उशिरापर्यंत कोणतीही अप्रिय घटना घडली नसल्याचे विविध पोलीस ठाण्यांतर्फे सांगण्यात आले. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... अशा घोषणांमध्ये गणपतीने आपल्या भक्तांचा निरोप घेतला.वसई : वसई-विरार परिसरातील गौरी-गणपतींचे विसर्जन शांततेत पार पडले. दोन दिवसांपूर्वी आलेल्या गौराईच्या वास्तव्यानंतर सोमवारी दुपारनंतर अनेक भाविकांनी विसर्जनास सुरुवात केली. दिवसभरात कोणतीही अप्रिय घटना घडली नसल्याचे विविध पोलीस ठाण्यांतर्फे सांगण्यात आले.दुपारी ३ वाजल्यानंतर अनेक भाविकांनी आपल्या मूर्ती विसर्जनासाठी बाहेर काढल्या. बॅण्ड, डीजे, लेझीम आणि ढोलताशांच्या गजरात बाप्पाला गौरीसह निरोप देण्यात आला. विसर्जनासाठी निघालेल्या मिरवणुकांमध्ये लहान मुलांसह अबालवृद्धही सहभागी झाले. शहरी भागातील तलावांमध्ये विसर्जन सोहळा पार पडला. प्रत्येक तलावाच्या ठिकाणी मनपा प्रशासनाने स्टेज उभारले होते. तसेच विसर्जन करण्यासाठी तरुणांचे पथक तैनात होते. वसई, नालासोपारा, विरार तसेच वसई रोड या ४ शहरांसमवेत ग्रामीण भागात एकूण साडेपाच हजार गणपतींचे विसर्जन करण्यात आले. विसर्जनावेळी बाप्पाला निरोप देताना भक्तांना फारच क्लेश होत होते. रात्री उशिरापर्यंत ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा घोषणांमध्ये मिरवणुका विसर्जनस्थळी येत होत्या. मनपाचे अधिकारी व्यवस्थेवर नियंत्रणाचे काम करीत होते. तसेच वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक व स्थानिक पोलिसांनी परिपूर्ण व्यवस्था निर्माण केली होती. त्यामुळे विसर्जनाच्या मिरवणुकीचा स्थानिक नागरिकांना कोणताही त्रास झाला नाही. (प्रतिनिधी)वसई परिसरात गणरायाला भावपूर्ण निरोप; गौराईमाताही सासरी४पारोळ : वसई, विरार परिसरात पाच दिवसाच्या सार्वजनिक तसेच घरगुती गणरायाला भक्तांनी भावपूर्ण निरोप दिला. तसेच सोनपावलांनी माहेरी आलेल्या व अडीच दिवसाचा माहेरचा पाहुणचार घेत गौरी देखील सासरी रवाना झाल्या. वसई ग्रामीण भागात नदी, ओहळ, विहिरीवर पाच दिवसाच्या गणरायाचे विसर्जन केले. ४पारंपारीक पद्धतीने टाळमृदूंगाच्या मंजुळ स्वरानी बाप्पांना निरोप दिला. तसेच निसर्गाचे रूपात आलेली गौरी मातेचे घरातील सुवासींनींनी आपल्या शेतावर विसर्जन केले. यावेळी विसर्जनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून विसर्जनासाठी गर्दी होईल अशा स्थळांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.मनोर परिसरात १९८ गणपती, ९७ गौरींचे विसर्जनमनोर : मनोर परिसरातील पाच दिवसाचे श्री गणेश आणि गौरींचे वैतरणा, सुर्या, देहरजा, हातनदी, तानसा नद्यांच्या गणेश कुंडात वाजत गाजत मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले.मनोर परिसरातील टेण, सावरखंड, मासवण, नागझरी, किराट, लालोंडे, ढेकाळी, नावझे, करळगाव, अशा अनेक गावातील सार्वजनिक मंडळाचे ५६, घरगुती १४२ बाप्पांचे, तर ४५ घरगुती २५ सार्वजनिक गौरींचे सोमवारी पारंपारीक पद्धतीने वाजत गाजत भजन, किर्तनाच्या गजराने मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले. मनोर पोलीस ठाण्याचे सहा. पो. नि. मारोती पाटील व उपविभागीय पोलीस अधिक्षक जयंत बजबळे यांनी सर्व गावामध्ये चोख बंदोबस्त तैनात केले होते. कुठेही अनुचित प्रकार घडले नाही.मनोर परिसरातील सर्वत्र ठिकाणातील रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्यामुळे गौरी गणपतीची मिरवणूक काढताना त्या खड्ड्यातुन मार्ग काढावे लागले. त्यामुळे नागरीकांकडून सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधीत ग्रामपंचायत विरोधात संताप होता. (वार्ताहर)