शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

पावसाच्या धुवाधार बॅटिंगने वसई-विरारमध्ये साचले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 01:07 IST

महामार्गावरील वाहतूक मंदावली : ग्रामीण भागात शेतकरी सुखावले

लोकमत न्यूज नेटवर्कपारोळ : पाऊस जूनपासून लपंडाव खेळत आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांना पिकाचे नुकसान होण्याची चिंता सतावत असतानाच सोमवारी रात्रीपासून कोसळणाºया पावसाने मंगळवारीही वसई तालुक्यात धुवांधार बॅटिंग केली. त्यामुळे वसई, विरार आणि नालासोपारा या शहरी भागांत ठिकठिकाणी पाणी साचले होते. तसेच विरार-पश्चिमेतील वटार गावात पाणी शिरल्याने हे गाव पाण्याखाली गेले होते. तसेच मुंबई-अहमदारबाद मार्गावरील वाहतूकही मंदावली होती. पावसाच्या या दमदार पुनरागमनाने शेतकऱ्यांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे.वसई-विरार शहर परिसरामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा सातत्याने वाढत आहे. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासन करत आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे वसईला पूरस्थितीचा सामना करावा लागलेला नाही. गतवर्षीसारखी परिस्थिती ओढवली असती तर कोरोनाच्या संकटात बिकट परिस्थिती निर्माण झाली असती. गेल्या वर्षी मिठागरातील वस्त्या, नागरी वसाहतींना पुराच्या पाण्याचा धोका पोहोचल्याने आपत्ती व्यवस्थापन विभागातील कर्मचाºयांमार्फत त्यांना सुरिक्षत स्थळी हलवण्यात आले होते.मुसळधार पावसात शहरांतील रस्ते, तसेच सखल भागात पाणी साचण्याचे प्रकार घडतात. नालासोपारा पूर्वेकडील सीतारा बेकरी, तुळिंज पोलीस ठाण्यासमोरील परिसर व गालानगर भागात दीड फुटांपर्यंत पाणी साचले होते. दरम्यान, सोमवारी सकाळी ७ ते मंगळवारी सकाळी ७ वाजेपर्यंत ७० मिलिमीटर पावसाची तालुक्यात नोंद झाली आहे. तर आतापर्यंत ११२९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.धरणसाठा वाढलाच्पावसाने पुन्हा हजेरी लावल्यानंतर शेतकरी सुखावले आहेत. तसेच धरणसाठ्यातही भर पडली आहे.च्कडक उन्हामुळे पिके करपण्याची शक्यता होती. मात्र, पावसाने पुनरागमन केल्यामुळे पिकांवरील धोका काही प्रमाणात टळल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.नालासोपाºयात रस्ते पाण्याखाली\१नालासोपारा : सोमवारी रात्रभर नालासोपारा पाऊ स कोसळल्यामुळे नालासोपारा शहराच्या सखल भागात गुडघ्याच्या वर पाणी साचले होते. सकाळी कामावर जाणाºया नोकरदारांना या पाण्यातून वाट काढत जावे लागत होते. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यात पाणी साचल्यामुळे त्याचा वाहतुकीवरही परिणाम झाला होता.२नालासोपारा शहराच्या पूर्वेकडील तुळिंज, सेंट्रल पार्क, विजयनगर, ओस्तवालनगर, अलकापुरी, गालानगर, टाकी रोड, प्रगतीनगर, महेश पार्कया ठिकाणी पावसाचे पाणी साचले होते. तर संतोष भवन, बिलालपाडा, धनिवबाग, श्रीरामनगर या परिसरातही गुडघ्याच्या वर पाणी साचले होते.