शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या धुवाधार बॅटिंगने वसई-विरारमध्ये साचले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 01:07 IST

महामार्गावरील वाहतूक मंदावली : ग्रामीण भागात शेतकरी सुखावले

लोकमत न्यूज नेटवर्कपारोळ : पाऊस जूनपासून लपंडाव खेळत आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांना पिकाचे नुकसान होण्याची चिंता सतावत असतानाच सोमवारी रात्रीपासून कोसळणाºया पावसाने मंगळवारीही वसई तालुक्यात धुवांधार बॅटिंग केली. त्यामुळे वसई, विरार आणि नालासोपारा या शहरी भागांत ठिकठिकाणी पाणी साचले होते. तसेच विरार-पश्चिमेतील वटार गावात पाणी शिरल्याने हे गाव पाण्याखाली गेले होते. तसेच मुंबई-अहमदारबाद मार्गावरील वाहतूकही मंदावली होती. पावसाच्या या दमदार पुनरागमनाने शेतकऱ्यांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे.वसई-विरार शहर परिसरामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा सातत्याने वाढत आहे. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासन करत आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे वसईला पूरस्थितीचा सामना करावा लागलेला नाही. गतवर्षीसारखी परिस्थिती ओढवली असती तर कोरोनाच्या संकटात बिकट परिस्थिती निर्माण झाली असती. गेल्या वर्षी मिठागरातील वस्त्या, नागरी वसाहतींना पुराच्या पाण्याचा धोका पोहोचल्याने आपत्ती व्यवस्थापन विभागातील कर्मचाºयांमार्फत त्यांना सुरिक्षत स्थळी हलवण्यात आले होते.मुसळधार पावसात शहरांतील रस्ते, तसेच सखल भागात पाणी साचण्याचे प्रकार घडतात. नालासोपारा पूर्वेकडील सीतारा बेकरी, तुळिंज पोलीस ठाण्यासमोरील परिसर व गालानगर भागात दीड फुटांपर्यंत पाणी साचले होते. दरम्यान, सोमवारी सकाळी ७ ते मंगळवारी सकाळी ७ वाजेपर्यंत ७० मिलिमीटर पावसाची तालुक्यात नोंद झाली आहे. तर आतापर्यंत ११२९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.धरणसाठा वाढलाच्पावसाने पुन्हा हजेरी लावल्यानंतर शेतकरी सुखावले आहेत. तसेच धरणसाठ्यातही भर पडली आहे.च्कडक उन्हामुळे पिके करपण्याची शक्यता होती. मात्र, पावसाने पुनरागमन केल्यामुळे पिकांवरील धोका काही प्रमाणात टळल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.नालासोपाºयात रस्ते पाण्याखाली\१नालासोपारा : सोमवारी रात्रभर नालासोपारा पाऊ स कोसळल्यामुळे नालासोपारा शहराच्या सखल भागात गुडघ्याच्या वर पाणी साचले होते. सकाळी कामावर जाणाºया नोकरदारांना या पाण्यातून वाट काढत जावे लागत होते. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यात पाणी साचल्यामुळे त्याचा वाहतुकीवरही परिणाम झाला होता.२नालासोपारा शहराच्या पूर्वेकडील तुळिंज, सेंट्रल पार्क, विजयनगर, ओस्तवालनगर, अलकापुरी, गालानगर, टाकी रोड, प्रगतीनगर, महेश पार्कया ठिकाणी पावसाचे पाणी साचले होते. तर संतोष भवन, बिलालपाडा, धनिवबाग, श्रीरामनगर या परिसरातही गुडघ्याच्या वर पाणी साचले होते.