शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
2
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
3
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
4
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
5
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
6
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
7
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
8
Two Wheeler Toll: आता दुचाकींनाही टोल; १५ ऑगस्टपासून 'या' मार्गांवरून जाण्यासाठी मोजावे लागणार पैसे
9
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
10
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
11
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
12
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
13
'नमस्कार फ्रॉम स्पेस...', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video; काय म्हणाले पाहा...
14
'या' तरुणीने रील बनवून कमावले ४१ कोटी! रोज कमावते अडीच लाख रुपये! कोण आहे 'द रिबेल किड'?
15
‘यूं ही चला चल…’ गाणे ऐकले अन्...; हवाई दलाचे वैमानिक ते अंतराळवीर अशी भरारी, असा आहे शुभांशू शुक्ला यांचा प्रवास
16
'शांत हो श्रीगुरुदत्ता' हे विनवणीपर कवन टेंबे स्वामींना का लिहिले? त्याक्षणी नेमके घडले तरी काय?
17
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
18
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
19
मुंबईत ३० व्या मजल्यावरून उडी घेत अल्पवयीन मुलीची आत्महत्या; कुटुंबीयांकडून घातपाताचा संशय
20
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?

पावसाच्या धुवाधार बॅटिंगने वसई-विरारमध्ये साचले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 01:07 IST

महामार्गावरील वाहतूक मंदावली : ग्रामीण भागात शेतकरी सुखावले

लोकमत न्यूज नेटवर्कपारोळ : पाऊस जूनपासून लपंडाव खेळत आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांना पिकाचे नुकसान होण्याची चिंता सतावत असतानाच सोमवारी रात्रीपासून कोसळणाºया पावसाने मंगळवारीही वसई तालुक्यात धुवांधार बॅटिंग केली. त्यामुळे वसई, विरार आणि नालासोपारा या शहरी भागांत ठिकठिकाणी पाणी साचले होते. तसेच विरार-पश्चिमेतील वटार गावात पाणी शिरल्याने हे गाव पाण्याखाली गेले होते. तसेच मुंबई-अहमदारबाद मार्गावरील वाहतूकही मंदावली होती. पावसाच्या या दमदार पुनरागमनाने शेतकऱ्यांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे.वसई-विरार शहर परिसरामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा सातत्याने वाढत आहे. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासन करत आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे वसईला पूरस्थितीचा सामना करावा लागलेला नाही. गतवर्षीसारखी परिस्थिती ओढवली असती तर कोरोनाच्या संकटात बिकट परिस्थिती निर्माण झाली असती. गेल्या वर्षी मिठागरातील वस्त्या, नागरी वसाहतींना पुराच्या पाण्याचा धोका पोहोचल्याने आपत्ती व्यवस्थापन विभागातील कर्मचाºयांमार्फत त्यांना सुरिक्षत स्थळी हलवण्यात आले होते.मुसळधार पावसात शहरांतील रस्ते, तसेच सखल भागात पाणी साचण्याचे प्रकार घडतात. नालासोपारा पूर्वेकडील सीतारा बेकरी, तुळिंज पोलीस ठाण्यासमोरील परिसर व गालानगर भागात दीड फुटांपर्यंत पाणी साचले होते. दरम्यान, सोमवारी सकाळी ७ ते मंगळवारी सकाळी ७ वाजेपर्यंत ७० मिलिमीटर पावसाची तालुक्यात नोंद झाली आहे. तर आतापर्यंत ११२९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.धरणसाठा वाढलाच्पावसाने पुन्हा हजेरी लावल्यानंतर शेतकरी सुखावले आहेत. तसेच धरणसाठ्यातही भर पडली आहे.च्कडक उन्हामुळे पिके करपण्याची शक्यता होती. मात्र, पावसाने पुनरागमन केल्यामुळे पिकांवरील धोका काही प्रमाणात टळल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.नालासोपाºयात रस्ते पाण्याखाली\१नालासोपारा : सोमवारी रात्रभर नालासोपारा पाऊ स कोसळल्यामुळे नालासोपारा शहराच्या सखल भागात गुडघ्याच्या वर पाणी साचले होते. सकाळी कामावर जाणाºया नोकरदारांना या पाण्यातून वाट काढत जावे लागत होते. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यात पाणी साचल्यामुळे त्याचा वाहतुकीवरही परिणाम झाला होता.२नालासोपारा शहराच्या पूर्वेकडील तुळिंज, सेंट्रल पार्क, विजयनगर, ओस्तवालनगर, अलकापुरी, गालानगर, टाकी रोड, प्रगतीनगर, महेश पार्कया ठिकाणी पावसाचे पाणी साचले होते. तर संतोष भवन, बिलालपाडा, धनिवबाग, श्रीरामनगर या परिसरातही गुडघ्याच्या वर पाणी साचले होते.