शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

उपायोजना करून भूकंपग्रस्तांना दिलासा द्या -आमदारांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 00:10 IST

दिवाळीच्या तिसऱ्या दिवसांपासून पालघर जिल्हयातील डहाणू , तलासरी तालुक्यात जाणवणाऱ्या भूकंपाच्या हाद-याने रहिवासी भयभीत झाले आहेत.

वसई : दिवाळीच्या तिसऱ्या दिवसांपासून पालघर जिल्हयातील डहाणू , तलासरी तालुक्यात जाणवणाऱ्या भूकंपाच्या हाद-याने रहिवासी भयभीत झाले आहेत. त्यांच्यासाठी योग्य ती उपाययोजना करून त्यांना सरकारने दिलासा द्यावा असे साकडे आमदार हितेंद्र व क्षितीज ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांना घातले आहे. त्यांनी तसे निवेदन मुख्यामंत्र्यांना दिले.मागील तीन महिन्यांपासून डहाणू तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीच्या हद्दीत लहान मोठे भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. नागरिकांना घर सोडून बाहेर जावे लागत आहे. भिंतींना तडे, जाऊन घराची पडझड होत आहे. आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांची उपस्थित २० टक्क्यांपर्यंत घसरली आहे. इतर शाळेत ५० टक्के इतकी झाली आहे. १ फेब्रुवारी रोजी भूकंपाचे ५ धक्के बसले. त्यातील एक ४.१ रिश्टर स्केलचा होता. नागरिक यामुळे भयभीत झाले आहेत. हळदपाडा गावातील दोन वर्षाची चिमुरडी जिवाच्या आकांताने बाहेर आली मात्र दुर्दैवाने दगडावर डोके आपटून तिचा जागीच मृत्यू झाला. गेल्या चार महिन्यांपासून पालघर जिल्हावासीय भीतीच्या सावटाखाली आहेत डहाणू, तलासरी भागात होत असलेल्या भूकंपाला केवळ स्थानिक समस्या समजून दुर्लक्ष करणे योग्य होणार नाही. भूकंपग्रस्त भागापासून १८ किमी वर कुर्झे धरण, सूर्या प्रकल्पातील कवडास, धामणी धरणे आहेत. त्याशिवाय जव्हार येथे दमणगंगा, व वैतरणा खोरे देखील आहे. पालघर जिल्ह्यात ७७ प्रकल्पाची कामे सुरु आहेत तेवढीच कामे प्रस्तावित आहेत. गौण खानिजसाठी वारंवार सुरुंग लावून स्फोट केले जातात, रिलायन्स औष्णिक विद्युत केंद्र, तारापूर अणुशक्ती केंद्र, एमआयडीसी असे महत्वाचे प्रकल्प आहेत. भूकंपाची तीव्रता वाढली तर मोठया व देशासाठी महत्वाच्या असणाºया प्रकल्पाना धोका निर्माण होऊ शकतो. भूकंप नेमके का होतात, यातून सुटका कशी व कधी होणार या विचारात पालघरवासीय आहेत. डहाणू, तलासरी मध्ये एनडीआरएफचे पथक दाखल झाले असले तरी घरादारात राहणाºया नागरिकांच्या मनात दहशत आहे.>मानसिक आधार द्या!भूकंप कधी येईल हे सांगता येत नाही त्यामुळे अनेकांनी घराबाहेर संसार मांडला आहे त्याचे छत गेले आहे. अनेक गाव पाड्यातील नागरिक स्थलांतरित होत आहेत. या नागरिकांना मानसिक आधाराची देखील नितांत गरज आहे. असे या निवेदनात म्हटले आहे.