शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उपायोजना करून भूकंपग्रस्तांना दिलासा द्या -आमदारांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 00:10 IST

दिवाळीच्या तिसऱ्या दिवसांपासून पालघर जिल्हयातील डहाणू , तलासरी तालुक्यात जाणवणाऱ्या भूकंपाच्या हाद-याने रहिवासी भयभीत झाले आहेत.

वसई : दिवाळीच्या तिसऱ्या दिवसांपासून पालघर जिल्हयातील डहाणू , तलासरी तालुक्यात जाणवणाऱ्या भूकंपाच्या हाद-याने रहिवासी भयभीत झाले आहेत. त्यांच्यासाठी योग्य ती उपाययोजना करून त्यांना सरकारने दिलासा द्यावा असे साकडे आमदार हितेंद्र व क्षितीज ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांना घातले आहे. त्यांनी तसे निवेदन मुख्यामंत्र्यांना दिले.मागील तीन महिन्यांपासून डहाणू तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीच्या हद्दीत लहान मोठे भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. नागरिकांना घर सोडून बाहेर जावे लागत आहे. भिंतींना तडे, जाऊन घराची पडझड होत आहे. आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांची उपस्थित २० टक्क्यांपर्यंत घसरली आहे. इतर शाळेत ५० टक्के इतकी झाली आहे. १ फेब्रुवारी रोजी भूकंपाचे ५ धक्के बसले. त्यातील एक ४.१ रिश्टर स्केलचा होता. नागरिक यामुळे भयभीत झाले आहेत. हळदपाडा गावातील दोन वर्षाची चिमुरडी जिवाच्या आकांताने बाहेर आली मात्र दुर्दैवाने दगडावर डोके आपटून तिचा जागीच मृत्यू झाला. गेल्या चार महिन्यांपासून पालघर जिल्हावासीय भीतीच्या सावटाखाली आहेत डहाणू, तलासरी भागात होत असलेल्या भूकंपाला केवळ स्थानिक समस्या समजून दुर्लक्ष करणे योग्य होणार नाही. भूकंपग्रस्त भागापासून १८ किमी वर कुर्झे धरण, सूर्या प्रकल्पातील कवडास, धामणी धरणे आहेत. त्याशिवाय जव्हार येथे दमणगंगा, व वैतरणा खोरे देखील आहे. पालघर जिल्ह्यात ७७ प्रकल्पाची कामे सुरु आहेत तेवढीच कामे प्रस्तावित आहेत. गौण खानिजसाठी वारंवार सुरुंग लावून स्फोट केले जातात, रिलायन्स औष्णिक विद्युत केंद्र, तारापूर अणुशक्ती केंद्र, एमआयडीसी असे महत्वाचे प्रकल्प आहेत. भूकंपाची तीव्रता वाढली तर मोठया व देशासाठी महत्वाच्या असणाºया प्रकल्पाना धोका निर्माण होऊ शकतो. भूकंप नेमके का होतात, यातून सुटका कशी व कधी होणार या विचारात पालघरवासीय आहेत. डहाणू, तलासरी मध्ये एनडीआरएफचे पथक दाखल झाले असले तरी घरादारात राहणाºया नागरिकांच्या मनात दहशत आहे.>मानसिक आधार द्या!भूकंप कधी येईल हे सांगता येत नाही त्यामुळे अनेकांनी घराबाहेर संसार मांडला आहे त्याचे छत गेले आहे. अनेक गाव पाड्यातील नागरिक स्थलांतरित होत आहेत. या नागरिकांना मानसिक आधाराची देखील नितांत गरज आहे. असे या निवेदनात म्हटले आहे.