शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

चिकू बागायतींना फळपीक विम्याचे संरक्षण

By admin | Updated: July 10, 2016 00:29 IST

गेल्या दोन वर्षांपासून वंचित असलेल्या चिकू फळाला शासनाने अखेर पीक विम्याचे संरक्षण कवच दिले आहे. पुनर्रचित हवामानावर आधारित पीक विमा योजना चालू वर्षातील मृग

- अनिरुद्ध पाटील, डहाणू/बोर्डी

गेल्या दोन वर्षांपासून वंचित असलेल्या चिकू फळाला शासनाने अखेर पीक विम्याचे संरक्षण कवच दिले आहे. पुनर्रचित हवामानावर आधारित पीक विमा योजना चालू वर्षातील मृग बहाराकरिता असून, कर्जदार शेतकऱ्यांसाठी सक्तीची आहे. दरम्यान, अथक प्रयत्नानंतर योजना लागू झाल्याने, पालघर जिल्ह्यातील चिकू उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.पंतप्रधान पीक विमा योजनेंंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित पीक विमा योजना सन २०१६ च्या मृग बहाराकरिता चिकू फळाला लागू करण्यात आली आहे. यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत भरपाई दिली जाणार आहे. १ जुलै ते ३० सप्टेंबर २०१६ या कालावधीत हवेतील सापेक्ष आर्द्रता ९० टक्केपेक्षा जास्त सलग पाच दिवस राहिल्यास पंचवीस हजार रुपये आणि सलग दहा दिवस राहिल्यास पन्नास हजार रु पये देय राहील. दरम्यान, २०१३ साली चिकू फळाला पीक विम्याचे संरक्षण मिळाले होते. त्यानंतर शेतकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद लाभूनही, दोन वर्षांपासून विम्यापासून वंचित ठेवण्यात आले होते. याकरिता महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघाने शासनदरबारी पाठपुरावा केला मात्र, नैराश्य आले. अखेर पंतप्रधानांना साकडे घातल्यानंतर यश मिळाल्याचे महाराष्ट्र चिकू उत्पादक संघाचे अध्यक्ष विनायक बारी यांनी सांगितले.अडीच हजारांचा प्रति हेक्टरी हप्ता; १२ जुलैची अंतिम मुदत - शेतकऱ्यांना २,५०० रुपये विमा हप्ता (प्रतिहेक्टर) भरावयाचा आहे. शेतकऱ्यांनी प्रस्ताव पत्रक भरून रोख विमा रक्कम स्वत:चे खाते असणाऱ्या बँक शाखेत १२ जुलै या अंतिम मुदतीत भरायची असून, याकरिता कर्जदार शेतकऱ्यांचा सहभाग अनिवार्य करण्यात आला आहे.- पालघर जिल्ह्यात साडेसात हजार हेक्टर क्षेत्र चिकू बागायतीने व्यापले असून, त्यापैकी डहाणू तालुक्याचा वाटा साडेचार हजार हेक्टरचा आहे. त्यामुळे चिकू बागायतदारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.२०१३ सालानंतर चिकूला फळ पीक विम्यापासून वंचित ठेवण्यात आले. शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर दोन वर्षांच्या अथक प्रयत्नाने विम्याचे कवच प्राप्त झाल्याने चिकू उत्पादक आनंदी झाले आहेत. - विनायक बारी,अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघ.फळ पीक विम्याचा लाभ तालुक्यातील अधिकाधिक चिकू उत्पादक शेतकऱ्यांनी घ्यावा. या योजनेमुळे बागायतदार व शेतकऱ्यांचे सांभाव्य नुकसानी पासून संरक्षण होईल. - आर.यू. ईभाड, कृषी अधिकारी, डहाणू.