शहरं
Join us  
Trending Stories
1
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
2
'निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने कारण शोधण्याचा खटाटोप'; शिष्ठमंडळाच्या बैठकीवर शंभूराज देसाईंची टीका
3
आजही सोन्यात तेजी, पण चांदीचे दर घसरले; पाहा १८,२२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर
4
"...तेव्हा तर अजित पवार तावातावाने बोलत होते"; मतदार याद्यांच्या घोळावरुन बोलताना राज ठाकरेंनी सुनावलं
5
अजब देश! संसद, सरकार, सैन्य सगळं आहे, पण जगाच्या नकाशावर अस्तित्वच नाही, कारण काय?
6
तामिळनाडूत हिंदी गाणी, चित्रपट आणि जाहिरातींवर बंदी; स्टॅलिन सरकारने आणले विधेयक
7
AFG vs BAN : वयाच्या चाळीशीत नबीनं रचला इतिहास; पाक खेळाडूच्या वर्ल्ड रेकॉर्डला लावला सुरुंग
8
Good News: महागाई ते ट्रेड डील पर्यंत... मोदी सरकारसाठी दोन दिवसांत आल्या एका पाठोपाठ एक ४ गुड न्यूज
9
'निवडणूक आयोगाची वेबसाईट बाहेरुन कोण तर चालवतंय', जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
"माझ्या नवऱ्याला मार, नाहीतर मी..."; ५ मुलांच्या आईचा हट्ट, बॉयफ्रेंडपेक्षा १२ वर्षांनी आहे मोठी
11
“माओवाद १०० टक्के संपणार, भूपतीची शरणागती मोठी गोष्ट”; CM फडणवीसांनी केले पोलिसांचे अभिनंदन
12
“राहुल गांधींनी मतदारयादीतील घोळ देश पातळीवर मांडला, हे निकोप लोकशाहीला घातक”: थोरात
13
प्रॅक्टिस वेळी 'दादागिरी'; Live मॅचमध्ये आली तोंडावर पडण्याची वेळ! पृथ्वीसह चौघांच्या पदरी भोपळा
14
"पत्नीला म्हणाले, बसमध्ये बसलोय", तो कॉल ठरला शेवटचा, जितेशचा होरपळून गेला जीव; ओळखही पटेना
15
तालिबानकडे मिसाईल कुठून आली? हल्ला होताच गाफिल पाकिस्तान हादरला; ६५ वर्षांपूर्वी...
16
Pankaj Dheer Death: 'महाभारत'मधील 'कर्ण' काळाच्या पडद्याआड, अभिनेते पंकज धीर यांचं कर्करोगानं निधन
17
बाबासाहेब पाटलांनी पालकमंत्रिपद सोडलं, त्यांच्या जागी 'या' नेत्याला मिळाली जबाबदारी
18
दिवाळीपूर्वी 'या' दिग्गज कंपनीचा मोठा झटका! १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार? काय आहे कारण?
19
Priyal Yadav : प्रेरणादायी! वडील तिसरी, आई सातवी पास; अकरावी नापास प्रियल कशी झाली डेप्युटी कलेक्टर?
20
'जंगलात जरी बोलवलं तरी गेलो असतो'; पोलिसांना दिलेले वचन CM फडणवीसांनी पूर्ण केले, कार्यक्रम रद्द करुन पोहोचले गडचिरोलीत

वीज ग्राहकांवर अन्यायकारक दरवाढीचा प्रस्ताव, नागरिक नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 01:00 IST

आधीच महागाई आणि त्यात आता महावितरण विभागाने केलेल्या अन्यायकारक दरवाढीमुळे ग्राहकांवर मोठे आर्थिक संकट कोसळणार आहे.

पालघर : येत्या पाच वर्षांत वीज ग्राहकांवर ६० हजार ३१३ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार देणारा तसेच सरासरी २०.०४ टक्के अन्यायकारक दरवाढ लादणारा प्रस्ताव वीज महावितरण कंपनीने वीज नियामक आयोगाकडे दाखल केला आहे. महाराष्ट्रातील वीज दरवाढ ही इतर राज्यातील वीज दरापेक्षा जास्त आहे. या दरवाढीविरोधात कायदेशीर लढा उभारण्यासाठी पालघर येथील महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने ग्राहकांच्या सह्यांची मोहीम राबवली. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

आधीच महागाई आणि त्यात आता महावितरण विभागाने केलेल्या अन्यायकारक दरवाढीमुळे ग्राहकांवर मोठे आर्थिक संकट कोसळणार आहे. त्यामुळे नव्याने आलेल्या सरकारने तत्काळ या प्रस्तावित वीजदरवाढी-विरोधात हस्तक्षेप करत फेरविचार करून निर्णय घेण्यासाठी हा संपूर्ण प्रस्ताव तातडीने मागे घ्यावा, अशी मागणीही या निमित्ताने वीज ग्राहक संघटनेच्या पालघर शाखेने सही मोहिमेच्या माध्यमातून शासनाकडे केली आहे. वीज ग्राहक संघटनेच्या शिष्टमंडळातर्फे अध्यक्ष प्रकाश लवेकर यांनी मुख्यमंत्री तसेच ऊर्जामंत्र्यांना देण्यासाठीचे निवेदन पालघरचे अधीक्षक अभियंता किरण नागावकर यांच्याकडे सुपूर्द केले.

या वेळी संघटनेचे कार्यवाह निखिल मेस्त्री, सुभाष मोरे, अरविंद पाटील आदी उपस्थित होते. नवीन प्रस्तावित २०.०४ टक्के ही वीज दरवाढ शेती पंप, सर्वसामान्य घरगुती वीज ग्राहक, तसेच अन्य वीज ग्राहक आणि औद्योगिक वीज ग्राहक यांचे कंबरडे मोडणारे आहे. महा वीजनिर्मिती, परिवहन आणि वितरण या वीज कंपनीच्या कारभारात कार्यक्षमता आणून वीज गळती, वीज चोरी व भ्रष्टाचार यावर नियंत्रण आणून उत्पन्नात वाढ करण्याचा मार्ग अवलंबणे अपेक्षित असताना वीज दरवाढ करून सर्वसामान्यांवर अन्याय करणाऱ्या या निर्णयाविरोधात ग्राहकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जात आहे.प्रस्ताव रद्द करा...प्रचंड दरवाढीचा बोजा लादणारा असा हा प्रस्ताव आहे. त्यामुळे हा प्रस्ताव मागे घेणे हेच ग्राहकांच्या व राज्याच्या हिताचे ठरणार आहे. यासाठी राज्य शासनाने वेळीच पावले उचलून हा दरवाढीचा प्रस्ताव रद्द करावा, अशी मागणी जोर धरत आहे. या मोहिमेत संघटनेचे विद्याधर ठाकूर, चंद्रकांत साखरे, राजू मौर्य, रंगराव गढरी आदी उपस्थित होते.

टॅग्स :palgharपालघर