शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय! सनाई ताकाईची बनल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान
2
'स्वत:ला सरकार समजू नका'; मेधा कुलकर्णींच्या 'शुद्धीकरणा'मुळे महायुतीत फूट; मित्रपक्षांकडून 'धार्मिक तेढ' वाढवल्याचा आरोप
3
पाकिस्तान-अफगाणिस्तान शस्त्रसंधी संकटात! एका ओळीवर अवलंबून, पाक संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान
4
Muhurat Trading: शेअर बाजारात आज फक्त १ तास! जाणून घ्या 'मुहूर्त ट्रेडिंग'ची अचूक वेळ 
5
बुद्धिबळ जगताला मोठा धक्का! अमेरिकेचा 'ग्रँडमास्टर' डॅनियल नरोडित्स्की याचे २९ व्या वर्षी निधन
6
टोल कंपनीने ११०० रुपये बोनस दिला; टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनी असा बदला घेतला, १० हजार गाड्या फ्रीमध्ये सोडल्या...
7
नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील आगीत ६ वर्षांच्या मुलीसह ४ जणांचा मृत्यू, १० जण जखमी
8
असरानी यांच्या निधनानंतर अक्षय कुमार भावुक; म्हणाला, "दोन आठवड्यांपूर्वीच..."
9
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
10
नवी मुंबईत भीषण आगीत होरपळून माय-लेकीचा मृत्यू; सिलिंडर स्फोटानंतर इतर बाहेर पडले पण दोघी अडकल्या
11
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
12
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
13
रात्री पार्टी, बहिणीला व्हिडीओ कॉल अन् पहाटे पत्नीचा मृत्यू; मृतदेह सोडून विधानसभा अध्यक्षांचा पुतण्या फरार
14
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
15
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
16
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
17
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
18
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
19
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...

सातपाटीसाठी 300 काेटींचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 00:56 IST

बंदराच्या विकासासाठी तज्ज्ञ पथकाकडून पाहणी : पदुम विभागाच्या सचिवांची माहिती

पालघर : जिल्ह्यातील प्रगतिशील मासेमारी बंदर म्हणून प्रसिद्ध असलेल्या सातपाटी बंदराच्या विकासासाठी केंद्राच्या तज्ज्ञ टीमसह महाराष्ट्र मत्स्य विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच पाहणी केली. या पाहणीनंतर बंदर विकासासाठी ३०० कोटींच्या निधीच्या प्रस्तावाचे काम सुरू केल्याचे पदुम विभागाचे सचिव अनुप कुमार यांनी सांगितले.

पापलेटसाठी जगभर प्रसिद्ध असलेले सातपाटी बंदर काही वर्षांपासून अनेक समस्यांनी ग्रस्त असून मासेमारी व्यवसायामध्ये अनेक अडचणी निर्माण होत आहेत. संपूर्ण खाडी गाळाने साचल्याने मासेमारीपासून वंचित राहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर ११ जानेवारी रोजी पशू, दुग्ध,मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव अनुपकुमार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती सहकारी संघाचे अध्यक्ष जयकुमार भाय, एनएफएफच्या सचिव आणि शिवसेना संघटक ज्योती मेहेर, सातपाटी मच्छीमार मध्यवर्ती सहकारी संस्थेचे चेअरमन राजन मेहेर, कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी, वडराई मच्छीमार संस्थेचे चेअरमन मानेंद्र आरेकर, माधुरी शिवकर, मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त अतुल पाटणे, सहायक आयुक्त राजेंद्र जाधव, आनंद पालव, मेरिटाइम बोर्डचे सावंत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील मच्छीमार संस्थांकडून यांत्रिकी नौकांना पुरवण्यात येणाऱ्या डिझेलवर मिळणाऱ्या अनुदानरूपी परताव्याच्या स्वरूपात मिळणाऱ्या २२ कोटी रुपयांपैकी फक्त पाच कोटी रुपये मिळाल्याने उपस्थित मच्छीमार प्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे उर्वरित सर्व रक्कम मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवल्याचे सांगून लवकरच मंजुरी मिळेल, असे सचिव अनुप कुमार यांनी सांगितल्याची माहिती ज्योती मेहेर यांनी दिली. जानेवारीपासून सुरू करण्यात येणारे ओएनजीसीचे सेसमिक सर्वेक्षण जानेवारीऐवजी १ मे ते १५ जून या मासेमारी बंदच्या काळात करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. मच्छीमारांना नुकसानभरपाई देण्या-बाबत चर्चा करून निर्णय घेण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली.

खाडीच्या सर्वेक्षणाचे काम सुरूnखाडीतील गाळ काढण्याबाबत प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचे सांगून खाडीत सध्या पाईल जेट्टीच्या कामाला सुरुवात झाली असून त्यानंतर गाळ कमी होण्यास मदत होईल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला.nखाडीच्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन (डीपीडीसी)च्या निधीद्वारे नौका नयन मार्गातील तात्पुरता गाळ काढण्याचे प्रयत्न व्हावेत असे मेरिटाइम बोर्डाकडून सुचविण्यात आले. 

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार