शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
2
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
3
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
4
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
5
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
6
राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
7
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
9
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
10
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
11
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
12
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
13
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   
14
पक्के घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार! PM आवास योजनेची मुदत वाढवली, कशी आहे प्रक्रिया?
15
१८ महिन्यांनी राहु-केतु गोचर: शनीशी अशुभ युती संपणार; ८ राशींना बंपर लाभ होणार, शुभच घडणार!
16
परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३' सोडला, दिग्दर्शक प्रियदर्शन यांची आली प्रतिक्रिया; म्हणाले...
17
पहलगाम हल्ल्याच्या ठिकाणाचे नाव बदलून 'शहीद हिंदू घाटी पर्यटन स्थळ' करा, उच्च न्यायालयात याचिका
18
भाच्याच्या प्रेमासाठी पतीची हत्या करुन शेजाऱ्यांना पाठवलं जेलमध्ये, सत्य समजताच हादरले पोलीस
19
3 दिवसांत सर केली हिमालयाची 5 शिखरे, CISFच्या महिला अधिकाऱ्याची ऐतिहासिक कमगिरी
20
जम्मू-काश्मीरमधील सुरनकोट मंदिरावरील हल्ल्यात पाकिस्तानचा हात; SIA कडून मोठा खुलासा

प्रचाराच्या तोफा थंडावणार, आज संध्याकाळी पाचपर्यंत रणधुमाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 01:36 IST

पालघर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे.

पालघर : पालघर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रचारसभा होत आहेत, तर काही उमेदवारांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर दिला आहे. प्रचाराच्या तोफा रविवारी संध्याकाळी पाच वाजता थंडावणार आहेत. त्यामुळे शनिवारी अनेक नेत्यांनी जिल्ह्यात भेटी देऊन जाहीर प्रचार सभा तसेच पत्रकार परिषदा घेतल्या. शिवसेनेतील नाराजांची नाराजी दूर करण्यासाठी कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनीही जिल्ह्याचा धावता दौरा केला. दरम्यान, कोणत्याच पक्षामध्ये थेट युती-आघाडी झालेली नसल्यामुळे तालुक्यात बहुरंगी लढती होत आहेत.पालघर जिल्हा परिषदेच्या गट व विक्रमगड पंचायत समितीच्या गणांच्या निवडणुकीसाठी येत्या ७ जानेवारीला मतदान होणार आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. कोणता पक्ष व उमेदवार प्रचारात आघाडी घेऊन बाजी मारणार यांच्याकडे मतदारांमध्ये देखील उत्सुकता लागली आहे.स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रत्येक पक्षाने आपले उमदेवार स्वतंत्र उभे केल्याने आपला उमदेवार कसा निवडून येईल व विजयी होईल यासाठी प्रयत्न करून आपला पक्ष कसा सरस ठरेल याची रणनीती प्रत्येक पक्ष आखताना दिसत आहे. सर्वच पक्षाचा प्रचार शिगेला पोहचला असून सर्वांचे पालघर जिल्ह्याकडे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, विक्रमगड तालुक्यातील आलोंडा गटात बिग फाईट पाहायला मिळणार आहे.>भाजपची भूमिका महत्त्वाची ठरणार२०१५ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत आलोंडा गटात भाजप विजयी झाली होती तर आलोंडा व चिंचघर गणात भाजप विजयी झाली होती. मात्र या यंदाच्या निवडणुकीत ऐनवेळी भाजप उमेदवाराने माघार घेतल्याने मुख्य लढत पालघर विकास आघाडीचे अपक्ष उमेदवार नीलेश सांबरे व शिवसेनेचे मिठाराम भोईर यांच्यामध्ये होणार आहे. असे असले तरी या गटात भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात असून भाजपचा उमेदवार नसल्याने भाजप कोणाला मदत करते यावर सर्व अवलंबून आहे.>आलोंडा गटात आम्ही कोणालाही पाठिंबा दिलेला नाही आहे. पाठिंबा देण्याबाबत कुठलाही निर्णय झालेला नसून वरिष्ठ पातळीवर याबाबत चर्चा सुरू आहे.-संदीप पावडे, तालुका अध्यक्ष, भाजप>आलोंडा गटात आम्ही शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला असून गणात आमच्या उमेदवाराला शिवसेनेने पाठिंबा दिला आहे.-तुषार सांबरे, तालुका अध्यक्ष, श्रमजीवी संघटना