शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पर्यावरण संवर्धनकडून परिवहनचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 22:59 IST

वीस नागरिकांचा मृत्यू; ठेकेदाराचा ठेका रद्द करुन महापालिकेने ताब्यात घ्यावा

वसई : पर्यावरण संवर्धन समितीतर्फे महानगरपालिका परिवहन बसखाली सापडून मृत्यू पावलेल्या व्यक्तींना पालिका मुख्यालयासमोर सोमवारी संध्याकाळी श्रद्धांजिल वाहण्यात आली. परिवहनच्या बसखाली सापडून मृत पावलेल्या विस निष्पाप मृत व्यक्तींना सर्वस्वी परिवहनचा खाजगी ठेकेदार जवाबदार असल्याचा आरोप पर्यावरण संवर्धन समितीतर्फे करण्यात आला.पालिका आयुक्तांना निवेदन देत ठेकेदाराचा ठेका रद्द करून परिवहन सेवा पालिकेने स्वत: हाती घेऊन चालवावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी समन्वयक समीर वर्तक, आगरी सेनेचे कैलाश पाटील, मॅकेन्झी डाबरे, अ‍ॅड. खलील शेख, प्रहारचे पालघर जिल्हा अध्यक्ष हितेश जाधव, विक्र ांत चौधरी, एस टी कामगार युनियनचे सोहन नाईक, पायस मच्याडो, डेरिक फुर्ताडो, दर्शन राऊत, यज्ञेश कदम, फारूक मुल्ला, अ‍ॅड. झहीर शेख, विकी लोपीस, डिक्सन, आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.बारा दिवसांपूर्वी भुईगांव येथील कमल गोविंद जोशी या महिलेचा बसखाली चिरडून मृत्यू झाला होता. परिवहनच्या बसखाली सापडून तब्बल वीस नागरिकांचा बळी गेल्यानंतरही परिवहनच्या ठेकेदाराला जाग न आल्यामूळे पर्यावरण संवर्धन समितीतर्फे सोमवारी मृत कमल जोशी यांच्या तेराव्याला श्रद्धांजली कार्यक्र म मुख्यालयासमोर ठेवला होता. यावेळी शेकडो नागरिक उपस्थित होते. परिवहन सेवा मेसर्स भगीरथी ट्रान्सपोर्ट मार्फत चालविली जाते.पर्यावरण संवर्धन समितीतर्फे आजच निवेदन देण्यात आलेले आहे. याबाबत चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल.- बळीराम पवार, आयुक्त,वसई विरार शहर महानगरपालिका