शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांच्या दिमतीला खाजगी कार

By admin | Updated: March 14, 2016 01:33 IST

वसई -विरार महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या दिमतीसाठी भाडे तत्वावर गाड्या घेताना टी परमिटच्या गाड्या न घेता खाजगी गाड्या घेत असल्याने परिवहन खात्याचा वर्षाला

शशी करपे,  वसईवसई -विरार महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या दिमतीसाठी भाडे तत्वावर गाड्या घेताना टी परमिटच्या गाड्या न घेता खाजगी गाड्या घेत असल्याने परिवहन खात्याचा वर्षाला किमान सात लाखाचा कर बुडत असून हा प्रकार गेल्या सहा वर्षांपासून सुुरु असल्याची धक्कादायक माहिती लोकमतच्या हाती लागली आहे. विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षात निविदा न काढताच ठेकेदारांना मुदतवाढ दिल्याची माहितीही हाती आली आहे. महापालिकेने गेल्या आर्थिक वर्षात ठेका न काढताच जुन्या ठेकेदारांना मुदतवाढ देऊन एकूण ३८ गाड्या भाड्याने घेतल्या आहेत. यामध्ये १६ बोलेरो, १७ मारुती स्विफ्ट, चार तवेरा आणि एक इनोव्हा यांचा समावेश आहे. यातील इनोव्हा गाडी आयुक्तांसाठी आहे. बोलेरो गाडयांसाठी महिन्याला ४७ हजार रुपये, मारुती स्विफ्टसाठी महिन्याला ३८ हजार रुपये, तवेरासाठी महिन्याला ५६ हजार रुपये आणि इनोव्हासाठी महिन्याला ६७ हजार रुपये भाडे दिले जाते. या ३८ गाड्यांसाठी पालिका दरवर्षी १ कोटी ९५ लाख ३१ हजार रुपये भाडे अदा करते. आता पुढील वर्षांसाठी पहिल्यांदाच तीन वर्षांनी निविदा मागवण्यात आल्या आहेत. वसई विरार पालिकेची स्थापना होऊन सातवे वर्ष सुरु आहे. दरवर्षी पालिका भाड्याने गाड्या घेत असते. पण, पालिकेकडून खाजगी गाड्या भाडे तत्वावर घेताना ठेकेदाराकडून टी परमिटच्या गाड्या पुरवल्या जात नसतांनाही पालिकेकडून दुर्लक्ष केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते. दुसरीकडे, प्रवासी वाहतूकीचा संशय असल्याने खाजगी गाड्यांची वारंवार तपासणी करणाऱ्या आरटीओकडूनही डोळेझाक केली जात असल्याचे उजेडात आले आहे. खाजगी गाड्यांच्या भाड्यापोटी पालिकेने ठेकेदारांना गेल्या पाच वर्षांत अंदाजे नऊ कोटींच्या घरात पैसे दिले आहेत. तर खाजगी गाड्यांचा व्यावसायिक वापर करून नऊ कोटी रुपये कमावणाऱ्या ठेकेदारांनी टी परमिट न घेतल्याने परिवहन खात्याचा सुमारे तीस लाखाच्या आसपास कर बुडवला आहे. महाराष्ट्र मोटार वाहन कायदा कलम ६६ (१), १९२ (अ) अन्वये प्रवासी वाहतूक परवाना न घेता वैयक्तिक वाहनांमधून वाहतूक करून व्यवसाय केला जात असल्यास तो दंडनिय अपराध आहे. असे असताना वाहतूक विभागाकडून आतापर्यंत कधीही कारवाई करण्यात आली नसल्याचे उजेडात आले आहे. १वैयक्तिक वाहनांचा अपघात होऊन त्यात जिवीतहानी झाल्यास विम्याचा कोणताही लाभ मिळत नाही. टी परमिट गाड्यांचा अपघात झाल्यास आर्थिक लाभ मिळतो. या गंभीर बाबीकडे पालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते. सध्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी गाड्या देण्यात आल्या आहेत. काही अधिकारी आणि सर्वच पदाधिकारी स्वत:च्या गाड्या वापरतात. त्याबदल्यात त्यांना वाहन भत्यापोटी दरमहा ३५ हजार रुपये दिले जातात. २महाराष्ट्र मोटार वाहन कायद्यानुसार, भाडे तत्वावर गाड्या पुरवताना संबंधित व्यक्तीने टी परमिट अर्थात प्रवासी वाहतूक परवाना घेणे बंधनकारक आहे. वैयक्तीक वापरासाठी स्वत: गाडी विकत घेतल्यास या परवान्याची गरज नसते. पण, गाड्ी भाड्याने देऊन व्यवसय केला जात असल्याने त्यांच्यासाठी महाराष्ट्र मोटार वाहन कायद्यानुसार टी परमिट घेणे बंधनकारक असते.३ यातून परिवहन खाते दरवर्षी अशा चारचाकी वाहनांकडून किमान पंधरा ते वीस हजार रुपये कर वसूल करीत असते. पण,पालिकेच्या ताफ्यात ठेकेदारांनी टी परमिटशिवायच खाजगी गाड्या पुरवून परिवहन खात्याचा लाखो रुपयांचा कर बुडवला असून पालिका अधिकारी आणि आरटीओकडून कोणतीच कारवाई केली नसल्याचे उजेडात आले आहे.