शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

नारळी पौर्णिमेची जोरदार तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 00:43 IST

किनारपट्टीवरील मच्छीमार गावात उद्या साजरा होणाऱ्या नारळी पौर्णिमेची जोरदार तयारी सुरू असून आपल्या परंपरागत पेहरावात नाचत गात सोनेरूपी नारळ दर्या राजाला अर्पण केला जाणार आहे.

पालघर : किनारपट्टीवरील मच्छीमार गावात उद्या साजरा होणाऱ्या नारळी पौर्णिमेची जोरदार तयारी सुरू असून आपल्या परंपरागत पेहरावात नाचत गात सोनेरूपी नारळ दर्या राजाला अर्पण केला जाणार आहे. यावेळी समुद्रात मासेमारीला गेलेल्या आमच्या धन्याचे रक्षण करून ‘बोटीला भरपूर मासे मिळू दे’, अशी प्रार्थना यावेळी करण्यात येणार आहे.मासेमारी बंदी कालावधी सुरू झाल्यानंतर किनारपट्टीवरील सर्व मासेमारी बंदी होते. सर्व मच्छीमार आपल्या बोटी किनाºयावर नांगरून ठेवतात. पावसाळी बंदीचा कालावधी उलटून गेल्यानंतर मासेमारी हंगामाला सुरुवात करण्यापूर्वी किनारपट्टीवरील कोळीवाड्यात गावागावातून सोने रुपी नारळाची तयारी करून तरु ण - तरु णी, महिलावर्ग लुगडे नेसून तर पुरु ष वर्ग कंबरेला रुमाल, डोक्यावर टोपी असा पेहराव करून समुद्राला नारळ अर्पण करायला जात असतात. यावेळी सर्व भागात उत्साहाचे वातावरण असते. काही गावात कोळीगीतांचे कार्यक्रम आयोजित करीत असतात. मुरबे, सातपाटी, केळवे, दांडी, नवापूर, तारापूर, डहाणू, चिंचणी आदी भागात मोठ्या प्रमाणात मिरवणुका काढल्या जातात. काही वर्षांपूर्वी नारळीपौर्णिमा किंवा १५ आॅगस्ट यापैकी पहिला दिवस येईतो मासेमारी बंदी होती.मासेमारी बंदी कालावधी ९१ दिवसांचा असावामंत्रालयीन पातळीवर काही अधिकाऱ्यांना खाजगी भांडवलदार मच्छीमारांकडून चुकीची माहिती पुरवल्याने महाराष्ट्र शासनाने आता १ जून ते ३१ जुलै अशी अवघ्या ६१ दिवसाचा अत्यल्प असा मासेमारी बंदी कालावधी घोषित केल्याचे मच्छीमार संघटनांचे म्हणणे आहे.महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील बहुतांश मच्छीमारांनी १५ मे ते १५ आॅगस्ट किंवा नारळी पौर्णिमेपर्यंत ९१ दिवसांचा मासेमारी बंदी कालावधी घोषित करावा अशी मागणी रेटून धरली आहे. परंतु शासन पातळीवरून अद्याप त्याचा विचार झालेला नाही.

टॅग्स :cultureसांस्कृतिकfishermanमच्छीमारVasai Virarवसई विरार