शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

नारळी पौर्णिमेची जोरदार तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 00:43 IST

किनारपट्टीवरील मच्छीमार गावात उद्या साजरा होणाऱ्या नारळी पौर्णिमेची जोरदार तयारी सुरू असून आपल्या परंपरागत पेहरावात नाचत गात सोनेरूपी नारळ दर्या राजाला अर्पण केला जाणार आहे.

पालघर : किनारपट्टीवरील मच्छीमार गावात उद्या साजरा होणाऱ्या नारळी पौर्णिमेची जोरदार तयारी सुरू असून आपल्या परंपरागत पेहरावात नाचत गात सोनेरूपी नारळ दर्या राजाला अर्पण केला जाणार आहे. यावेळी समुद्रात मासेमारीला गेलेल्या आमच्या धन्याचे रक्षण करून ‘बोटीला भरपूर मासे मिळू दे’, अशी प्रार्थना यावेळी करण्यात येणार आहे.मासेमारी बंदी कालावधी सुरू झाल्यानंतर किनारपट्टीवरील सर्व मासेमारी बंदी होते. सर्व मच्छीमार आपल्या बोटी किनाºयावर नांगरून ठेवतात. पावसाळी बंदीचा कालावधी उलटून गेल्यानंतर मासेमारी हंगामाला सुरुवात करण्यापूर्वी किनारपट्टीवरील कोळीवाड्यात गावागावातून सोने रुपी नारळाची तयारी करून तरु ण - तरु णी, महिलावर्ग लुगडे नेसून तर पुरु ष वर्ग कंबरेला रुमाल, डोक्यावर टोपी असा पेहराव करून समुद्राला नारळ अर्पण करायला जात असतात. यावेळी सर्व भागात उत्साहाचे वातावरण असते. काही गावात कोळीगीतांचे कार्यक्रम आयोजित करीत असतात. मुरबे, सातपाटी, केळवे, दांडी, नवापूर, तारापूर, डहाणू, चिंचणी आदी भागात मोठ्या प्रमाणात मिरवणुका काढल्या जातात. काही वर्षांपूर्वी नारळीपौर्णिमा किंवा १५ आॅगस्ट यापैकी पहिला दिवस येईतो मासेमारी बंदी होती.मासेमारी बंदी कालावधी ९१ दिवसांचा असावामंत्रालयीन पातळीवर काही अधिकाऱ्यांना खाजगी भांडवलदार मच्छीमारांकडून चुकीची माहिती पुरवल्याने महाराष्ट्र शासनाने आता १ जून ते ३१ जुलै अशी अवघ्या ६१ दिवसाचा अत्यल्प असा मासेमारी बंदी कालावधी घोषित केल्याचे मच्छीमार संघटनांचे म्हणणे आहे.महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील बहुतांश मच्छीमारांनी १५ मे ते १५ आॅगस्ट किंवा नारळी पौर्णिमेपर्यंत ९१ दिवसांचा मासेमारी बंदी कालावधी घोषित करावा अशी मागणी रेटून धरली आहे. परंतु शासन पातळीवरून अद्याप त्याचा विचार झालेला नाही.

टॅग्स :cultureसांस्कृतिकfishermanमच्छीमारVasai Virarवसई विरार