शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे; ५ जुलैला होणारा ठाकरे बंधुंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेतून सातपाटी बंदरासाठी निधी मंजूर; लवकरच होणार कामाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 02:04 IST

मच्छीमारांचे अन्य प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आपण लवकरच जिल्ह्यात येऊ, असे आश्वासनही त्यांनी दिल्याने अनेक समस्या मार्गी लागण्याची संधी उपलब्ध होणार आहे

पालघर : जिल्ह्यातील सातपाटी आणि रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे ही दोन मच्छीमारी बंदरे विकसित करण्यासाठी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेतून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, लवकरच या कामाला सुरुवात केली जाणार आहे.

जिल्ह्यातील मच्छीमारांचे डिझेल परतावे, सातपाटी खाडीत साचलेला गाळ, प्रस्तावित धूप प्रतिबंधक बंधारे, पंचम कोळंबी प्रकल्प, सफाळे यांच्या लीजचे नूतनीकरण न करणे आदी अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी विश्वास फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. विश्वास वळवी यांनी मंगळवारी मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांची भेट घेतली. पालघर जिल्ह्यातील मच्छीमार सहकारी संस्थांच्या ४ कोटी ८५ लाखांच्या डिझेल परताव्याच्या रकमेची तरतूद करण्यात आली असून, येत्या अधिवेशनात त्याला मंजुरी घेऊन मार्च २०२१ च्या आत त्याचे वितरण केले जाईल, असेही मंत्री शेख यांनी सांगितले. मच्छीमारांचे अन्य प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आपण लवकरच जिल्ह्यात येऊ, असे आश्वासनही त्यांनी दिल्याने अनेक समस्या मार्गी लागण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

जिल्ह्याला ११२ किमीचा विस्तीर्ण किनारा लाभला असून हजारो बोटींद्वारे मासेमारी केली जाते. आपल्या मासेमारीच्या व्यवसायातून शासनाला कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन मिळवून देणाऱ्या मच्छीमार समाजाच्या समस्या आणि मागण्यांकडे अनेक वर्षांपासून दुर्लक्ष केले जात आहे. मच्छीमारांचे पर्ससीन आणि एलईडी या बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या मासेमारीविरोधात कडक कायदे अंमलात आणणे आणि गस्ती पथकांची संख्या वाढवणे आदी प्रश्न मत्स्यव्यवसाय मंत्र्यांच्या कानी घालून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री एकनाथ शिंदे, संपर्कप्रमुख आ. रवींद्र फाटक यांच्या व महाआघाडी सरकारद्वारे सोडविण्यासाठी डॉ. वळवी पुढे सरसावले असून लवकरच मत्स्यव्यवसायमंत्र्यांना जिल्ह्यात आणणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :fishermanमच्छीमार