शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

प्रधानमंत्री मातृवंदना योजना ठरतेय गर्भवतींसाठी संजीवनी; बालमृत्यूचं प्रमाण कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2021 02:01 IST

२७५७ मातांची नोंदणी, गर्भवती महिलांना सकस आहार देऊन सुदृढ बालक जन्माला यावे, हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे.  

संजय नेवेविक्रमगड : माता व बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू केली आहे. यामुळे तालुक्यात बालमृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे. विक्रमगड तालुक्यातील २,७५७ मातांची नोंदणी करण्यात आलेली असून संबंधित लाभार्थ्यांना बँक खात्यात १ कोटी ९४ लाख ५ हजार रुपये एवढे अनुदान जमा करण्यात आले आहे.  

गर्भवती महिलांना सकस आहार देऊन सुदृढ बालक जन्माला यावे, हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे.  ग्रामीण भागात राहणाऱ्या सर्व स्तरातील पहिल्या वेळेस गरोदर राहिलेला महिलांना सकस आहार घेण्यास प्रवृत्त करण्यात आले आहे. यासाठी तीन टप्प्यात अनुदान वाटप केले जाते. ५ हजाराचे अनुदान मिळत असून एक हजार रुपये पहिल्या टप्प्यात, दुसऱ्या टप्प्यात २ हजार रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात २ हजार रुपये अनुदान मिळत आहे. एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत पहिल्यांदाच गर्भवती राहणाऱ्या २,७५७ महिलांना १ कोटी ९४ लाख ५ हजार रुपयांच्या अनुदानाचा लाभ मिळाला आहे. आरोग्यसेवक, सेविका, आशा  स्वयंसेविका यांच्यामार्फत मातृवंदना योजनेचा प्रचार प्रसार केला जातो. प्रथम गरोदर राहिलेल्या महिलांच्या नावाची नोंदणी केली जाते.

आवश्यक कागदपत्रे 

लाभार्थी व तिच्या पतीचे आधारकार्ड, लाभार्थीचे आधार संलग्न बँक खाते, गरोदरपणाची शासकीय आरोग्य संस्थेत १५० दिवसाच्या आत नोंद, शासकीय संस्थेत गरोदर काळात तपासणी, बाळाची जन्म नोंदणी व प्राथमिक लसीकरण.  

टॅग्स :Vasai Virarवसई विरार