शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

‘प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचा’ वसईत बोजवारा

By admin | Updated: August 20, 2016 04:22 IST

निकृष्ट दर्जाचे काम केल्याने कामण येथील देवकुंडी रस्ता वाहून गेला असून ठिकठिकाणी मोठाले खड्डे पडले आहेत. अवघ्या तीनच वर्षात दोन कोटीचा रस्ता वाहून गेल्याने

वसई : निकृष्ट दर्जाचे काम केल्याने कामण येथील देवकुंडी रस्ता वाहून गेला असून ठिकठिकाणी मोठाले खड्डे पडले आहेत. अवघ्या तीनच वर्षात दोन कोटीचा रस्ता वाहून गेल्याने प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील कामाबद्दल संशय व्यक्त करण्यात येत आहे. वसई तालुक्यातील निसर्गाच्या कुशीत वसलेल्या देवकुंडी या छोट्याशा आदिवासी पाड्यात जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने देवकुंडी येथे जाणे-येणे अतिशय जिकरीचे होते. पावसाळ्यातील चार महिने तर नदी नाले ओलांडून अडीच किमीचा कच्चा रस्ता तुडवीत, घनदाट जंगलातून देवकुंडी पाड्यातील ग्रामस्थांना बाजारहाट करण्यासाठी कामण, पोमण येथे यावे लागत होते. तत्कालीन केंद्रीय मंत्री राम नाईक यांना देवकुंडी ग्रामस्थांना रस्त्याअभावी भेडसावणाऱ्या समस्यांची जाणीव झाली. वाजपेयी सरकारने ‘पंतप्रधान ग्राम सडक योजना’ सुरु केली होती. म्हणून देवकुंडी येथील आदिवासी ग्रामस्थांना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून राम नाईक यांनी या योजनेचा पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळेच २०१३ मध्ये या योजनेतून २ कोटी ८ लाख ३६ हजार २५८ रुपयांचा निधी मंजूर होऊन या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. परंतु ठेकेदारावर कोणाचाच अंकूश नसल्याने या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले. सध्या हा रस्ता पुर्णपणे उखडून गेला आहे. नदीवर बांधलेल्या पूलावरील सळ्या उघड्या पडल्या.देवकुंडी पाड्याशेजारुन प्रसिध्द कामण दुर्ग किल्ल्यावरून नदी वाहते. रस्ता झाल्याने आता शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी पर्यटक मोठ्या प्रमाणात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येत असतात. परंतु रस्ता अनेक ठिकाणी फुटल्याने वाहतुकीसाठी धोकादायक बनत चालला आहे. तर दुसरीकडे या रस्त्यावर अपघातांचे प्रमाणही वाढले आहेत. तर एका शेतकऱ्याच्या आडमुठेपणामुळे चारशे मिटरच्या रस्त्याचे काम थांबले आहे.