शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

वीज सतत खंडित : विक्रमगडकर संतप्त

By admin | Updated: June 2, 2016 01:13 IST

पावसाळा सुरु होण्याआधीच विक्रमगड व परिसरातील वीजपुरवठा रात्री-अपरात्री खंडीत होण्याचे प्रकार वाढल्याने महावितरणाच्या विरोधात वीजग्राहकांंमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटू लागली आहे.

विक्रमगड : पावसाळा सुरु होण्याआधीच विक्रमगड व परिसरातील वीजपुरवठा रात्री-अपरात्री खंडीत होण्याचे प्रकार वाढल्याने महावितरणाच्या विरोधात वीजग्राहकांंमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटू लागली आहे.काही भागात रात्रभर वीज गायब असत तर काही भागात प्रकाश डिम असतो. गेल्या दोन दिवसांपासून पाच पाच मिनीटांनी वीज खंडित होण्याचे प्रकार घडत असतात,तर रात्री-बे रात्री वीज खंडित होतच असते.त्यातच दुरुस्तीच्या नावाखाली दर शुक्रवारी वीज बंद ठेवली जाते. या काळात महावितरण कोणते काम करते? कामे करते तर मग असे प्रकार का घडतात. वीजपुरवठ्यात सातत्य का नाही.अगोदरच कडक उन्हाने अंगाची लाहीलाही होते. पाणीपुरवठा धड नाही. व रात्रीची झोप ही मिळत नाही.त्यामुळे ग्रामस्थांमधून महावितरणाविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत . सहन तरी किती करायचे असा सवाल उपस्थितीत केला जात आहे. महाविरणने पावसाळ्यापूर्वीची कामे जोरात सुरु असल्याचा दावा केला असला तरी अनेक ठिकाणी ती रेंगाळल्याचे चित्र आहे.त्यामुळेच वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार घडत असल्याचे ग्राहकांकडून बोलले जात आहे. जोरात वारा सुटल्यानंतर तात्काळ वीजपुरवठा सुरेक्षेचा उपाय म्हणून अगर पोल पडल्याने, झाडे लाइनवर पडल्याने वीजपुरवठा खंडित होत असतो.शिवाय सध्या महावितरणकडून पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी विविध कामे हाती घेतली गेली आहेत.त्यामुळे आधीच दुरुस्ती व ही कामे करण्याच्या नावाखाली वीजपुरवटा बंद ठेवला जात आहे. अधूनमधून नेहमीच वीज जात असल्याने कार्यालयीन कामांवरही परिणाम होत आहे. या लपंडावामुळे शीतपेये व थंड वस्तंंूंची विक्री करणा-या दुकानदारांचे ही हाल होत आहेत. (वार्ताहर)