शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

गरीब आदिवासी कुटुंबांना पुन्हा मिळणार ‘खावटी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 01:01 IST

अनुदान योजनेचे पुनरुज्जीवन : लाभार्थी यादीसाठी पाचसदस्यीय समिती, कोरोना संकटकाळात दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कडहाणू : राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आर्थिक संकट उद्भवले असून अनुसूचित जमातीच्या आदिवासी कुटुंबांना सहाय्य करण्यासाठी शासनाने खावटी अनुदान योजनेचे २०२०-२१ या एका वर्षासाठी पुनरुज्जीवन केले आहे.९ सप्टेंबर २०२० रोजी पारित निर्णयान्वये आदिवासी कुटुंबांना प्रतिकुटुंब चार हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. त्यापैकी दोन हजार रुपये अन्नधान्य वस्तू स्वरूपात तर दोन हजार रुपये बँक अथवा डाक खात्यात वितरित केले जातील. त्यामुळे जिल्ह्यातील पात्रताधारक कुटुंबांना त्याचा लाभ मिळेल, अशी माहिती प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी आशिमा मित्तलयांनी दिली.लाभार्थ्यांची यादी तयार करण्यासाठी ग्रामस्तरावर पाच सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली असून त्यामध्ये तलाठी, ग्रामसेवक, डाकसेवक, कृषीसेवक, मुख्याध्यापक/शिक्षक (आश्रमशाळा, जि. प. शाळांतील उपक्रमशील शिक्षक) यांचा समावेश करण्यात आला आहे. ही समिती पात्रतेच्या निकषांवर आधारित याद्या तयार करणार आहेत.पात्रतेच्या निकषांमध्ये दि. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत मनरेगावर एक दिवस कार्यरत असलेले आदिवासी मजूर, आदिम जमातीची सर्व कुटुंबे, पारधी समाजाची सर्व कुटुंबे, प्रकल्प अधिकारी यांनी निश्चित केलेल्या परित्यक्ता, घटस्फोटित महिला, विधवा, भूमिहीन शेतमजूर, अपंग व्यक्ती असलेले कुटुंब, अनाथ मुलांचे संगोपन करणारे कुटुंब, वैयक्तिक वनहक्क प्राप्त झालेली वनहक्कधारक कुटुंबे यानुसार निकष निर्देशित केले आहेत.शासनस्तरावरून अर्जाचा नमुना प्राप्त झाल्यानंतर समितीकडून लाभार्थ्यांची छाननी करून अंतिम लाभार्थ्यांची यादी करण्यात येईल. काही संस्था, संघटना व्यक्तीकडून पैसे घेऊन अर्जाचे वितरण करत असल्याची बेकायदेशीर बाब निदर्शनास आली आहे. या योजनेचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने प्रकल्प कार्यालयाच्या अधिनस्त तालुका तहसीलदार, गटविकास अधिकारी यांचे प्रयत्न सुरू आहेत. अधिक माहितीसाठी ग्रामस्तरावरील समितीशी संपर्क साधावा.- आशिमा मित्तल, प्रकल्प अधिकारी, डहाणू