शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

पेल्हार येथील स्मशानभूमीची दुरवस्था; मरणानंतरही यातना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 00:54 IST

वसई-विरार महापालिकेच्या उदासीनतेमुळे तीव्र नाराजी

नालासोपारा : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे मरणानंतरही मृतदेहांना यातना भोगाव्या लागत असून अंत्यविधीसाठी येणाऱ्या नातेवाईक, मित्रमंडळी आणि रहिवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे.महानगरपालिकेच्या उदासीनतेमुळे पेल्हार गावातील वनोठापाडा येथील स्मशानभूमी शेवटच्या घटका मोजत आहे. स्मशानभूमीच्या भिंती तुटलेल्या, बसण्यासाठी जागा नाही, पाण्याची सोय नाही, स्वच्छतागृहांचे दरवाजे गायब, पाण्यासाठी शेजारी असलेल्या घाणेरड्या पाण्याचा वापर, दिवाबत्तीची सोयही कोमात, स्मशानभूमीत कोणीही सरकारी कर्मचारी नसल्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्या लोकांना लाकडे स्वतः रचावी लागतात, अशा अनेक प्रश्नांमुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी गडग्याचा पाडा, इंदिरा वसाहत, वाकणपाडा, पेल्हार, वनोठा पाडा, वसई फाटा, अवधूत आश्रम, डोंगरीपाडा या परिसरातील नागरिक येतात. वाॅर्ड नंबर-१ आणि वाॅर्ड नंबर-४३ या दोन्ही वाॅर्डच्या सीमेवर ही स्मशानभूमी असल्याने आजपर्यंत कोणत्याही नगरसेवकाने लक्ष दिले नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. दरम्यान, या परिसरात अंदाजे १० ते ११ हजार मतदार असून त्यांना सुविधा मिळत नसल्याने या स्मशानभूमीची डागडुजी केली नाही तर आगामी वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीत बहिष्कार टाकणार असल्याचे स्थानिकांनी ‘लोकमत’ला सांगितले. मेल्यानंतरही लोकांना अंत्यसंस्कार करण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. गेल्या अनेक वर्षांपासून हा त्रास असून कोणत्याही लोकप्रतिनिधींनी आजपर्यंत लक्ष दिले नाही. कोणीही मनपाचा कर्मचारी या ठिकाणी हजर नसतो.    - राजू दास, ग्रामस्थया स्मशानभूमीबाबत माहिती घेतो आणि तिची दुरवस्था झाली असेल तर तातडीने डागडुजी करण्यात येईल.- राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता, वसई-विरार महापालिकाधोकादायक छताखाली होतात अंत्यसंस्कारमहानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या स्मशानभूमीची अवस्था इतकी खराब आणि धोकादायक झाली आहे की अंत्यसंस्कार करण्यासाठी येणाऱ्या रहिवाशांना भीती वाटते. त्याचबरोबर संरक्षक भिंतीना मोठमोठ्या भेगा पडल्या असून आसन व्यवस्था असलेली भिंत कोसळलेली आहे. बाथरूमचे तिन्ही दरवाजे गायब असून त्यांच्या भिंतीना तडे गेलेले आहेत. विजेचा पोलही वाकलेल्या अवस्थेत आहे.