शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
3
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
4
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
5
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
6
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
7
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
8
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
9
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
10
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
11
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
12
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
13
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
14
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
15
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
16
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
17
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
18
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
19
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
20
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO

पेल्हार येथील स्मशानभूमीची दुरवस्था; मरणानंतरही यातना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 00:54 IST

वसई-विरार महापालिकेच्या उदासीनतेमुळे तीव्र नाराजी

नालासोपारा : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे मरणानंतरही मृतदेहांना यातना भोगाव्या लागत असून अंत्यविधीसाठी येणाऱ्या नातेवाईक, मित्रमंडळी आणि रहिवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे.महानगरपालिकेच्या उदासीनतेमुळे पेल्हार गावातील वनोठापाडा येथील स्मशानभूमी शेवटच्या घटका मोजत आहे. स्मशानभूमीच्या भिंती तुटलेल्या, बसण्यासाठी जागा नाही, पाण्याची सोय नाही, स्वच्छतागृहांचे दरवाजे गायब, पाण्यासाठी शेजारी असलेल्या घाणेरड्या पाण्याचा वापर, दिवाबत्तीची सोयही कोमात, स्मशानभूमीत कोणीही सरकारी कर्मचारी नसल्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्या लोकांना लाकडे स्वतः रचावी लागतात, अशा अनेक प्रश्नांमुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी गडग्याचा पाडा, इंदिरा वसाहत, वाकणपाडा, पेल्हार, वनोठा पाडा, वसई फाटा, अवधूत आश्रम, डोंगरीपाडा या परिसरातील नागरिक येतात. वाॅर्ड नंबर-१ आणि वाॅर्ड नंबर-४३ या दोन्ही वाॅर्डच्या सीमेवर ही स्मशानभूमी असल्याने आजपर्यंत कोणत्याही नगरसेवकाने लक्ष दिले नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. दरम्यान, या परिसरात अंदाजे १० ते ११ हजार मतदार असून त्यांना सुविधा मिळत नसल्याने या स्मशानभूमीची डागडुजी केली नाही तर आगामी वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीत बहिष्कार टाकणार असल्याचे स्थानिकांनी ‘लोकमत’ला सांगितले. मेल्यानंतरही लोकांना अंत्यसंस्कार करण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. गेल्या अनेक वर्षांपासून हा त्रास असून कोणत्याही लोकप्रतिनिधींनी आजपर्यंत लक्ष दिले नाही. कोणीही मनपाचा कर्मचारी या ठिकाणी हजर नसतो.    - राजू दास, ग्रामस्थया स्मशानभूमीबाबत माहिती घेतो आणि तिची दुरवस्था झाली असेल तर तातडीने डागडुजी करण्यात येईल.- राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता, वसई-विरार महापालिकाधोकादायक छताखाली होतात अंत्यसंस्कारमहानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या स्मशानभूमीची अवस्था इतकी खराब आणि धोकादायक झाली आहे की अंत्यसंस्कार करण्यासाठी येणाऱ्या रहिवाशांना भीती वाटते. त्याचबरोबर संरक्षक भिंतीना मोठमोठ्या भेगा पडल्या असून आसन व्यवस्था असलेली भिंत कोसळलेली आहे. बाथरूमचे तिन्ही दरवाजे गायब असून त्यांच्या भिंतीना तडे गेलेले आहेत. विजेचा पोलही वाकलेल्या अवस्थेत आहे.