शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

चळणी येथील नदीवरील पुलाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 00:18 IST

नवीन पुलाची मागणी

तलासरी : आदिवासीबहुल डोंगरदऱ्यांमध्ये वसलेल्या चळणी गावाकडे जाणाऱ्या मुख्य पुलाची उंची खूप कमी आहे. तसेच या घनदाट जंगली भागात जास्त पाऊस पडत असल्याने हा पूल पाण्याखाली जाताे, त्यामुळे गावाचा संपर्क तुटतो. चळणीसह इतर सुमारे १३ गावांचाही बाजारपेठेशी संपर्क तुटतो. त्यामुळे नवीन पूल बांधण्याची किंवा जुन्या पुलाची उंची वाढवण्याची वारंवार मागणी होत आहे, मात्र त्याकडे बांधकाम व जिल्हा परिषद दुर्लक्ष करीत आहेत.

चळणी येथे सायवन-जव्हार रस्त्यावर सोनाय नदीवर हा २० वर्षांपूर्वी पाइप टाकून पूल बांधला होता. तसेच २०१९ मध्ये याचे पुन्हा काम करण्यात आले. सध्या या पुलाची दुरवस्था झाली आहे. पुलाच्या वरच्या भागावरील सिमेंट काँक्रिटचा अर्धा भाग पावसाच्या पाण्याच्या प्रवाहात तुटून नदीपात्रातच पडल्याचे दिसते. तसेच पुलाला मोठ्या भेगा पडल्या आहेत. पावसाळ्यात या पुलावरून पाणी जात असल्याने तिलोंडा, पिंपळशेत, खरोडा, चांभारशेत, माढविहरा, कुंड, ओझर आदी गावांतील २० ते २५ पाड्यांचा पावसाळ्यात संपर्क तुटतो. सायवन ही या परिसरातील गावांसाठी प्रमुख बाजारपेठ आहे. येथे बाजारपेठ, बँक, प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने अनेक गावांचा संपर्क जोडणारा हा पूल महत्त्वाचा आहे. त्यामुळे नवा पूल बांधण्याची किंवा उंची वाढवण्याची ग्रामस्थ मागणी करत आहे.

सायवन रोड ते चळणी गावाला जोडल्या जाणाऱ्या पुलाची दुरवस्था झाली असून त्याची डागडुजी न करता त्या पुलाची उंची वाढवण्यात यावी व नव्याने बांधणी करण्यात यावी.- संदीप गिंभल ग्रामस्थ

सध्या निधी उपलब्ध नसल्यामुळे ग्रामपंचायतीशी बोलणं करून स्थानिक स्तरावर ग्रामपंचायत निधीमधून पुलाची डागडुजी करण्यात येईल. नवीन पुलाच्या कामासाठी लवकर निधी उपलब्ध करू.- नरेंद्र खराडे, कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद डहाणू 

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार