शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

प्रदूषितजल वाहिनी गेली वाहून, आता उभारणी पुन्हा रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 03:41 IST

तारापूर औद्योगिक वसाहतीच्या कारखान्यांमधून निघणारे प्रदूषित पाणी खोल समुद्रात पाइपलाइनद्वारे सोडण्यासाठी सागरात उभारण्यात येत असलेली ७.१ किमी अंतरावर टाकलेली पाइपलाइन वाहून गेली आहे.

- हितेंन नाईकपालघर : तारापूर औद्योगिक वसाहतीच्या कारखान्यांमधून निघणारे प्रदूषित पाणी खोल समुद्रात पाइपलाइनद्वारे सोडण्यासाठी सागरात उभारण्यात येत असलेली ७.१ किमी अंतरावर टाकलेली पाइपलाइन वाहून गेली आहे. त्यामुळे हा प्रकल्प आता आणखी लांबणीवर पडला आहे.तारापूर एमआयडीसी मधील कंपन्यामधून निघणाऱ्या प्रदूषित पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी उभारण्यात आलेले सामुदायिक सांडपाणी प्रक्रि या केंद्र (सीइटीपी) हे २५ एमएलडी इतक्या कमी क्षमतेचे असल्याने ५० एम एलडी क्षमतेचे केंद्र उभारायचे काम मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. तत्कालीन नवापूर ग्रामपंचायतीने विकास कामाच्या नावाखाली ज्या तत्परतेने ना हरकत दाखला एमआयडीसी विभागाला दिला. तेवढी तत्परता राज्य शासनानेही न दाखविल्याने शासनाच्या या उदासीन धोरणामुळे ५० एमएलडी क्षमतेच्या केंद्राचे काम आजही अपूर्णावस्थेत आहे. त्यामुळे आजही तारापूर एमआयडीसीच्या कारखान्यातून २५ एम एलडी पेक्षा जास्त प्रमाणात निर्माण होणारे प्रदूषित पाणी आटोक्यात येत नसल्याने जल प्रदूषणाचा प्रश्न गंभीर झाला असल्याची ग्वाही खुद्द टीमाचे अध्यक्ष डी के राऊत यांनी मुख्यमंत्र्यांसमोर दिली होती. त्यामुळे काही कारखानदार आपल्या कारखान्यातील प्रदूषित पाणी आजही छुप्या मार्गाने गटारात, नाल्यात, खाडीत, टँकरद्वरे रस्त्या रस्त्यावर फेकत असल्याने प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे जैव विविधता संकटात सापडली आहे.अशा बेकायदेशीर प्रकारामुळे जिल्ह्यातील समुद्र, खाड्या, नद्यातील प्रदूषण वाढत असून शेती, बागायती नष्ट होत आहेत. त्याच बरोबरीने परिसरातील लोकांना कर्करोग, त्वचारोग, श्वसनाच्या विकारांनी ग्रासल्याचा अहवाल बालविकास प्रकल्प अधिकाºयाने शासनाकडे पाठविला आहे. त्यामुळे एमआयडीसी मधून रोजगार जरी मिळत असला तरी दुसरीकडे मात्र प्रदूषण व गंभीर आजाराच्या मरण यातनांना स्थानिकांना सामोरे जावे लागत आहे.५० एमएलडी क्षमतेच्या या नव्याने चालू असलेल्या केंद्राचे काम मागील अनेक वर्षांपासून सुरू असून १२० कोटी रुपये किमतीच्या या केंद्राच्या उभारणीसाठी कारखानदारांनी आपल्या हि:श्शाची रक्कम जमा केली असली तरी शासनाकडून येणारी सबसीडीची रक्कम मागील २-३ वर्षांपासून जमा केली जात नसल्याने प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. या प्रक्रि या केंद्राची पाइपलाइन नवापूर गावातून समुद्रात थेट ७.१ किमी आत सोडली जाणार आहे. त्यासाठी तत्कालीन नवापूर ग्रामपंचायतीने लाखो रुपयांचा विकास निधी मिळणार असल्याच्या नावावर पाईपलाइन टाकण्यास ना हरकत दाखला दिला होता. तो मिळाल्याने एमआयडीसी, आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला अधूनमधून प्रदूषित पाणी बिनदिक्कत समुद्रात सोडण्याचा जणू परवानाच मिळाल्या सारखे झाले असल्याचा आरोप युवा मच्छिमार कुंदन दवणे यांनी लोकमतशी बोलतांना केला. याचे दीर्घकालीन परिणाम केळवे, माहीम, वडराई, सातपाटी, मुरबे, आलेवाडी, नवापूर, उच्छेळी, दांडी आदी किनारपट्टीवरील अनेक गावांना भोगावे लागणार असून मत्स्य संपदेसाठी प्रसिद्ध असलेला गोल्डन बेल्ट संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झाला आहे.या प्रदूषणा विरोधात अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेने राष्टÑीय हरित लवादात याचिका दाखल केल्यानंतर लवादाच्या आदेशान्वये गठीत समितीने सादर केलेल्या अहवालातील सुचविलेल्या उपाय योजनांची अंमलबजावणी केली जात नसल्याने याचिकाकर्त्यांच्या वकील मिनाझ काकालिया यांनी हरित लवादाच्या आदेशाचा अवमान केल्याची नोटीस जिल्हा प्रशासनाला पाठवली आहे. जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी चे अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, तारापूर, ठाणे आदींनाही या नोटीसी बजाविण्यात आल्या आहेत. प्रशासनाला त्याचे गांभीर्य नसल्याने समुद्राला आलेल्या जोरदार भरतीमुळे नवापूर गावापासून समुद्रात उभारण्यात आलेली बहुतांशी पाइपलाइन तुटून वाहून गेली व तिचे पाइप नवापूर, आलेवाडी, उच्छेळी-दांडी आदी अनेक भागातील किनारपट्टीवर येऊन पडले आहेत.निसर्गाच्या विरोधात, पर्यावरणाला हानी पोचिवण्याचा प्रयत्न झाल्यास निसर्ग त्याला सोडत नसल्याचे या उदाहरणा वरून दिसून आले आहे.- भावेश तामोरे,युवा मच्छिमार नेता.५० एम एलडी प्रक्रि या केंद्र उभारणीबाबत शासन ही उदासीन असल्याने टीमाने या प्रदूषित पाण्यावर पुर्नप्रक्रि या केंद्र उभारून त्याचा योग्य विनियोग करावा.- अधिराज किणी.ग्रामपंचायत सदस्य, नवापूर.या प्रकरणातील संबंधित अधिकाºयावर गुन्हे दाखल करावेत.- निलेश म्हात्रे,अध्यक्ष पानेरी बचाव संघर्ष समिती.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार