शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
5
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
6
Operation Sindoor Live Updates: भारताचा कोणताही शत्रू वाचू शकत नाही, अमित शाहांची पोस्ट
7
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
8
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
9
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
11
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
12
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
13
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
14
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
15
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
16
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
17
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
18
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
19
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
20
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?

राजकारणात पंडित पुन्हा सक्रिय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2019 23:57 IST

प्रलंबित प्रश्नांचा तहसीलदार कचेरीत बसून आढावा !

वसई : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पालघरच्या गड शिवसेना-भाजप या महायुतीने जिंकल्याने बहुजन विकास आघाडीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी विविध पक्षीय कार्यकर्ते आता सक्रि य झाले असून यांच्यासह पाच वर्षांनी जनआंदोलन समितीचे संस्थापक अध्यक्ष माजी आम. विवेक पंडित पुन्हा सक्रि य झाले आहेत. दरम्यान केंद्रात मोदी व महाराष्ट्र राज्यातही युतीचे राज्य येणार असल्याची चिन्हे असल्याने पुन्हा पंडित यांनी राजकारणात उडी घेतलीे.लोकसभा निवडणुकीत सेना-भाजपाने आम. हितेंद्र ठाकूर प्रणित बहुजन विकास आघाडीला पराभूत करून धोबी पछाड दिल्याने वसई विधानसभा मतदारसंघातील गणिते बऱ्यापैकी बदलण्याची चिन्हे आहेत. परिणाम म्हणून पालघर लोकसभेच्या सहा विधानसभा व त्यातील युतीच्या विजयाची निकालाची आकडेवारी पाहिली तर बविआच्या नालासोपारा व वसई विधानसभा मतदारसंघात युतीने बरीच मजल मारली आहे.त्यामुळेच यदाकदाचित माजी आम.विवेक पंडित यांनी पुढची गणिते जुळवून जनता दरबाराच्या माध्यमातून पुन्हा एकदा सुरुवात केली आहे.अलीकडेच पंडित यांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पूर्वी राज्य आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्षपद बहाल केले होते आणि आता तर राज्यमंत्र्यांचा दर्जा देऊन भाजपाने साखरपेरणीच केली आहे.वसई शासकीय विश्रामगृह येथे श्रीगणेशा करून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली असून पुन्हा या आठड्यात दुसºयादा वसई तहसीलदार कार्यालयात ठाण मांडून जनता दरबार, सभा बैठका घेत आहेत.त्यामुळेच या सर्व क्लृप्त्या म्हणजेच वसईच्या राजकारणात पंडित पुन्हा सक्रिय होण्याची लक्षणं आहेत. विवेक पंडित यांच्या सक्रि यतेमुळे बविआच्या पोटात गोळा !२०१४ ची विधानसभा निवडणूक थोड्य फार फरकाने पराभूत झाल्यावर पंडित अज्ञातवासात गेले हे सर्वश्रृत आहे. त्यातच आपण राजकीय संन्यास घेतल्याचे त्यावेळी स्वत: पंडित यांनीच जाहीर केल्याने वसई विधानसभा क्षेत्रातील बविआ विरोधी गट थंड झाला होता. मात्र गतवर्षी पोट निवडणूक व आता लोकसभा निवडणुकीत पंडित यांनी बविआ विरोधात पडद्यामागे राहून मोठी कामिगरी बजावली. आणि त्याचे फळ त्यांना राज्य सरकारने महामंडळ तथा राज्यमंत्री पद देऊन परतफेड केली.2014 विधानसभा निवडणुकीची आकडेवारी !2014 ची पंडित विरुद्ध ठाकूर या दोघांच्या विधानसभा मतांची आकडेवारी पाहता पंडित यांना मतदारांनी नाकारले होते. २०१४ मध्ये ठाकूर यांना ९७,२९१ तर पंडित यांना ६५,३९५ मते मिळाली होती. सन २००९ मध्ये पंडित यांना ८१,३५८ तर बविआला ६४,५६० मताधिक्य मिळाले होते. २०१९ ची बाजी विवेक पंडित मारणार? गावे वगळली जाणार पश्चिम पट्टीतील ती २९ गावे आणि महानगरपालिका हा फॅक्टर जोरदार चालल्याने पंडित त्यावेळी बाजी मारून गेले होते. आता पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. गावे वगळण्याची प्रक्रि या जवळ येऊन ठेपली आहे. पुढे तीच प्रक्रि या किचकट होत जाईल. त्रिसूत्री कारणांचा फायदा पंडितांना; आणि पंडित निवडून येणार ! तरीही पंडित यांना लोकसभा निवडणूक व त्याच्या आताच्या मतांचा फायदा, बविआ विरोधी मते, आणि राज्य सरकार २९ गावे वगळून त्या गावात नगरपरिषद अथवा स्वतंत्र नगरपालिका तयार करणार म्हणजेच जवळपास २२ हजार मते कमी होणार म्हणजेच या सर्व गोष्टीचा फायदा पंडित यांना मिळण्याची दाट शक्यता आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा