शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

परिवहन सेवेवरून रंगले राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 01:13 IST

अखेर वसई-विरार महापालिकेच्या बससेवेला सुरुवात : प्रवाशांना मिळाला दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनालासोपारा : कोरोनाकाळापासून बंद असलेली वसई-विरार शहर महानगरपालिकेची परिवहन बससेवा अखेर १ जानेवारीपासून सुरू झाली आहे. ही बससेवा मेसर्स एसएनएन कंपनीमार्फत सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, आमदार हितेंद्र ठाकूर यांनी नवीन वर्षात वसईकरांना भेट दिली आहे, मात्र त्याच वेळी भाजपनेही आम्ही केलेल्या मागणीमुळेच परिवहन सेवा सुरू झाल्याचा दावा केला असून आगामी  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकारण रंगू लागले आहे.वसई-विरार शहर महागरपालिकेच्या मुख्य कार्यालय येथे परिवहन बससेवेच्या शुभारंभ प्रसंगी माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत, माजी सभापती प्रभाग ‘क’चे यज्ञेश्वर पाटील, माजी सभापती प्रभाग ‘ब’चे चिरायू चौधरी, माजी महिला बालकल्याण सभापती माया चौधरी, माजी नगरसेवक हार्दिक राऊत, माजी नगरसेविका ममता सुमन, रंजना थलेकर, माजी परिवहन समिती सदस्य कल्पक पाटील, वसंत वरे, स्वप्निल कवळी व महानगरपालिका अधिकारी वर्ग, परिवहन सेवा कर्मचारी उपस्थित होते.नालासोपारा, वसई येथेही परिवहन सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे. सध्या ९१ बस परिवहन सेवेच्या ताफ्यात आल्या असून, या बसेस ४३ मार्गांवर चालू करण्यात येणार आहेत. तसेच वाढीव मार्गांवर टप्प्याटप्प्याने बससेवा सुरू करण्यात येणार आहे. यापूर्वीच्या परिवहन सेवेमार्फत वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, अपंग व वैद्यकीयदृष्ट्या गरजू नागरिकांना परिवहन सेवेच्या सवलती लागू होतील व त्या यापुढेही मिळणार असल्याचे मनपातर्फे सांगण्यात आले आहे.आंदोलनामुळेच निर्णय झाल्याचा भाजपचा दावा वसई-विरार महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच होणार असल्याने परिवहनची सेवा सुरू झाल्याबरोबरच राजकारणाला सुरुवात झाली आहे. नवीन वर्षाच्या दिवशी मनपाने परिवहन सुरू केल्याबरोबर आमच्या आंदोलनामुळे ही सेवा सुरू झाल्याचा दावा भाजपने केला आहे. आयुक्तांना भेटून दिलेल्या निवेदनांमुळे ही परिवहन सेवा सुरू झाल्याचेही भाजपने म्हटले आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार