शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

मंडळांपुढे पोलीस, पालिका हतबल

By admin | Updated: August 16, 2016 04:43 IST

गणेश मंडळांच्या कृत्रिम तलावाला विरोध लक्षात घेऊन आणि अवघ्या वीस दिवसात कृत्रिम तलावांची निर्मिती करणे अशक्य असल्याचे पाहून यंदा वसई विरार शहरात गणेश विसर्जनासाठी

- शशी करपे,  वसई

गणेश मंडळांच्या कृत्रिम तलावाला विरोध लक्षात घेऊन आणि अवघ्या वीस दिवसात कृत्रिम तलावांची निर्मिती करणे अशक्य असल्याचे पाहून यंदा वसई विरार शहरात गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव प्रायोगिक तत्वावर केले जाणार आहेत. तर गणेश मंडळांनी पोलीस आणि पालिकेला न जुमानता पुन्हा एकदा रस्त्यांवर मंडप टाकून गणेश आगमनाची जोरदार तयारीही सुरु केली आहे. त्यामुळे यंदा गणेश विसर्जन कृत्रिम तलावातच होणार. रस्त्यांवर मंडप टाकू देणार नाही, अशा वल्गना करणारे पोलीस आणि पालिका प्रशासन गणेश मंडळांकडून प्रतिसाद न मिळाल्याने हतबल झाल्याचे दिसून येत आहे.चार फुटांपेक्षा अधिक उंचीच्या गणेश मूर्तीचे विसर्जन समुद्रात करुन त्यापेक्षा कमी उंचीच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव करण्याचा राज्य शासनाने आदेश जारी केला आहे. नैसर्गिक जलस्त्रोतांच्या संवर्धनासाठी हा निर्णय घेण्यात आलेला असला तरी गणेश भक्तांचा मात्र कृत्रिम तलावांना विरोध असल्याचे दिसत आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने कृत्रिम तलाव ही संकल्पना योग्य असली तरी गणेशोत्सवाला भावनिकतेची जोड असल्याकडेही दुर्लक्ष करुन चालणार नाही. आतापर्यंत गणेश मूर्तींचे नैसर्गिक तलावांमध्ये विसर्जन करण्याची परंपरा चालत आहे. त्यामुळे कृत्रिम तलाव संकल्पनेबाबत गणेश भक्तांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. दरम्यान, यंदाच्या मोसमात वसई विरार शहरात गणेश विसर्जनासाठी एकही कृत्रिम तलाव पालिकेला अद्याप उभारता आलेला नाही. गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरल्याने आता प्रायोगिक तत्वावरच कृत्रिम तलाव उभारले जाणार असल्याची सारवासारव पालिकेने केली आहे.मुंबई, ठाणे, मीरा भार्इंदर आदी शहरांमध्ये दरवर्षी गणेश विसर्जनापूर्वी कृत्रिम तलाव उभारले जातात. वसई विरार महापालिकेने यापूर्वी कधीच कृत्रिम तलाव उभारले नव्हते. महापौर प्रवीणा ठाकूर यांनी कृत्रिम तलावांची संकल्पना मांडल्यानंतर महासभेत त्याला मंजुरी देण्यात येऊन दोन कोटी रूपयांच्या निधीची तरदूत करण्यात आली होती. मात्र त्यासाठी जागांचे सर्वेक्षण, जनजागृती करणे आवश्यक होते. परंतु ते करण्यात आलेले नाही.गणेश मंडळांपुढील विघ्नचार फुटांपेक्षा अधिक उंचीच्या गणेश मूर्तीचे समुद्रात विसर्जन करण्याच्या सक्तीवरही गणेशोत्सव मंडळांच्या तीव्र प्रतिक्रिया आहेत. वसई तालुक्याच्या शहरी भागापासून समुद्रकिनारा फार लांबच्या अंतरावर आहे. तसेच यापूर्वी विभागवार विसर्जन स्थळांवर मोठ्या मूर्त्यांचे विसर्जन केले जायचे. परंतु आता चार फुटांपेक्षा अधिक उंचीच्या मूर्त्या समुद्रात विसर्जन करण्याची सक्ती लादण्यात येणार असल्याने गणपती मंडळांपुढे विसर्जनाचे मोठे विघ्न आणि वाहतूक व्यवस्थेवरही मोठा ताण पडण्याची शक्यता होती. पोलिसांनी धाडस दाखवावेदुसरीकडे, पोलीस आणि पालिकेने रस्त्यांवर मंडप टाकण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे ठणकावून सांगितले होते अशा मंडळांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही अधिकाऱ्यांनी जाहीर केले होते. मात्र, सध्या वसई विरार परिसरातील अनेक मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडप टाकण्याचे काम सुरु केले आहे. पण, त्यातील एकावरही कारवाई करण्याचे धाडस पोलीस आणि पालिकेने दाखवलेले नाही.ऐन वेळी कामाची घाई...आता गणेशोत्सवाला अवघे वीस दिवस उरले आहेत. प्रशासनाच्या आढावा बैठकीत कृत्रिम तलाव तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण ते काम पूर्ण झालेले नव्हते. त्यामुळे घाईघाईने प्रत्येक प्रभागात किमान दोन कृत्रिम तलाव बांधण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. चार फुटांपेक्षा कमी उंचीचे गणपतींचे त्यात विसर्जन करण्याचा प्रयत्न आहे. परंतु शहरातील हजारो गणपती पाहता या थोड्या तलावात त्यांचे विसर्जन शक्य नाही. लोकांमध्येही त्याबाबत माहिती आणि जागृती नाही. त्यामुळे पालिकेने पहिले वर्ष असून प्रायोगिक तत्वावरच तलाव बांधत असल्याचे सांगितले आहे.कृत्रिम तलाव बांधण्याची आधीपासून तयारी करायला हवी होती. पण, चांगली सुरुवात करत आहोत . शंभर टक्के कृत्रिम तलाव यंदा बांधू शकत नसलो तरी यापुढील वर्षात सर्वाधिक कृत्रिम तलाव वसई विरार शहरात असतील असे पालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी सांगितले. त्यामुळे कृत्रिम तलावात यंदा विसर्जन बंधनकारक नसल्याने स्पष्ट झाले आहे.