शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक: कामचुकार स्वच्छता निरीक्षकांना संरक्षण; तर अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिले कारवाईचे आदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2021 19:34 IST

तक्रारी जास्तच झाल्या किंवा वरिष्ठांनी सांगितले तर तेवढ्या पुरती कारवाई स्वच्छता निरीक्षक व मुकादम यांच्या कडून केली जाते .

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - प्लास्टिक पिशव्या आदी वस्तूंवर कायद्याने बंदी असताना देखील त्यास संरक्षण देणाऱ्या आरोग्य विभागातील स्वच्छता निरीक्षकांना पाठीशी घालत त्यांच्यावर जबाबदारी निश्चित केली जात नाही. तर आता अतिक्रमण विभागास देखील -प्लास्टिक वर कारवाईची जबाबदारी देण्यात आली आहे . 

 राज्य शासनाने प्लास्टिक पिशव्या , चमचे , स्ट्रॉ , ग्लास , डिश अश्या एकल वापराच्या प्लास्टिक वस्तूंवर बंदी घातलेली आहे . शिवाय केंद्र सरकारने देखील एकल वापराच्या प्लास्टिक ना मनाई केली आहे . परंतु मीरा भाईंदर महापालिकेच्या आरोग्य विभागातील स्वच्छता निरीक्षक , मुकादम यांच्या कडून कारवाई केली जात नसल्याने शहरात राजरोसपणे प्लास्टिक पिशव्या आदींचा वापर , विक्री सुरु आहे . 

तक्रारी जास्तच झाल्या किंवा वरिष्ठांनी सांगितले तर तेवढ्या पुरती कारवाई स्वच्छता निरीक्षक व मुकादम यांच्या कडून केली जाते . इतकेच काय तर प्लास्टिक पहिल्यांदा आढळल्यास ५ हजार रुपये दंड असताना स्वच्छता निरीक्षक हे केवळ १५० रुपये दंड आकारून प्लास्टिक विक्रेता वा वापरकर्त्याच्या भक्कम आर्थिक फायदा करून देत आले आहेत . 

त्यातूनच प्लास्टिक विक्रेते आणि वापरकर्ते यांच्याशी स्वच्छता निरीक्षक आदींचे अर्थपूर्ण लागेबांधे असल्याचे आरोप सातत्याने होऊन त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे . कारण स्वच्छता निरीक्षक हे प्लास्टिक ची कारवाई असो किंवा माती व डेब्रिस भराव , अस्वच्छता आदी प्रकरणी देखील कारवाई करण्यास नेहमीच जबाबदारी झटकून टाळाटाळ करत आले आहेत . 

काही दिवसां पूर्वीच  बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांवर कारवाई न करणाऱ्या स्वच्छता निरीक्षकांवर कारवाई केली जाईल 

असे पालिका प्रशासनाने प्रसिद्धीपत्रक द्वारे म्हटले होते . परंतु शहरात पहाटे पासून प्लास्टिक पिशव्या सर्रास वापरली जात असताना प्रशासनाने स्वच्छता निरीक्षकावर कारवाईच केली नाही. त्यांना संरक्षण देत उलट आता प्लास्टिक पिशव्यांवर कारवाईची जबाबदारी अतिक्रमण विभागा वर सुद्धा देण्यात आली आहे . 

आयुक्त दिलीप ढोले यांनी आयोजित केलेल्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत तसे निर्देश दिले आहेत .  तर अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना प्लास्टिकच्या पिशव्या बाळगणाऱ्या वर कारवाईच्या सूचना दिल्या जाणार असल्याची माहिती उपायुक्त मारुती गायकवाड यांनी दिली आहे . 

अतिक्रमण विभागास जबाबदारी दिली त्याचे स्वागत करत ३ नंतर रात्री पर्यंत प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई होईल अशी आशा आहे . पण पहाटे पासून प्लास्टिक पिशव्या आदींचा वापर उघडपणे होत असताना स्वच्छता निरीक्षक आणि मुकादमांना संरक्षण कशाला ? असा सवाल जागरूक नागरिक करत आहेत . 

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी