शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

जीवावर बेतणारा करावा लागतो प्रवास

By admin | Updated: June 3, 2016 01:46 IST

पालघर जिल्हयातील अनेक गाव पाडे आजही विदारक परिस्थितीत जिवन जगत आहे. डहाणू तालुक्यातील साये-आकेगव्हान पुलाअभावी येथील गाव परिसरातील नागरिक सध्या जिवावर

डहाणू/कासा : पालघर जिल्हयातील अनेक गाव पाडे आजही विदारक परिस्थितीत जिवन जगत आहे. डहाणू तालुक्यातील साये-आकेगव्हान पुलाअभावी येथील गाव परिसरातील नागरिक सध्या जिवावर उदार होेवून नदीचा प्रवास एका साध्या लाकडी होडीतून करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.डहाणू तालुक्यातील साये व पालघर तालुक्यातील आके गव्हाण यांना जोडणारा सूर्या नदीवरील पूलच नाही. उर्से, साये, आंबिस्ते, दाभोण, म्हसाड आदी गावातील नागरिकांना पलिकडील बोईसर बाजापेठेकडे व नानीवली, रावते, आकेगव्हाण जाण्यासाठी नदी हाच पर्याय आहे. उन्हाळयातही या नदीत मुबलक पाणी असते. तर पावसाळयात या नदीला मोठया प्रमाणात पूर असतो. साये-उर्से परिसरातील मोठया प्रमाणात नागरिक रोजगारासाठी बोईसर येथिल औद्योगिक कारखान्यात कामावर जातात. व शाळकरी मुले बोईसर, नागझरी येथे जातात. तसेच नदी पलिकडे बोईसर नानीवली बस सुविधा आहे. परंतु पावसाळयात पूल नदीवर नसल्याने नागरिकांना २० किमी. अंतर कापून चारोटी मार्गे जावे लागते. नाईलाजास्तव नागरिकांना हा प्रवास करावा लागतो. मात्र उन्हाळयात सुर्या नदीचे पात्र धमणी धरणाच्या पाण्याने भरत असले तरी बऱ्याच ठिकाणी नागरिक व शाळकरी मुले नदी पार करण्यासाठी टाक्यांची होडी करून जिवावर बेतणारा प्रवास करताना दिसतात. या लाकडी होडीस दोन्ही तिरावर लाकडी खांब गाडून दोऱ्या बांधलेल्या असतात. ज्या तिरावर जायचे आहे त्या दोरीस होडीत बसल्यावर स्वत: खेचत जावे लागते. असा हा धोकादायक प्रवास कारवा लागतो. (वार्ताहर)