शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

बांधावरील तूर लागवड शेतकऱ्यांसाठी ठरते वरदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 00:24 IST

शेतकऱ्यांकडून भात हे मुख्य पीक घेतले जात असले तरी या वर्षीच्या खरीप हंगामात येथील शेतक-यांकडून तुरीची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे.

राहुल वाडेकर विक्रमगड : तालुक्यात शेतकऱ्यांकडून भात हे मुख्य पीक घेतले जात असले तरी या वर्षीच्या खरीप हंगामात येथील शेतक-यांकडून तुरीची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. दरवर्षी खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात आंतरपीक म्हणून तुरीचे उत्पादन शेतकरी घेत आहेत. तुरीतील पोषक घटकांमुळे थोड्या प्रमाणात कुपोषणावरही मात करण्यास मदत होत असते.विक्रमगड तालुक्यात पावसाळ्यामध्ये प्रामुख्याने पारंपरिक पद्धतीने भातशेती केली जाते. त्यातून येणारे उत्पन्न अत्यंत मर्यादित स्वरूपात असते. काही शेतकरी अत्याधुनिक पद्धतीने शेती करत असले तरी केवळ भातशेतीवर अवलंबून राहणे त्यांनाही आता कठीण होऊन बसले आहे. त्यात भातशेतीमधे उत्पादन खर्च जास्त तर पैसे कमी मिळतात. त्यामुळे काही शेतकरी बांधावरील तूर लागवड करत आहेत. गेल्या पाच-सहा वर्षापासून शेतक-यांना तूर, कडू वाल, हरभरा, उडीद लागवडीसाठी काही सामाजिक संस्था व शासनाच्या कृषी विभागाकडून प्रोत्साहन देऊन त्यांना उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचा फायदा येथील शेतक-यांना होताना दिसू लागला आहे. यामुळे शेतक-यांना तुरीचा लाभ घेण्याबरोबरच अतिरिक्त तुरीची विक्री करून त्यातून आर्थिक फायदा मिळवण्याची संधी उपलब्ध झाली आहे.>कुपोषणावर ठरू शकते पर्यायगेल्या दोन-तीन वर्षात तूर डाळीचे भाव सुमारे अडीचशे ते तीनशे रुपयांपेक्षाही जास्त झाले होते. आजही ही भाववाढ कायम आहे आणि नजीकच्या येणाºयाही काळात वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या महागाईच्या काळात शेतक-यांना घरच्या घरी तूर डाळीचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. तूर डाळीतील पोषक घटकांमुळे या डाळीला मोठी मागणी असून त्यामुळे कुपोषणावर मात करणे शक्य ठरेल असे काहींचे म्हणणे आहे. तालुक्यात आदिवासी शेतकºयांना खरीप, रब्बी हंगामात तूर, हरभरा, कडू वाल, उडीद याच्या बियाण्याचे मोफत वाटप करून ही पिके घेण्यास प्रोत्साहन दिल्यास भात पिकाला उत्तम पर्याय ठरून मोठ्या प्रमाणात पोषक घटक असलेल्या डाळी शेतक-यांना घरच्या घरी उपलब्ध होतील व अधिकचे तूर, हरभरा, वाल, उडीदचे उत्पन्न विकून रोजगारही मिळेल. त्यामुळे अनेक वर्ष गाजत असलेल्या कुपोषण कमी करण्यास थोड्या फार प्रमाणात मदत होऊ शकते, असे जाणकार शेतक-यांचे मत आहे.>आंतरपीक म्हणून ठरते फायद्याचेतूर लागवडीसाठी मोठी विस्तृत जागा लागत नाही. शेताच्या बांधावर, माळरानावर या पिकाची लागवड करून भात शेती करणारे शेतकरी तुरीचे आंतर पीक घेऊ शकतात. हे पीक ओसाड माळरान, बांधावर, खाचरावर घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणात जागेची बचत होते. त्याचप्रमाणे या पिकावर जास्त प्रमाणात किड-रोग येत नाहीत. खताची जास्त आवश्यकता नसते. आंतरपीक म्हणून याची लागवड केल्यामुळे भात पिकाच्या बांधावर वाढणारी तण, गवत यांच्यावर नियंत्रण येऊन किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव रोखला जातो. त्यामुळे भाताचे पिकाचे उत्पन्न बरोबर दुबार पीक घेण्यास मदत होते व शेतक-यांना अधिकचा आर्थिक फायदा होतो.