शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
2
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
3
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
4
आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
5
Salman Khan Birthday: मध्यरात्री पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानने केलं वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल
6
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
7
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
9
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
10
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
11
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
12
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
13
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
14
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
15
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
16
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
17
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
18
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
19
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
20
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

बांधावरील तूर लागवड शेतकऱ्यांसाठी ठरते वरदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 00:24 IST

शेतकऱ्यांकडून भात हे मुख्य पीक घेतले जात असले तरी या वर्षीच्या खरीप हंगामात येथील शेतक-यांकडून तुरीची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे.

राहुल वाडेकर विक्रमगड : तालुक्यात शेतकऱ्यांकडून भात हे मुख्य पीक घेतले जात असले तरी या वर्षीच्या खरीप हंगामात येथील शेतक-यांकडून तुरीची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. दरवर्षी खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात आंतरपीक म्हणून तुरीचे उत्पादन शेतकरी घेत आहेत. तुरीतील पोषक घटकांमुळे थोड्या प्रमाणात कुपोषणावरही मात करण्यास मदत होत असते.विक्रमगड तालुक्यात पावसाळ्यामध्ये प्रामुख्याने पारंपरिक पद्धतीने भातशेती केली जाते. त्यातून येणारे उत्पन्न अत्यंत मर्यादित स्वरूपात असते. काही शेतकरी अत्याधुनिक पद्धतीने शेती करत असले तरी केवळ भातशेतीवर अवलंबून राहणे त्यांनाही आता कठीण होऊन बसले आहे. त्यात भातशेतीमधे उत्पादन खर्च जास्त तर पैसे कमी मिळतात. त्यामुळे काही शेतकरी बांधावरील तूर लागवड करत आहेत. गेल्या पाच-सहा वर्षापासून शेतक-यांना तूर, कडू वाल, हरभरा, उडीद लागवडीसाठी काही सामाजिक संस्था व शासनाच्या कृषी विभागाकडून प्रोत्साहन देऊन त्यांना उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचा फायदा येथील शेतक-यांना होताना दिसू लागला आहे. यामुळे शेतक-यांना तुरीचा लाभ घेण्याबरोबरच अतिरिक्त तुरीची विक्री करून त्यातून आर्थिक फायदा मिळवण्याची संधी उपलब्ध झाली आहे.>कुपोषणावर ठरू शकते पर्यायगेल्या दोन-तीन वर्षात तूर डाळीचे भाव सुमारे अडीचशे ते तीनशे रुपयांपेक्षाही जास्त झाले होते. आजही ही भाववाढ कायम आहे आणि नजीकच्या येणाºयाही काळात वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या महागाईच्या काळात शेतक-यांना घरच्या घरी तूर डाळीचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. तूर डाळीतील पोषक घटकांमुळे या डाळीला मोठी मागणी असून त्यामुळे कुपोषणावर मात करणे शक्य ठरेल असे काहींचे म्हणणे आहे. तालुक्यात आदिवासी शेतकºयांना खरीप, रब्बी हंगामात तूर, हरभरा, कडू वाल, उडीद याच्या बियाण्याचे मोफत वाटप करून ही पिके घेण्यास प्रोत्साहन दिल्यास भात पिकाला उत्तम पर्याय ठरून मोठ्या प्रमाणात पोषक घटक असलेल्या डाळी शेतक-यांना घरच्या घरी उपलब्ध होतील व अधिकचे तूर, हरभरा, वाल, उडीदचे उत्पन्न विकून रोजगारही मिळेल. त्यामुळे अनेक वर्ष गाजत असलेल्या कुपोषण कमी करण्यास थोड्या फार प्रमाणात मदत होऊ शकते, असे जाणकार शेतक-यांचे मत आहे.>आंतरपीक म्हणून ठरते फायद्याचेतूर लागवडीसाठी मोठी विस्तृत जागा लागत नाही. शेताच्या बांधावर, माळरानावर या पिकाची लागवड करून भात शेती करणारे शेतकरी तुरीचे आंतर पीक घेऊ शकतात. हे पीक ओसाड माळरान, बांधावर, खाचरावर घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणात जागेची बचत होते. त्याचप्रमाणे या पिकावर जास्त प्रमाणात किड-रोग येत नाहीत. खताची जास्त आवश्यकता नसते. आंतरपीक म्हणून याची लागवड केल्यामुळे भात पिकाच्या बांधावर वाढणारी तण, गवत यांच्यावर नियंत्रण येऊन किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव रोखला जातो. त्यामुळे भाताचे पिकाचे उत्पन्न बरोबर दुबार पीक घेण्यास मदत होते व शेतक-यांना अधिकचा आर्थिक फायदा होतो.