शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

महायुतीचे चित्र स्पष्ट, महाआघाडीची भूमिका अस्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 22:55 IST

शिवसेना लागली कामाला; बविआ, कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमात

- हुसेन मेमन जव्हार : पालघर लोकसभेची निवडणूक घोषित झाल्यापासून राजकीय आखाडे रंगू लागले आहेत. विविध पक्षांमध्ये आयाराम गयारामांची नाटीका दररोजची असली तरी महायुतीचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाल्याने कार्यकर्ते कामाला लागले आहेत. मात्र, आघाडी बाबत चर्चेचे गुºहाळ सुरुच असल्याने कायकर्ते संभ्रमात आहेत.पालघर लोकसभा शिवसेना लढवणार यावरही शिक्कामोर्तब झाल्याने जिल्ह्यातील शिवसैनिकाना कामाला लागा चा आदेशही मातोश्रीवरु न देण्यात आलेला आहे. यामुळे लवकरच भाजपाचे राजीमाना अस्त्र म्यान होणार हे नक्की आहे. एकीकडे महायुतीची राजकीय भूमिका उमेदवार पक्ष स्पष्ट होत असतानाच दुसरीकडे मात्र महाआघाडीची भूमिका अद्याप गुलदस्त्यातच आहे. बदलत्या राजकीय घडामोडींमुळे शिवसैनिकांनी खेडोपाडी प्रचार सुरु केला असून पोटनिवडणूकीतील बेरीज-वजाबाकी डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी व्यहरचना आखली आहे.पालघर लोकसभा राजकीय दृष्टया तसा दुर्लक्षित मतदार संघ होता मात्र, भाजपाचे दिवंगत खासदार चिंतामण वणगा यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणूकी पासुन याला अतिशय महत्व प्राप्त झाले आहे. कारण राज्यस्तरावरच नव्हे तर देशपातळीवर या मतदार संघाची चर्चा झाली ती एवढी की, युतीची बोलणीही याच मतदारसंघावाचून आडली होती. हे सगळं पाहता आता युती होवून ही जागा शिवसेनेला सोडल्याचे तसेच सेनेकडून श्रीनिवास वणगाच उमेदवार असल्याचे जवळपास निश्चित असल्याने पक्ष कोणता उमेदवार कोण हा निरोप शिवसैनिकांपर्यंत पोहचला आहे.सीपीएम बविआला पाठींबा देवू शकेल का?दुसरीकडे महाआघाडीची कसलीच भूमिका अजुन ठरत नसल्याने कार्यकर्ते सैरभर आहेत कारण कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी स्वबळावर लढू शकेल अशी परीस्थिती जिल्ह्यात अजिबात नाही. याठीकाणी युतीच्या उमेदवाराला टक्कर फक्त बहुजन विकास आघाडीचा उमेदवारच देवू शकतो मात्र, बविआ अपक्ष लढली व महाआघाडीत सीपीएम, कॉंग्रेस व राष्ट्रवादी मिळुन लढली तरीही मग महायुतीसाठी ही जागा सोपी होईल. मात्र, बविआ महाआघाडीत सामिल होवून बविआ आघाडीचे दोन्ही घटक आणि सीपीएम अशी महाआघाडी झाली तर मात्र युतीसाठी ही जागा कठीण होवू शकते.यामुळे भाजपची पारंपारिक असलेली ही जागा सेनेला सोडल्यामुळे बविआ ताकदीने जागा लढु शकते या शिवाय राज्यात विनाअट भाजपाला पाठींबा देणाऱ्या बविआचा कसलाही विचार भाजपाने केला नाही यामुळे बविआ ही जागा लढून वचपा काढू शकते. मात्र, आता महाआघाडीत बविआ सामील होईल का ? कॉंग्रेस राष्ट्रवादी प्रमाणे सीपीएम बविआ ला पाठींबा देवू शकेल का? असे राजकीय पेच कायम आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक