शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

फणसपाडा अंगणवाडी आली मोडकळीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 23:52 IST

पाच लाख खर्च : पं.स.चे दुर्लक्ष

वसई : वसई पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या फणसपाडा येथील अंगणवाडीची वास्तू कोसळण्याच्या स्थितीत असून विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या इमारतीची दुरु स्ती न झाल्याने अशी दुर्दशा झालेली आहे. वसई-विरार महानगरपालिकेकडून दुरु स्तीसाठी फंड मिळून देखील अंगणवाडीत काहीच दुरुस्ती झाली नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

मोडकळीस आलेले छत, भेगा पडलेल्या भिंती, तुटलेल्या खिडक्या आणि दरवाजे तुटलेले शौचालय अशी या इमारतीची परिस्थिती आहे. काहीच महिन्यांपूर्वी या अंगणवाडीतील भांडी देखील चोरीला गेली होती. येथे जवळपास ७० विद्यार्थी शिक्षणाचे प्राथमिक धडे गिरवतात. जर उद्या कोणतीही दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण ? असा सवाल नागीरीकांनी केला आहे. पावसाळ्यात या मुलांची अधिकच गैरसोय होते. नगरसेवक व महानगरपालिके तर्फे वारंवार या अंगणवाडीला मदत केली जाते. महापालिकेने तीन वर्षांपूर्वीच पाच लाख रु पये दुरु स्ती साठी दिले होते. मात्र, त्यातून कोणती दुरुस्ती झाली हा संशोधनाचा विषय ठरणार आहे. दरम्यान, या अंगणवाडीच्या दुरुस्तीसाठी स्थानिकांकडून व महापालिकेकडून अनेकदा प्रस्ताव तयार झाले आहेत हे विशेष.

या अंगणवाडीत गरीब व गरजू कुटुंबातील मुलं पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवत असल्यामुळे त्यांना चांगले शिक्षण देणे ही पंचायत समितीची जबाबदारी आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. 

भांडी चोरीला गेली तेव्हा आम्ही मदत केली होती. आम्ही सतत मदत करत असतो परंतु, पंचायत समितीकडून काहीच प्रयत्न होत नाहीत. फंड कुठे जातो, कुठे वापरतात, तेच समजत नाही. आमचा कडून जितकं शक्य होईल तितकं काम आम्ही करत आहोत.

- प्रफुल्ल पाटील ( नगरसेवक)