शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बोगस बियाणांनी भातशेतीचे नुकसान

By admin | Updated: September 12, 2015 23:08 IST

तालुक्यातील शेतकऱ्यांनी ज्योतिका (अंकुर) व इतर कंपन्यांनी तयार केलेली संकरीत भात बियाणे खरेदी केली होती. ही बियाणे बोगस असल्याने भात पिकात गेसल (भेल) निघाली

वाडा : तालुक्यातील शेतकऱ्यांनी ज्योतिका (अंकुर) व इतर कंपन्यांनी तयार केलेली संकरीत भात बियाणे खरेदी केली होती. ही बियाणे बोगस असल्याने भात पिकात गेसल (भेल) निघाली तर काही भात पिकाना रोगांची लागण झाल्याने ही बियाणे बनविणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेवून कृषी अधिकाऱ्यांनी कुडूस, खैरा या गावांना भेटी देवून येथील शेतकऱ्यांच्या भातशेतीची पाहणी केली.कुडूस येथील शेतकरी इरफान सुसे यांनी या कंपनी विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी वाड्याचे पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्याकडे केली आहे.कृषी अधिकाऱ्यांच्या पथकाने काल कुडूस येथील तक्रारदार शेतकरी इरफान सुसे, शरद चौधरी व खैरे येथील पुंडलीक देशमुख या शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन संपूर्ण भातशेतीची पाहणी केली. यावेळी काही प्रमाणात भेळ, तर जास्त कालावधीच्या भातात लवकर भात आल्याचे दिसले काही ठिकाणी करपा व पाने गुंडाळणारी आळी (बगळ्या) रोगाची लागण झाल्याचे कृषी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.यावर्षी भाताची लागवड करताना भात रोपांचे वय जास्त झाले होते. शिवाय कालावधीच्या अगोदर पिके तयार होत आहेत. भात पिकासाठी आवश्यक असणारा जोराचा पाऊस झालाच नाही व वातावरणातील बदलामुळे भातपीके रोगांची शिकार बनत असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले. भात पिकांवरील सर्व प्रकारची औषधे पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे उपलब्ध झाली असून शेतकऱ्यांनी ती ५० टक्के अनुदानावर खरेदी करून भातशेती रोगमुक्त करावी असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. तालुक्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांच्या भातशेतीत रोगाची लागण झाली आहे अशा भातशेतीची पाहणी कृषी शास्त्रज्ञांकडून केली जाईल असे यावेळी सांगण्यात आले.