शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

बोगस बियाणांनी भातशेतीचे नुकसान

By admin | Updated: September 12, 2015 23:08 IST

तालुक्यातील शेतकऱ्यांनी ज्योतिका (अंकुर) व इतर कंपन्यांनी तयार केलेली संकरीत भात बियाणे खरेदी केली होती. ही बियाणे बोगस असल्याने भात पिकात गेसल (भेल) निघाली

वाडा : तालुक्यातील शेतकऱ्यांनी ज्योतिका (अंकुर) व इतर कंपन्यांनी तयार केलेली संकरीत भात बियाणे खरेदी केली होती. ही बियाणे बोगस असल्याने भात पिकात गेसल (भेल) निघाली तर काही भात पिकाना रोगांची लागण झाल्याने ही बियाणे बनविणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेवून कृषी अधिकाऱ्यांनी कुडूस, खैरा या गावांना भेटी देवून येथील शेतकऱ्यांच्या भातशेतीची पाहणी केली.कुडूस येथील शेतकरी इरफान सुसे यांनी या कंपनी विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी वाड्याचे पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्याकडे केली आहे.कृषी अधिकाऱ्यांच्या पथकाने काल कुडूस येथील तक्रारदार शेतकरी इरफान सुसे, शरद चौधरी व खैरे येथील पुंडलीक देशमुख या शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन संपूर्ण भातशेतीची पाहणी केली. यावेळी काही प्रमाणात भेळ, तर जास्त कालावधीच्या भातात लवकर भात आल्याचे दिसले काही ठिकाणी करपा व पाने गुंडाळणारी आळी (बगळ्या) रोगाची लागण झाल्याचे कृषी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.यावर्षी भाताची लागवड करताना भात रोपांचे वय जास्त झाले होते. शिवाय कालावधीच्या अगोदर पिके तयार होत आहेत. भात पिकासाठी आवश्यक असणारा जोराचा पाऊस झालाच नाही व वातावरणातील बदलामुळे भातपीके रोगांची शिकार बनत असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले. भात पिकांवरील सर्व प्रकारची औषधे पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे उपलब्ध झाली असून शेतकऱ्यांनी ती ५० टक्के अनुदानावर खरेदी करून भातशेती रोगमुक्त करावी असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. तालुक्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांच्या भातशेतीत रोगाची लागण झाली आहे अशा भातशेतीची पाहणी कृषी शास्त्रज्ञांकडून केली जाईल असे यावेळी सांगण्यात आले.