शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
4
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
5
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
6
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
7
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
8
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
9
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
10
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
11
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
12
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
13
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
14
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
15
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
16
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
17
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
18
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
19
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
20
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार

लोकप्रतिनिधींना प्रवास फुकट

By admin | Updated: October 7, 2016 04:34 IST

तोट्यात असल्याचे कारण पुढे करीत सरकारचा कोट्यवधी रुपयांचा कर थकवणाऱ्या आणि सर्वसामान्य प्रवाशांवर दरवाढीचा बोजा टाकणाऱ्या वसई विरार पालिकेच्या परिवहन समितीने

शशी करपे /वसर्ईतोट्यात असल्याचे कारण पुढे करीत सरकारचा कोट्यवधी रुपयांचा कर थकवणाऱ्या आणि सर्वसामान्य प्रवाशांवर दरवाढीचा बोजा टाकणाऱ्या वसई विरार पालिकेच्या परिवहन समितीने आजी माजी खासदार, आमदारांसह विद्यमान नगरसेवकांना बसमधून मोफत प्रवास सवलत जाहीर केली आहे. सतत वादग्रस्त ठरत असतानाही,नवनव्या सुविधांचे गाजर दाखवून प्रवाशांना आकर्षित करु पाहणाऱ्या परिवहन सेवेच्या बसेसमधून प्रवास करण्याची खासदार-आमदारांसह नगरसेवकांना आवश्यकता असल्याचा जावई शोध वसई-विरार महापालिकेच्या परिवहन समितीने लावला आहे.महापालिकेच्या परिवहन सेवेला नुकतीच चार वर्षे पूर्ण झाली आहेत. या चार वर्षात अपघात, काळा विषारी धूर सोडणाऱ्या बसेस, उर्मट चालक-वाहक,प्रवाशांना डावलून दुचाकी वाहनाची केलेली वाहतूक,कालबाह्य बसेस, ७० वर्षांचा म्हातारा ड्रायव्हर अशा अनेक कारणास्तव महापालिकेची परिवहन सेवा वादग्रस्त ठरत गेली. परिवहन खाते आणि ट्रॅफीक पोलिसांनी परिवहनच्या बसेसवर दंडात्मक कारवाया केल्या आहेत. तसेच परिवहन खात्याने सेवा सुधारण्यासंबंधीच्या अनेक नोटीसा बस सेवा चालवणाऱ्या ठेकेदाराला बजावल्या आहेत. त्यामुळे सेवेची प्रतिमा चांगली करण्यासाठी परिवहन समितीद्वारे अनेक महामार्गावर बसेस सुरु करण्याबरोबरच सवलतीच्या घोषणा केल्या आहेत. पाचव्या वर्षात पर्दापण करीत असलेल्या परिवहन सेवेने आजी माजी खासदार, आमदार आणि विद्यमान नगरसेवकांसह परिवहन समिती सदस्यांना मोफत प्रवास सुविधा जाहीर केली आहे. डायलिसीसच्या रुग्णांना राखीव सीट,पुढच्या दाराने प्रवेश आणि तिकीटाच्या दरात सवलत देण्यात येणार आहे.सर्व प्रवाशांना मोफत वायफाय सेवा,दोन महिन्यांच्या पासावर तीन महिने प्रवास करण्याची सुविधा दिली जाणार आहे. या सुविधा सोमवारपासून लागू करण्यात आल्या आहेत. माजी खासदार, आजी-माजी आमदार आणि नगरसेवकांना दिलेल्या मोफत प्रवासाच्या सुविधेमुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यातील मोजक्या नगरसेवकांना वगळता जवळपास सर्वांकडे स्वत:च्या आलीशान गाड्या आहेत. तसेच अनेक जण आपल्या लवाजम्यासह फिरत असतात. त्यांना या सुविधेची कोणतीही आवश्यकता नाही. उलट परिवहन सेवा तोट्यात असल्याने ठेकेदाराने कर भरला नसल्याचे लेखी पत्र पालिकेच्या उपायुक्तांनी दिले आहे. विशेष म्हणजे पालघर जिल्ह्यात सध्या कुपोषणाने डोके वर काढले आहे. त्याच जिल्ह्यातील मोठी आणि श्रीमंत असलेल्या वसई विरार पालिकेचा परिवहन सेवेचा ठेकेदार बाल पोषण आहार अधिभाराची लाखो रुपयांची रक्कम सरकारी तिजोरीत भरण्याऐवजी स्वत: वापरत असल्याकडे सरकारी यंत्रणाही दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते.बाल पोषण आहार अधिभाराचे ५० लाख भरलेच नाहीच्तोट्यात चालत असल्याचे कारण पुढे करीत परिवहन सेवेच्या तिकीट दरात काही महिन्यांपूर्वीच वाढ करून सर्वसामान्य प्रवाशांवर बोजा टाकला होता. धक्कादायक बाब म्हणजे ठेकेदाराने प्रवाशांकडून वसूल केलेला सरकारचा कोट्यवधीचा कर तोटा असल्याने थकवल्याची कबुली खुद्द महापालिकेने माहिती अधिकारात दिली आहे. ठेकेदाराने प्रवाशांकडून सरकारी तिजोर ीत भरणा करावयाचा जानेवारी २०१४ ते जून २०१६ पर्यंत वसूल केलेला २ कोटी ७१ लाख ५० हजार रुपयांचा प्रवासी कर थकवला आहे. च्त्याचबरोबर बाल पोषण आहार अधिभारापोटी ठेकेदाराने प्रवाशांकडून वसूल केलेले एप्रिल २०१४ ते जून २०१६ पर्यंत ५० लाख ७९ हजार ९४८ रुपये अद्याप सरकारी तिजोरीत न भरता स्वत:कडे ठेवले आहेत. ठेकेदाराने या रकमेसह सप्टेंबर महिन्याअखेरपर्यंत वसूल केलेली रक्कम सरकारच्या तिजोरीत अद्याप जमा केलेली नाही.