शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

जनआंदोलन पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पंडित नाही तर पर्यायी उमेदवार उभा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 04:26 IST

२००९ साली वसईच्या राजकारणात उलथापालथ केलेल्या जनआंदोलन समितीने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. माजी आमदार विवेक पंडित यांनी नकार दिला तर पर्यायी उमेदवार तयार ठेवण्यात आला आहे.

- शशी करपेवसई : २००९ साली वसईच्या राजकारणात उलथापालथ केलेल्या जनआंदोलन समितीने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. माजी आमदार विवेक पंडित यांनी नकार दिला तर पर्यायी उमेदवार तयार ठेवण्यात आला आहे.गावांचा वसई विरार महापालिकेत समावेश करण्यात आल्यानंतर विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली जनआंदोलन समितीची स्थापना करण्यात आली होती. समितीने त्यावेळी सत्ताधारी हितेंद्र ठाकूर यांना प्रचंड हादरे दिले होते. विधानसभा निवडणुकीत ठाकूरांच्या उमेदवाराचा पराभव करून विवेक पंडित विधानसभेत पोचले होते. त्यानंतर झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत समितीचे २१ नगरसेवक निवडून गेले होते.तर वसई पंचायत समिती तीने ठाकूरांकडून हिसकावून घेतली होती. वसईतील या राजकीय ध्रुवीकरणाने ठाकूरांच्या साम्राज्याला हादरा दिला होता.मात्र, हा करिष्मा फार टिकला नाही. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत खुद्द हितेंद्र ठाकूर यांनी विवेक पंडित यांचा पराभव केला. त्यानंतर झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत जनआंदोलन समितीचा एकही नगरसेवक निवडून येऊ शकला नाही. ठाकूरांनी वसई पंचायत समितीची सत्ता पुन्हा काबिज केली.विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर विवेक पंडितांनी वसईला रामराम ठोकून आदिवासींच्या प्रश्नावर लढा सुरु करून त्यात लक्ष अधिक केंद्रीत केले. त्यामुळे जनआंदोलन समिती पोरकी झाली होती.नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत काही ठिकाणी विजय मिळाल्याने संजीवनी मिळाली. त्यामुळे समितीने मिलिंद खानोलकर यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे.- दरम्यान, समितीने शनिवारपासून सदस्यता नोंदणी मोहिम सुरु केली आहे. त्याचबरोबर एसटी आणि गावांच्या प्रश्नावर आंदोलन छेडले जाणार आहे. पहिली लोकल ते शेवटच्या लोकलपर्यंत दर पंधरा मिनिटांनी एसटी सेवा होती तशीच सेवा महापालिकेच्या परिवहन सेवेने द्यावी असा आग्रह धरण्यात आला आहे.- त्यासाठी गावागावात सभा घेतल्या जात आहेत. परिवहनची सेवा ठेकेदार चालवत असल्याने फायद्याचा विचार पाहिला जाणार आहे. त्यामुळे एसटीप्रमाणे सेवा मिळणार नसून भाडेही जादा आकारले जाणार असल्याने लोकांचा एसटीसाठीच आग्रह आहे, अशी माहिती डॉमणिका डाबरे यांनी दिली.- ३५ गावे महापालिकेतून वगळण्याची याचिका मुंबई हायकोर्टात प्रलंबित आहे. याप्रकरणी ज्यांच्यापुढे ही सुनावणी सुरु आहे ते न्यायमूर्ती निवृत्त होत आहेत. त्यानंतर गावे वगळण्याच्या प्रश्नासाठी न्यायालयीन लढाई आणि आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार असल्याची माहिती खानोलकर यांनी दिली.

टॅग्स :Electionनिवडणूक