शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Khadse : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
2
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
3
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
4
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
5
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
6
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
7
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
8
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
9
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
10
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
12
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
13
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
14
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
15
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
16
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
17
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
18
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
19
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
20
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले

जनआंदोलन पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पंडित नाही तर पर्यायी उमेदवार उभा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 04:26 IST

२००९ साली वसईच्या राजकारणात उलथापालथ केलेल्या जनआंदोलन समितीने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. माजी आमदार विवेक पंडित यांनी नकार दिला तर पर्यायी उमेदवार तयार ठेवण्यात आला आहे.

- शशी करपेवसई : २००९ साली वसईच्या राजकारणात उलथापालथ केलेल्या जनआंदोलन समितीने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. माजी आमदार विवेक पंडित यांनी नकार दिला तर पर्यायी उमेदवार तयार ठेवण्यात आला आहे.गावांचा वसई विरार महापालिकेत समावेश करण्यात आल्यानंतर विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली जनआंदोलन समितीची स्थापना करण्यात आली होती. समितीने त्यावेळी सत्ताधारी हितेंद्र ठाकूर यांना प्रचंड हादरे दिले होते. विधानसभा निवडणुकीत ठाकूरांच्या उमेदवाराचा पराभव करून विवेक पंडित विधानसभेत पोचले होते. त्यानंतर झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत समितीचे २१ नगरसेवक निवडून गेले होते.तर वसई पंचायत समिती तीने ठाकूरांकडून हिसकावून घेतली होती. वसईतील या राजकीय ध्रुवीकरणाने ठाकूरांच्या साम्राज्याला हादरा दिला होता.मात्र, हा करिष्मा फार टिकला नाही. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत खुद्द हितेंद्र ठाकूर यांनी विवेक पंडित यांचा पराभव केला. त्यानंतर झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत जनआंदोलन समितीचा एकही नगरसेवक निवडून येऊ शकला नाही. ठाकूरांनी वसई पंचायत समितीची सत्ता पुन्हा काबिज केली.विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर विवेक पंडितांनी वसईला रामराम ठोकून आदिवासींच्या प्रश्नावर लढा सुरु करून त्यात लक्ष अधिक केंद्रीत केले. त्यामुळे जनआंदोलन समिती पोरकी झाली होती.नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत काही ठिकाणी विजय मिळाल्याने संजीवनी मिळाली. त्यामुळे समितीने मिलिंद खानोलकर यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे.- दरम्यान, समितीने शनिवारपासून सदस्यता नोंदणी मोहिम सुरु केली आहे. त्याचबरोबर एसटी आणि गावांच्या प्रश्नावर आंदोलन छेडले जाणार आहे. पहिली लोकल ते शेवटच्या लोकलपर्यंत दर पंधरा मिनिटांनी एसटी सेवा होती तशीच सेवा महापालिकेच्या परिवहन सेवेने द्यावी असा आग्रह धरण्यात आला आहे.- त्यासाठी गावागावात सभा घेतल्या जात आहेत. परिवहनची सेवा ठेकेदार चालवत असल्याने फायद्याचा विचार पाहिला जाणार आहे. त्यामुळे एसटीप्रमाणे सेवा मिळणार नसून भाडेही जादा आकारले जाणार असल्याने लोकांचा एसटीसाठीच आग्रह आहे, अशी माहिती डॉमणिका डाबरे यांनी दिली.- ३५ गावे महापालिकेतून वगळण्याची याचिका मुंबई हायकोर्टात प्रलंबित आहे. याप्रकरणी ज्यांच्यापुढे ही सुनावणी सुरु आहे ते न्यायमूर्ती निवृत्त होत आहेत. त्यानंतर गावे वगळण्याच्या प्रश्नासाठी न्यायालयीन लढाई आणि आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार असल्याची माहिती खानोलकर यांनी दिली.

टॅग्स :Electionनिवडणूक