शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
3
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
4
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
5
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
6
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
7
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
8
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
9
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
10
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
11
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
12
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
13
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
14
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
15
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
16
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
17
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
18
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
19
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
20
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...

केंद्रीय राज्यमंत्र्यांसोबत ‘किसान गोष्टी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 00:27 IST

‘किसान गोष्टी’तून शेतकऱ्यांशी संवाद आणि वृक्षारोपण हा अविस्मरणीय क्षण असल्याचे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री (कृषी व किसान कल्याण विभाग) पुरुषोत्तम रुपाला यांनी कोसबाड हिल येथे केले.

डहाणू/बोर्डी : पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील पहिल्या कृषी विज्ञान केंद्रात आयोजित कार्यक्रमात ‘किसान गोष्टी’तून शेतकऱ्यांशी संवाद आणि वृक्षारोपण हा अविस्मरणीय क्षण असल्याचे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री (कृषी व किसान कल्याण विभाग) पुरुषोत्तम रुपाला यांनी कोसबाड हिल येथे केले. यावेळी त्यांनी पंतप्रधानांच्या सहवासातील आठवणींना उजाळा आणि केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.या कृषी विज्ञान केंद्रातील विविध उपक्रमाविषयी माहिती, प्रयोगशाळेची पाहणी, औषधी वनस्पतींचे रोपण तसेच सरस्वती पूजनानंतर कार्यक्र माला प्रारंभ झाला. यावेळी शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ आणि मान्यवरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या सामूहिक शुभेच्छा दिल्या. ते या दिवशी पुष्पगुच्छही न स्वीकारता आईचा आशीर्वाद घेऊन थेट कामाला सुरुवात करतात, या त्यांच्या कार्यपद्धतीची त्यांनी माहिती दिली. आपल्या विद्यार्थी दशेतील अनुभव कथन करताना रुपाला म्हणाले की, त्यावेळी अन्नधान्य दुष्काळाचा सामना करावा लागला होता. सर्वांची ही गरज पूर्ण व्हावी म्हणून देशभर प्रत्येक सोमवारी उपवास केला पाहिजे, असे आवाहन तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी केले होते, आणि त्याला देशवासियांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत आणि वृक्षारोपण कार्यक्रमालाही संपूर्ण देशातून प्रतिसाद मिळत असल्याचे ते म्हणाले. या जिल्ह्यात चिकू बागायती संकटात असल्याचे निवेदन उत्पादकांनी दिले असून हा प्रश्न प्राधान्याने सोडविणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.प्रत्येकाने रोपे लागवड करताना ते टॅग करावे हे सांगताना वृक्षारोपणाचे महत्त्व त्यांनी विशद केले. केंद्र सरकारच्या तिजोरीतून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणे ही खूपच मोठी गोष्ट असून महाराष्ट्र सरकारही हे काम उत्तमरीत्या करीत आहे. देशात २५ लक्ष ग्रामपंचायती असून त्यांना २ लाख करोडचा निधी केंद्र शासनाकडून दिला जातो. तर गावातील प्रति लाभार्थ्यांच्या बँक खात्यात प्रतिवर्षी ४८८ रु पये जमा होतात. वीज, पाणी, गॅस हे शेवटच्या घटकापर्यंत मिळाले पाहिजे, यासाठी मोदी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.दरम्यान प्रमुख शास्त्रज्ञ प्रा.विलास जाधव यांनी या कार्यक्र माच्या प्रास्ताविकात कोसबाड कृषी विज्ञान केंद्राच्या कार्याची माहिती दिली. पाड्यावरच्या आदिवासी बांधवांनी चितारलेली वारली पेंटिंग देऊन केंद्रीय राज्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. शेतकरी प्रतिनिधी नारायण पटलारी, उत्कृष्ट महिला शेळीपालक यांना सन्मानित करण्यासह उपस्थित शेतकºयांना विविध प्रकारची फळांची कलमे भेट देण्यात आली.