शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
3
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
4
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
5
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
6
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
7
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
8
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
9
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
10
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
11
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
12
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
13
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
14
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
15
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
16
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
17
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
18
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
19
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
20
शशी थरूर यांच्याच बालेकिल्ल्यात भाजपचा ऐतिहासिक विजय; काँग्रेस खासदार म्हणाले, "हेच लोकशाहीचं सौंदर्य"
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय राज्यमंत्र्यांसोबत ‘किसान गोष्टी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 00:27 IST

‘किसान गोष्टी’तून शेतकऱ्यांशी संवाद आणि वृक्षारोपण हा अविस्मरणीय क्षण असल्याचे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री (कृषी व किसान कल्याण विभाग) पुरुषोत्तम रुपाला यांनी कोसबाड हिल येथे केले.

डहाणू/बोर्डी : पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील पहिल्या कृषी विज्ञान केंद्रात आयोजित कार्यक्रमात ‘किसान गोष्टी’तून शेतकऱ्यांशी संवाद आणि वृक्षारोपण हा अविस्मरणीय क्षण असल्याचे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री (कृषी व किसान कल्याण विभाग) पुरुषोत्तम रुपाला यांनी कोसबाड हिल येथे केले. यावेळी त्यांनी पंतप्रधानांच्या सहवासातील आठवणींना उजाळा आणि केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.या कृषी विज्ञान केंद्रातील विविध उपक्रमाविषयी माहिती, प्रयोगशाळेची पाहणी, औषधी वनस्पतींचे रोपण तसेच सरस्वती पूजनानंतर कार्यक्र माला प्रारंभ झाला. यावेळी शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ आणि मान्यवरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या सामूहिक शुभेच्छा दिल्या. ते या दिवशी पुष्पगुच्छही न स्वीकारता आईचा आशीर्वाद घेऊन थेट कामाला सुरुवात करतात, या त्यांच्या कार्यपद्धतीची त्यांनी माहिती दिली. आपल्या विद्यार्थी दशेतील अनुभव कथन करताना रुपाला म्हणाले की, त्यावेळी अन्नधान्य दुष्काळाचा सामना करावा लागला होता. सर्वांची ही गरज पूर्ण व्हावी म्हणून देशभर प्रत्येक सोमवारी उपवास केला पाहिजे, असे आवाहन तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी केले होते, आणि त्याला देशवासियांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत आणि वृक्षारोपण कार्यक्रमालाही संपूर्ण देशातून प्रतिसाद मिळत असल्याचे ते म्हणाले. या जिल्ह्यात चिकू बागायती संकटात असल्याचे निवेदन उत्पादकांनी दिले असून हा प्रश्न प्राधान्याने सोडविणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.प्रत्येकाने रोपे लागवड करताना ते टॅग करावे हे सांगताना वृक्षारोपणाचे महत्त्व त्यांनी विशद केले. केंद्र सरकारच्या तिजोरीतून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणे ही खूपच मोठी गोष्ट असून महाराष्ट्र सरकारही हे काम उत्तमरीत्या करीत आहे. देशात २५ लक्ष ग्रामपंचायती असून त्यांना २ लाख करोडचा निधी केंद्र शासनाकडून दिला जातो. तर गावातील प्रति लाभार्थ्यांच्या बँक खात्यात प्रतिवर्षी ४८८ रु पये जमा होतात. वीज, पाणी, गॅस हे शेवटच्या घटकापर्यंत मिळाले पाहिजे, यासाठी मोदी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.दरम्यान प्रमुख शास्त्रज्ञ प्रा.विलास जाधव यांनी या कार्यक्र माच्या प्रास्ताविकात कोसबाड कृषी विज्ञान केंद्राच्या कार्याची माहिती दिली. पाड्यावरच्या आदिवासी बांधवांनी चितारलेली वारली पेंटिंग देऊन केंद्रीय राज्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. शेतकरी प्रतिनिधी नारायण पटलारी, उत्कृष्ट महिला शेळीपालक यांना सन्मानित करण्यासह उपस्थित शेतकºयांना विविध प्रकारची फळांची कलमे भेट देण्यात आली.