शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पालघर जिल्ह्यात पडीक जमिनीवर सोप्या प्रक्रियेने पिकविले मातीतून मोती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 23:47 IST

या जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड हे आदिवासीबहुल भाग, मोठ्या प्रमाणात होणारी जमिनीची धूप आणि जलसिंचनाचा अभाव

पालघर : या जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड हे आदिवासीबहुल भाग, मोठ्या प्रमाणात होणारी जमिनीची धूप आणि जलसिंचनाचा अभाव, यामुळे येथील आदिवासी बांधवांना शेतीची कामे कवळ पावसाळी महिन्यांमध्येच करता येत होती. मात्र जेएसडब्ल्यू फाऊंडेशेनचे कर्मचारी आणि राज्य सरकारच्या एकत्रित प्रयत्नांनी या आदिवासींच्या कमी उपजाऊ जमिनींवर सोपी प्रक्रिया केल्यामुळे या भागातील अनेक शेतकरी आता भाजीपाला उत्पादनाकडे वळत असून पडीक जमिनीच्या मातीतूनही मोती पिकवणे त्यांना शक्य होत आहे.गेल्या काही वर्षांत जेएसडब्ल्यू फाऊंडेशनने पालघर जिल्ह्यातील २००० हेक्टर पडीक जमिनीचा कायापालट घडवत ही जमीन उपजाऊ बनविण्यात यश प्राप्त केले आहे. जेएसडब्ल्यू फाऊंडेशनच्या या प्रयत्नांमुळे तब्बल ७०० शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळाला असून केवळ अर्थाजर्नच नव्हे, तर या शेतकºयांच्या कुटुंबियांना आता सकस अन्न मिळण्याचा मार्गही सुकर झाला आहे.जेएसडब्ल्यू फाऊंडेशनने जिल्ह्यातील कुपोषणाचा प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्टÑ सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे. या अंतर्गत या भागातील शेकडो अंगणवाड्यांमध्ये स्पिरुलिना लाडू व संतुलित आहार पुरवण्यापासून ते कुपोषित बालकांच्या संगोपनाकडे लक्ष ठेवण्यासारखे अनेक उपक्रम राबवले जात आहेत. ‘ही कामे करत असतानाच येथील आदिवासी शेतकºयांच्या अडचणींकडे आमचे लक्ष गेले. यानंतर जमिनीतून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात असल्यामुळे दुसरे पीक घेणे शक्य होत नसे. परिणामी या आदिवासींचा कल अन्य भागांत जाऊन शेतमजुरी करण्याकडे असे. यामुळेच त्यांच्या मुलांना सकस अन्न मिळणे मुश्कील होत होते. याचा थेट परिणाम कुपोषण वाढण्यात होत असल्याचे आमच्या लक्षात आले.’ असे फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिस्वदीप गुप्ता यांनी सांगितले.जेएसडब्ल्यू फाऊंडेशन आणि इक्रेसॅट अर्थात (कउफकरअळ (कल्ल३ी१ल्लं३्रङ्मल्लं’ उ१ङ्मस्र२ फी२ीं१ूँ कल्ल२३्र३४३ी ाङ्म१ ३ँी रीे्र-अ१्र िळ१ङ्मस्र्रू२ - ंल्ल ्रल्ल३ी१ल्लं३्रङ्मल्लं’ ल्लङ्मल्ल-स्र१ङ्मा्र३ ङ्म१ँल्ल्र९ं३्रङ्मल्ल ३ँं३ ४ल्लीि१३ं‘ी२ २ू्रील्ल३्रा्रू १ी२ीं१ूँ ाङ्म१ ीि५ी’ङ्मस्रेील्ल३,) यांनी संयुक्तपणे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी या भागात राज्य सरकारने २००१ मध्ये बांधलेल्या दोन बंधाºयांमधील गाळीव माती येथील काही शेतकºयांच्या जमिनीमध्ये मिसळली. या मातीचा सहा इंचाचा थर जव्हार तालुक्यातल्या कोगदा गावचे महादू भोये यांच्या शेतात मिसळण्यात आला. ‘ या मातीमुळे माझ्या जमिनीचा सुपीकपणा वाढला. एकेकाळी मी फक्त एकवेळ भाताचे पीक घेत होतो. मात्र आता भातापाठोपाठ मी वांगी, मिरच्या आणि तुरडाळीसारख्या कडधान्यांचेही पीक घेतो. याचा फायदा माझ्या कुटुंबाच्या पोषणात तर होतोच, पण मला आता वाढीव पीक बाजारात विकून चार पैसेही मिळतात,’ असे भोये सांगतात.जेएसडब्ल्यू फाउंडेशनने या भागातील तब्बल सहा हजार हेक्टर जमिनीचा कायापालट घडवतानाच शेकडो शेतकºयांना एकीकडे उत्पन्नाचा स्त्रोत देत या भागातील कुपोषणाची समस्या सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ‘याआधी आमची जमीन वाहून जायची. पण आता बांधावर लावलेली तूर तसेच नियंत्रित तापमानात लावलेल्या काकडी, धने, मेथी, कोथिंबीर, अशा भाजीपाल्याचा फायदा आमच्या कुटुंबाला भोजनात तर होतोच पण आम्हाला त्याची विक्रीही करता येते’ असे या परिसरात राहणाºया माथी काशीराम चौधरी, बेबी भुसारा आणि कुसुम रामचंद्र साठे या महिला शेतकºयांनी सांगितले.२०१६ आणि २०१७ मध्ये सरासरी कृषी उत्पन्नात झालेली वाढपीक सध्याच्या पीकप्रक्रियेतून जेएसडब्ल्यू फाऊंडेशनच्याशेतकºयाला मिळत असलेले मदतीनंतर मिळालेले सरासरीसरासरी उत्पन्न (किलो प्रति हेक्टर) उत्पन्न (किलो प्रति हेक्टर)मूग ७६८ १२२४भुईमूग ९१७ १२२४भात २२७० २९२१बाजरी १६३५ १८४३पारवा वाटाणा १०८६ ७५७ज्वारी १८४० २३०८

टॅग्स :Farmerशेतकरी