शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
3
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
4
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
5
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
6
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
7
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
8
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
9
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
10
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
11
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
12
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
13
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
14
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
15
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
16
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
17
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
18
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
19
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
20
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी

पालघर जिल्ह्यात पडीक जमिनीवर सोप्या प्रक्रियेने पिकविले मातीतून मोती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 23:47 IST

या जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड हे आदिवासीबहुल भाग, मोठ्या प्रमाणात होणारी जमिनीची धूप आणि जलसिंचनाचा अभाव

पालघर : या जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड हे आदिवासीबहुल भाग, मोठ्या प्रमाणात होणारी जमिनीची धूप आणि जलसिंचनाचा अभाव, यामुळे येथील आदिवासी बांधवांना शेतीची कामे कवळ पावसाळी महिन्यांमध्येच करता येत होती. मात्र जेएसडब्ल्यू फाऊंडेशेनचे कर्मचारी आणि राज्य सरकारच्या एकत्रित प्रयत्नांनी या आदिवासींच्या कमी उपजाऊ जमिनींवर सोपी प्रक्रिया केल्यामुळे या भागातील अनेक शेतकरी आता भाजीपाला उत्पादनाकडे वळत असून पडीक जमिनीच्या मातीतूनही मोती पिकवणे त्यांना शक्य होत आहे.गेल्या काही वर्षांत जेएसडब्ल्यू फाऊंडेशनने पालघर जिल्ह्यातील २००० हेक्टर पडीक जमिनीचा कायापालट घडवत ही जमीन उपजाऊ बनविण्यात यश प्राप्त केले आहे. जेएसडब्ल्यू फाऊंडेशनच्या या प्रयत्नांमुळे तब्बल ७०० शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळाला असून केवळ अर्थाजर्नच नव्हे, तर या शेतकºयांच्या कुटुंबियांना आता सकस अन्न मिळण्याचा मार्गही सुकर झाला आहे.जेएसडब्ल्यू फाऊंडेशनने जिल्ह्यातील कुपोषणाचा प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्टÑ सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे. या अंतर्गत या भागातील शेकडो अंगणवाड्यांमध्ये स्पिरुलिना लाडू व संतुलित आहार पुरवण्यापासून ते कुपोषित बालकांच्या संगोपनाकडे लक्ष ठेवण्यासारखे अनेक उपक्रम राबवले जात आहेत. ‘ही कामे करत असतानाच येथील आदिवासी शेतकºयांच्या अडचणींकडे आमचे लक्ष गेले. यानंतर जमिनीतून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात असल्यामुळे दुसरे पीक घेणे शक्य होत नसे. परिणामी या आदिवासींचा कल अन्य भागांत जाऊन शेतमजुरी करण्याकडे असे. यामुळेच त्यांच्या मुलांना सकस अन्न मिळणे मुश्कील होत होते. याचा थेट परिणाम कुपोषण वाढण्यात होत असल्याचे आमच्या लक्षात आले.’ असे फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिस्वदीप गुप्ता यांनी सांगितले.जेएसडब्ल्यू फाऊंडेशन आणि इक्रेसॅट अर्थात (कउफकरअळ (कल्ल३ी१ल्लं३्रङ्मल्लं’ उ१ङ्मस्र२ फी२ीं१ूँ कल्ल२३्र३४३ी ाङ्म१ ३ँी रीे्र-अ१्र िळ१ङ्मस्र्रू२ - ंल्ल ्रल्ल३ी१ल्लं३्रङ्मल्लं’ ल्लङ्मल्ल-स्र१ङ्मा्र३ ङ्म१ँल्ल्र९ं३्रङ्मल्ल ३ँं३ ४ल्लीि१३ं‘ी२ २ू्रील्ल३्रा्रू १ी२ीं१ूँ ाङ्म१ ीि५ी’ङ्मस्रेील्ल३,) यांनी संयुक्तपणे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी या भागात राज्य सरकारने २००१ मध्ये बांधलेल्या दोन बंधाºयांमधील गाळीव माती येथील काही शेतकºयांच्या जमिनीमध्ये मिसळली. या मातीचा सहा इंचाचा थर जव्हार तालुक्यातल्या कोगदा गावचे महादू भोये यांच्या शेतात मिसळण्यात आला. ‘ या मातीमुळे माझ्या जमिनीचा सुपीकपणा वाढला. एकेकाळी मी फक्त एकवेळ भाताचे पीक घेत होतो. मात्र आता भातापाठोपाठ मी वांगी, मिरच्या आणि तुरडाळीसारख्या कडधान्यांचेही पीक घेतो. याचा फायदा माझ्या कुटुंबाच्या पोषणात तर होतोच, पण मला आता वाढीव पीक बाजारात विकून चार पैसेही मिळतात,’ असे भोये सांगतात.जेएसडब्ल्यू फाउंडेशनने या भागातील तब्बल सहा हजार हेक्टर जमिनीचा कायापालट घडवतानाच शेकडो शेतकºयांना एकीकडे उत्पन्नाचा स्त्रोत देत या भागातील कुपोषणाची समस्या सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ‘याआधी आमची जमीन वाहून जायची. पण आता बांधावर लावलेली तूर तसेच नियंत्रित तापमानात लावलेल्या काकडी, धने, मेथी, कोथिंबीर, अशा भाजीपाल्याचा फायदा आमच्या कुटुंबाला भोजनात तर होतोच पण आम्हाला त्याची विक्रीही करता येते’ असे या परिसरात राहणाºया माथी काशीराम चौधरी, बेबी भुसारा आणि कुसुम रामचंद्र साठे या महिला शेतकºयांनी सांगितले.२०१६ आणि २०१७ मध्ये सरासरी कृषी उत्पन्नात झालेली वाढपीक सध्याच्या पीकप्रक्रियेतून जेएसडब्ल्यू फाऊंडेशनच्याशेतकºयाला मिळत असलेले मदतीनंतर मिळालेले सरासरीसरासरी उत्पन्न (किलो प्रति हेक्टर) उत्पन्न (किलो प्रति हेक्टर)मूग ७६८ १२२४भुईमूग ९१७ १२२४भात २२७० २९२१बाजरी १६३५ १८४३पारवा वाटाणा १०८६ ७५७ज्वारी १८४० २३०८

टॅग्स :Farmerशेतकरी