शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सुशोभीकरणाच्या भोंगळ कामा मुळे प्रवाश्यांचे अतोनात हाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 13:57 IST

भाईंदर पश्चिमेस रेल्वे स्थानका बाहेर सुशोभीकरणाच्या कामासाठी तब्बल ८ कोटी रुपयांचे कंत्राट महापालिकेने दिले आहे . त्या नुसार ठेकेदाराने रस्त्याच्या लेव्हल पेक्षा सुमारे चार ते ५ फूट उंचीचा पाया बांधला आहे .

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मीर भाईंदर महापालिकेच्या भाईंदर पश्चिम रेल्वे स्थानक बाहेरील नियोजनशून्य सुशोभीकरणाच्या भोंगळ कामा मुळे प्रवाश्यांचे अतोनात हाल होत आहेत . त्यामुळे उंच बांधलेले सदर बांधकाम काढून रेल्वे स्थानकात तसेच तिकीट खिडकी कडे जाण्याचे मार्ग पूर्ववत करा अशी मागणी प्रवाश्यांनी करत संताप व्यक्त केला आहे . 

 

भाईंदर पश्चिमेस रेल्वे स्थानका बाहेर सुशोभीकरणाच्या कामासाठी तब्बल ८ कोटी रुपयांचे कंत्राट महापालिकेने दिले आहे . त्या नुसार ठेकेदाराने रस्त्याच्या लेव्हल पेक्षा सुमारे चार ते ५ फूट उंचीचा पाया बांधला आहे . सदर बांधकामा मुळे रस्ता अतिशय अरुंद झाला आहे . त्यातच रिक्षा उभ्या रहात आहेत जेणे करून प्रवाश्याना तिकीट घराकडे जाणे सुद्धा जिकरीचे झाले आहे . एमबीएमटी , एसटी , बेस्ट ह्या सार्वजनिक परिवहन बस उपक्रमा सह खाजगी बस , रिक्षा , खाजगी दुचाकी व चार चाकी वाहनांनी प्रवाशांची ये - जा ह्याच उत्तरेकडच्या भागातून होत असल्याने वाहतूक कोंडीत प्रचंड भर पडली आहे . 

 

भाईंदर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम दिशेला मुख्य रस्त्याने जोडणारा हा उत्तरेकडचाच एकमेव भाग आहे . त्यामुळे   

भाईंदर रेल्वे स्थानकातून  पश्चिमेला उतरणारे दोन मुख्य जिने उत्तरे कडे आणि मध्य भागातील मोठा जिना देखील उत्तरे कडेच उतरतो . त्यामुळे ह्या तिन्ही जिन्याने ये - जा करणारे हजारो प्रवासी उत्तर दिशेच्या मार्गानेच बाहेर पडतात . 

 

सुशोभीकरणाच्या ह्या ये - जा करण्याचा एकच मार्ग शुल्क राहिला असून तो देखील अतिशय अरुंद असल्याने कोणती दुर्घटना - अपघात घडल्यास बाहेर पडायला प्रवाशांना मोकळा असा दुसरा मार्गच राहिलेला नाही . त्यामुळे चेंगराचेंगरी होऊन एल्फिस्टन सारखी घटना घडू शकते . 

 

मुंबई उच्च न्यायालयाने तर रेल्वे स्थानका पासून १५० मीटर अंतर पर्यंत फेरीवाले सुद्धा बसू देऊ नका असे आदेश दिलेले असताना सुशोभीकरणाच्या ह्या बांधकामा मुळे प्रवाश्याना प्रचंड अडथळा होत आहे . शिवाय फेरीवाले व दुचाकी यांचे अतिक्रमण आणखीनच जाचक ठरले आहे . 

 

सुशोभीकरण चे काम उंच झाल्याने तिकीट घर व लगतचा जिना सखल झाला आहे . त्यामुळे तिकीट काढण्यासाठी आधी वर चढून मग तिकीट घरात जाण्यासाठी खाली उतरावे लागते . तर सुशिभिकरणाच्या बांधकामा लगतचा एकमेवर मार्ग तर खूपच अरुंद असून सर्वच प्रवाश्यांची ये - जा ह्याच ४ - ५ फुटाच्या मार्गातून करावी लागते . त्यातही मध्ये लोखंडी खांब लावलेले असून आता तर दुचाकी व फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढल्याने वाट काढणे प्रवाश्याना जिकरीचे झालेले आहे . वृद्ध , महिलांचीच नव्हे तर पुरुषांची सुद्धा दमछाक होते . 

 

दिनेश उले ( प्रवासी ) - या ठिकाणी ८ कोटी खर्चून सुशोभीकरणाच्या नावाखाली नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी करण्या पेक्षा येथे नागरिकांना प्रशस्त व मोकळे मार्ग ठेवण्याची आवश्यकता आहे . रेल्वे स्थानकात पश्चिमे कडून ये - जा करण्यासाठी एकमेव मार्ग असून तो देखील अरुंद व अतिक्रमणाच्या विळख्यात आहे . अव्यवस्था करून  प्रवाश्याचे हाल करण्यात महापालिका आणि नगरसेवकांना आनंद वाटतो का ? येथील सर्व बांधकाम काढून पूर्वी सारखा परिसर मोकळा करा .