शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

सुशोभीकरणाच्या भोंगळ कामा मुळे प्रवाश्यांचे अतोनात हाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 13:57 IST

भाईंदर पश्चिमेस रेल्वे स्थानका बाहेर सुशोभीकरणाच्या कामासाठी तब्बल ८ कोटी रुपयांचे कंत्राट महापालिकेने दिले आहे . त्या नुसार ठेकेदाराने रस्त्याच्या लेव्हल पेक्षा सुमारे चार ते ५ फूट उंचीचा पाया बांधला आहे .

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मीर भाईंदर महापालिकेच्या भाईंदर पश्चिम रेल्वे स्थानक बाहेरील नियोजनशून्य सुशोभीकरणाच्या भोंगळ कामा मुळे प्रवाश्यांचे अतोनात हाल होत आहेत . त्यामुळे उंच बांधलेले सदर बांधकाम काढून रेल्वे स्थानकात तसेच तिकीट खिडकी कडे जाण्याचे मार्ग पूर्ववत करा अशी मागणी प्रवाश्यांनी करत संताप व्यक्त केला आहे . 

 

भाईंदर पश्चिमेस रेल्वे स्थानका बाहेर सुशोभीकरणाच्या कामासाठी तब्बल ८ कोटी रुपयांचे कंत्राट महापालिकेने दिले आहे . त्या नुसार ठेकेदाराने रस्त्याच्या लेव्हल पेक्षा सुमारे चार ते ५ फूट उंचीचा पाया बांधला आहे . सदर बांधकामा मुळे रस्ता अतिशय अरुंद झाला आहे . त्यातच रिक्षा उभ्या रहात आहेत जेणे करून प्रवाश्याना तिकीट घराकडे जाणे सुद्धा जिकरीचे झाले आहे . एमबीएमटी , एसटी , बेस्ट ह्या सार्वजनिक परिवहन बस उपक्रमा सह खाजगी बस , रिक्षा , खाजगी दुचाकी व चार चाकी वाहनांनी प्रवाशांची ये - जा ह्याच उत्तरेकडच्या भागातून होत असल्याने वाहतूक कोंडीत प्रचंड भर पडली आहे . 

 

भाईंदर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम दिशेला मुख्य रस्त्याने जोडणारा हा उत्तरेकडचाच एकमेव भाग आहे . त्यामुळे   

भाईंदर रेल्वे स्थानकातून  पश्चिमेला उतरणारे दोन मुख्य जिने उत्तरे कडे आणि मध्य भागातील मोठा जिना देखील उत्तरे कडेच उतरतो . त्यामुळे ह्या तिन्ही जिन्याने ये - जा करणारे हजारो प्रवासी उत्तर दिशेच्या मार्गानेच बाहेर पडतात . 

 

सुशोभीकरणाच्या ह्या ये - जा करण्याचा एकच मार्ग शुल्क राहिला असून तो देखील अतिशय अरुंद असल्याने कोणती दुर्घटना - अपघात घडल्यास बाहेर पडायला प्रवाशांना मोकळा असा दुसरा मार्गच राहिलेला नाही . त्यामुळे चेंगराचेंगरी होऊन एल्फिस्टन सारखी घटना घडू शकते . 

 

मुंबई उच्च न्यायालयाने तर रेल्वे स्थानका पासून १५० मीटर अंतर पर्यंत फेरीवाले सुद्धा बसू देऊ नका असे आदेश दिलेले असताना सुशोभीकरणाच्या ह्या बांधकामा मुळे प्रवाश्याना प्रचंड अडथळा होत आहे . शिवाय फेरीवाले व दुचाकी यांचे अतिक्रमण आणखीनच जाचक ठरले आहे . 

 

सुशोभीकरण चे काम उंच झाल्याने तिकीट घर व लगतचा जिना सखल झाला आहे . त्यामुळे तिकीट काढण्यासाठी आधी वर चढून मग तिकीट घरात जाण्यासाठी खाली उतरावे लागते . तर सुशिभिकरणाच्या बांधकामा लगतचा एकमेवर मार्ग तर खूपच अरुंद असून सर्वच प्रवाश्यांची ये - जा ह्याच ४ - ५ फुटाच्या मार्गातून करावी लागते . त्यातही मध्ये लोखंडी खांब लावलेले असून आता तर दुचाकी व फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढल्याने वाट काढणे प्रवाश्याना जिकरीचे झालेले आहे . वृद्ध , महिलांचीच नव्हे तर पुरुषांची सुद्धा दमछाक होते . 

 

दिनेश उले ( प्रवासी ) - या ठिकाणी ८ कोटी खर्चून सुशोभीकरणाच्या नावाखाली नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी करण्या पेक्षा येथे नागरिकांना प्रशस्त व मोकळे मार्ग ठेवण्याची आवश्यकता आहे . रेल्वे स्थानकात पश्चिमे कडून ये - जा करण्यासाठी एकमेव मार्ग असून तो देखील अरुंद व अतिक्रमणाच्या विळख्यात आहे . अव्यवस्था करून  प्रवाश्याचे हाल करण्यात महापालिका आणि नगरसेवकांना आनंद वाटतो का ? येथील सर्व बांधकाम काढून पूर्वी सारखा परिसर मोकळा करा .