शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
4
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
5
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
6
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
7
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
8
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
9
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
10
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
11
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
12
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
13
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
14
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
15
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
16
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
17
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
18
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
19
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
20
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप

सुशोभीकरणाच्या भोंगळ कामा मुळे प्रवाश्यांचे अतोनात हाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 13:57 IST

भाईंदर पश्चिमेस रेल्वे स्थानका बाहेर सुशोभीकरणाच्या कामासाठी तब्बल ८ कोटी रुपयांचे कंत्राट महापालिकेने दिले आहे . त्या नुसार ठेकेदाराने रस्त्याच्या लेव्हल पेक्षा सुमारे चार ते ५ फूट उंचीचा पाया बांधला आहे .

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मीर भाईंदर महापालिकेच्या भाईंदर पश्चिम रेल्वे स्थानक बाहेरील नियोजनशून्य सुशोभीकरणाच्या भोंगळ कामा मुळे प्रवाश्यांचे अतोनात हाल होत आहेत . त्यामुळे उंच बांधलेले सदर बांधकाम काढून रेल्वे स्थानकात तसेच तिकीट खिडकी कडे जाण्याचे मार्ग पूर्ववत करा अशी मागणी प्रवाश्यांनी करत संताप व्यक्त केला आहे . 

 

भाईंदर पश्चिमेस रेल्वे स्थानका बाहेर सुशोभीकरणाच्या कामासाठी तब्बल ८ कोटी रुपयांचे कंत्राट महापालिकेने दिले आहे . त्या नुसार ठेकेदाराने रस्त्याच्या लेव्हल पेक्षा सुमारे चार ते ५ फूट उंचीचा पाया बांधला आहे . सदर बांधकामा मुळे रस्ता अतिशय अरुंद झाला आहे . त्यातच रिक्षा उभ्या रहात आहेत जेणे करून प्रवाश्याना तिकीट घराकडे जाणे सुद्धा जिकरीचे झाले आहे . एमबीएमटी , एसटी , बेस्ट ह्या सार्वजनिक परिवहन बस उपक्रमा सह खाजगी बस , रिक्षा , खाजगी दुचाकी व चार चाकी वाहनांनी प्रवाशांची ये - जा ह्याच उत्तरेकडच्या भागातून होत असल्याने वाहतूक कोंडीत प्रचंड भर पडली आहे . 

 

भाईंदर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम दिशेला मुख्य रस्त्याने जोडणारा हा उत्तरेकडचाच एकमेव भाग आहे . त्यामुळे   

भाईंदर रेल्वे स्थानकातून  पश्चिमेला उतरणारे दोन मुख्य जिने उत्तरे कडे आणि मध्य भागातील मोठा जिना देखील उत्तरे कडेच उतरतो . त्यामुळे ह्या तिन्ही जिन्याने ये - जा करणारे हजारो प्रवासी उत्तर दिशेच्या मार्गानेच बाहेर पडतात . 

 

सुशोभीकरणाच्या ह्या ये - जा करण्याचा एकच मार्ग शुल्क राहिला असून तो देखील अतिशय अरुंद असल्याने कोणती दुर्घटना - अपघात घडल्यास बाहेर पडायला प्रवाशांना मोकळा असा दुसरा मार्गच राहिलेला नाही . त्यामुळे चेंगराचेंगरी होऊन एल्फिस्टन सारखी घटना घडू शकते . 

 

मुंबई उच्च न्यायालयाने तर रेल्वे स्थानका पासून १५० मीटर अंतर पर्यंत फेरीवाले सुद्धा बसू देऊ नका असे आदेश दिलेले असताना सुशोभीकरणाच्या ह्या बांधकामा मुळे प्रवाश्याना प्रचंड अडथळा होत आहे . शिवाय फेरीवाले व दुचाकी यांचे अतिक्रमण आणखीनच जाचक ठरले आहे . 

 

सुशोभीकरण चे काम उंच झाल्याने तिकीट घर व लगतचा जिना सखल झाला आहे . त्यामुळे तिकीट काढण्यासाठी आधी वर चढून मग तिकीट घरात जाण्यासाठी खाली उतरावे लागते . तर सुशिभिकरणाच्या बांधकामा लगतचा एकमेवर मार्ग तर खूपच अरुंद असून सर्वच प्रवाश्यांची ये - जा ह्याच ४ - ५ फुटाच्या मार्गातून करावी लागते . त्यातही मध्ये लोखंडी खांब लावलेले असून आता तर दुचाकी व फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढल्याने वाट काढणे प्रवाश्याना जिकरीचे झालेले आहे . वृद्ध , महिलांचीच नव्हे तर पुरुषांची सुद्धा दमछाक होते . 

 

दिनेश उले ( प्रवासी ) - या ठिकाणी ८ कोटी खर्चून सुशोभीकरणाच्या नावाखाली नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी करण्या पेक्षा येथे नागरिकांना प्रशस्त व मोकळे मार्ग ठेवण्याची आवश्यकता आहे . रेल्वे स्थानकात पश्चिमे कडून ये - जा करण्यासाठी एकमेव मार्ग असून तो देखील अरुंद व अतिक्रमणाच्या विळख्यात आहे . अव्यवस्था करून  प्रवाश्याचे हाल करण्यात महापालिका आणि नगरसेवकांना आनंद वाटतो का ? येथील सर्व बांधकाम काढून पूर्वी सारखा परिसर मोकळा करा .