शहरं
Join us  
Trending Stories
1
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
2
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
3
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
4
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
5
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
6
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
7
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
8
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
9
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
10
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
11
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
12
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
13
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
14
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
15
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
16
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
17
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
18
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
19
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
20
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!

सुशोभीकरणाच्या भोंगळ कामा मुळे प्रवाश्यांचे अतोनात हाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 13:57 IST

भाईंदर पश्चिमेस रेल्वे स्थानका बाहेर सुशोभीकरणाच्या कामासाठी तब्बल ८ कोटी रुपयांचे कंत्राट महापालिकेने दिले आहे . त्या नुसार ठेकेदाराने रस्त्याच्या लेव्हल पेक्षा सुमारे चार ते ५ फूट उंचीचा पाया बांधला आहे .

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मीर भाईंदर महापालिकेच्या भाईंदर पश्चिम रेल्वे स्थानक बाहेरील नियोजनशून्य सुशोभीकरणाच्या भोंगळ कामा मुळे प्रवाश्यांचे अतोनात हाल होत आहेत . त्यामुळे उंच बांधलेले सदर बांधकाम काढून रेल्वे स्थानकात तसेच तिकीट खिडकी कडे जाण्याचे मार्ग पूर्ववत करा अशी मागणी प्रवाश्यांनी करत संताप व्यक्त केला आहे . 

 

भाईंदर पश्चिमेस रेल्वे स्थानका बाहेर सुशोभीकरणाच्या कामासाठी तब्बल ८ कोटी रुपयांचे कंत्राट महापालिकेने दिले आहे . त्या नुसार ठेकेदाराने रस्त्याच्या लेव्हल पेक्षा सुमारे चार ते ५ फूट उंचीचा पाया बांधला आहे . सदर बांधकामा मुळे रस्ता अतिशय अरुंद झाला आहे . त्यातच रिक्षा उभ्या रहात आहेत जेणे करून प्रवाश्याना तिकीट घराकडे जाणे सुद्धा जिकरीचे झाले आहे . एमबीएमटी , एसटी , बेस्ट ह्या सार्वजनिक परिवहन बस उपक्रमा सह खाजगी बस , रिक्षा , खाजगी दुचाकी व चार चाकी वाहनांनी प्रवाशांची ये - जा ह्याच उत्तरेकडच्या भागातून होत असल्याने वाहतूक कोंडीत प्रचंड भर पडली आहे . 

 

भाईंदर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम दिशेला मुख्य रस्त्याने जोडणारा हा उत्तरेकडचाच एकमेव भाग आहे . त्यामुळे   

भाईंदर रेल्वे स्थानकातून  पश्चिमेला उतरणारे दोन मुख्य जिने उत्तरे कडे आणि मध्य भागातील मोठा जिना देखील उत्तरे कडेच उतरतो . त्यामुळे ह्या तिन्ही जिन्याने ये - जा करणारे हजारो प्रवासी उत्तर दिशेच्या मार्गानेच बाहेर पडतात . 

 

सुशोभीकरणाच्या ह्या ये - जा करण्याचा एकच मार्ग शुल्क राहिला असून तो देखील अतिशय अरुंद असल्याने कोणती दुर्घटना - अपघात घडल्यास बाहेर पडायला प्रवाशांना मोकळा असा दुसरा मार्गच राहिलेला नाही . त्यामुळे चेंगराचेंगरी होऊन एल्फिस्टन सारखी घटना घडू शकते . 

 

मुंबई उच्च न्यायालयाने तर रेल्वे स्थानका पासून १५० मीटर अंतर पर्यंत फेरीवाले सुद्धा बसू देऊ नका असे आदेश दिलेले असताना सुशोभीकरणाच्या ह्या बांधकामा मुळे प्रवाश्याना प्रचंड अडथळा होत आहे . शिवाय फेरीवाले व दुचाकी यांचे अतिक्रमण आणखीनच जाचक ठरले आहे . 

 

सुशोभीकरण चे काम उंच झाल्याने तिकीट घर व लगतचा जिना सखल झाला आहे . त्यामुळे तिकीट काढण्यासाठी आधी वर चढून मग तिकीट घरात जाण्यासाठी खाली उतरावे लागते . तर सुशिभिकरणाच्या बांधकामा लगतचा एकमेवर मार्ग तर खूपच अरुंद असून सर्वच प्रवाश्यांची ये - जा ह्याच ४ - ५ फुटाच्या मार्गातून करावी लागते . त्यातही मध्ये लोखंडी खांब लावलेले असून आता तर दुचाकी व फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढल्याने वाट काढणे प्रवाश्याना जिकरीचे झालेले आहे . वृद्ध , महिलांचीच नव्हे तर पुरुषांची सुद्धा दमछाक होते . 

 

दिनेश उले ( प्रवासी ) - या ठिकाणी ८ कोटी खर्चून सुशोभीकरणाच्या नावाखाली नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी करण्या पेक्षा येथे नागरिकांना प्रशस्त व मोकळे मार्ग ठेवण्याची आवश्यकता आहे . रेल्वे स्थानकात पश्चिमे कडून ये - जा करण्यासाठी एकमेव मार्ग असून तो देखील अरुंद व अतिक्रमणाच्या विळख्यात आहे . अव्यवस्था करून  प्रवाश्याचे हाल करण्यात महापालिका आणि नगरसेवकांना आनंद वाटतो का ? येथील सर्व बांधकाम काढून पूर्वी सारखा परिसर मोकळा करा .