शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पापडखिंड धरणातील छटपूजा यंदा तरी महापालिका रोखणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 06:10 IST

होते प्रचंड प्रदूषण : आदेशाला कुणीच घालत नाही भीक

वसई : विरार पूर्व येथील व गेल्या चार दशकांपासून विरारकरांची तहान भागवणाऱ्या पापडखींड धरणात छटपूजा करण्यास यंदा महापालिका मनाई करणार की नाही? याकडे सगळ्या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. छटपूजेमुळे त्यातील पाणी गेल्या वर्षभरापासून दूषित झाल्यामुळे त्यातून होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. महानगरपालिकेची सुरक्षा यंत्रणा नसल्यामुळे सध्या या धरण क्षेत्रात नागरीक आपल्या गाड्या धुण्यासाठी सर्रास आणत असतात. तसेच छटपूजा समिती यंदाही छटपूजेचे धरणात आयोजन करणार असल्याची माहिती आल्यामुळे महानगरपालिकेकडे नवा पेच निर्माण झाला आहे.

विरार पूर्व येथील महानगरपालिकेच्या मालिकचे पापडखींड धरण हे शहरातील सर्वात जुने धरण म्हणून प्रसिद्ध आहे. ते जीवदानी डोंगराच्या पायथ्याशी फुलपाडा येथे बांधण्यात आलेले आहे. या धरणातून विरारकरांना दररोज एक दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र गेल्या काही वर्षात या धरणाचे पाणी छटपूजेमुळे प्रदूषित होऊ लागले होते. छटपूजा केली जात असल्यामुळे तसेच येणा-या पर्यटकांकडून कचरा टाकला जात असल्यामुळे हे प्रदूषित पाणी पिण्यास अयोग्य झाले होते. त्यानंतर या धरणातून शहराला होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. याठिकाणी नंतर महानगरपालिकेची वॉटर पार्क बनविण्याची योजना होती, मात्र पर्यावरणवादी संघटना व नागरिकांनी याला विरोध केल्यावर हि योजना तूर्तास थांबविण्यात आली. मात्र आता या धरणाला कोणी वालीच उरला नसल्याचे समोर आले आहे. अनेकदा या परिसरात खाजगी वाहन चालक, रिक्षाचालक आपली वाहने धुण्यासाठी आणत असतात. तेथे कोणीही सुरक्षा रक्षक नसल्यामुळे त्यांना कोणीही अडवत नाही.या धरणात महानगरपालिकेचा विरोध डावलून मोठ्या प्रमाणात छटपूजा केली जाते. हजारो लोक पूजे निमित्त धरणाच्या पाण्यात उतरून तेलाचे दिवे, नैवैद्याची फळे, फुले, पाने पाण्यात सोडत असतात. पन्नास ते साठ हजार नागरीक या धरणाच्या पाण्यात उतरत असल्यामुळे पाणी प्रदूषित होते. मध्यंतरी धरणाच्या पाण्यात कुजलेला मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर या धरणातील पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता.महापालिकेचे होते आहे अक्षम्य दुर्लक्षमहानगरपालिका लक्ष देत नाही, तरी परिसरातील सुजाण नागरिक आणि विद्यार्थी पापडखींड धरण परिसरात स्वच्छता मोहिम हाती घेत असतात. 1972 साली धरण बांधले तेव्हा विरारची लोकसंख्या 15 हजार होती.धरणाची निर्मिती करण्यात आल्यानंतर दर दिवशी एक दशलक्ष लिटर पाणीपुरवठा विरार शहराला करण्यात येऊ लागला. मात्र प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हे धरण आता प्रदुषित झाले आहे.धरणाच्या पाण्यात छटपूजा, आंघोळ, वाहनांची धुलाई, तेलाचे दिवे सोडणे, निर्माल्य विसर्जन याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही करण्यात येतो आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार