शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
2
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 
3
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
4
थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग...
5
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
6
Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!
7
अरे व्वा...! या ढासू 7-सीटर SUV वर तब्बल ₹1.50 लाखांचा कॅश डिस्काउंट; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
8
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
9
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
10
बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
11
Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!
12
Test Cricket: कसोटी कारकिर्दीत १० षटकारही मारले नाहीत असे ५ क्रिकेटपटू, यादीत एक भारतीय!
13
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
14
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
15
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
16
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...
17
Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!
18
अतूट प्रेम! कोमात असलेल्या लेकीला शुद्धीवर आणण्यासाठी १० वर्ष आईने रोज केला डान्स अन्...
19
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी! IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी, एशियन पेंट्स टॉप गेनर, कुठे झाली घसरण?
20
Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा

पापडखिंड धरणातील छटपूजा यंदा तरी महापालिका रोखणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 06:10 IST

होते प्रचंड प्रदूषण : आदेशाला कुणीच घालत नाही भीक

वसई : विरार पूर्व येथील व गेल्या चार दशकांपासून विरारकरांची तहान भागवणाऱ्या पापडखींड धरणात छटपूजा करण्यास यंदा महापालिका मनाई करणार की नाही? याकडे सगळ्या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. छटपूजेमुळे त्यातील पाणी गेल्या वर्षभरापासून दूषित झाल्यामुळे त्यातून होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. महानगरपालिकेची सुरक्षा यंत्रणा नसल्यामुळे सध्या या धरण क्षेत्रात नागरीक आपल्या गाड्या धुण्यासाठी सर्रास आणत असतात. तसेच छटपूजा समिती यंदाही छटपूजेचे धरणात आयोजन करणार असल्याची माहिती आल्यामुळे महानगरपालिकेकडे नवा पेच निर्माण झाला आहे.

विरार पूर्व येथील महानगरपालिकेच्या मालिकचे पापडखींड धरण हे शहरातील सर्वात जुने धरण म्हणून प्रसिद्ध आहे. ते जीवदानी डोंगराच्या पायथ्याशी फुलपाडा येथे बांधण्यात आलेले आहे. या धरणातून विरारकरांना दररोज एक दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र गेल्या काही वर्षात या धरणाचे पाणी छटपूजेमुळे प्रदूषित होऊ लागले होते. छटपूजा केली जात असल्यामुळे तसेच येणा-या पर्यटकांकडून कचरा टाकला जात असल्यामुळे हे प्रदूषित पाणी पिण्यास अयोग्य झाले होते. त्यानंतर या धरणातून शहराला होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. याठिकाणी नंतर महानगरपालिकेची वॉटर पार्क बनविण्याची योजना होती, मात्र पर्यावरणवादी संघटना व नागरिकांनी याला विरोध केल्यावर हि योजना तूर्तास थांबविण्यात आली. मात्र आता या धरणाला कोणी वालीच उरला नसल्याचे समोर आले आहे. अनेकदा या परिसरात खाजगी वाहन चालक, रिक्षाचालक आपली वाहने धुण्यासाठी आणत असतात. तेथे कोणीही सुरक्षा रक्षक नसल्यामुळे त्यांना कोणीही अडवत नाही.या धरणात महानगरपालिकेचा विरोध डावलून मोठ्या प्रमाणात छटपूजा केली जाते. हजारो लोक पूजे निमित्त धरणाच्या पाण्यात उतरून तेलाचे दिवे, नैवैद्याची फळे, फुले, पाने पाण्यात सोडत असतात. पन्नास ते साठ हजार नागरीक या धरणाच्या पाण्यात उतरत असल्यामुळे पाणी प्रदूषित होते. मध्यंतरी धरणाच्या पाण्यात कुजलेला मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर या धरणातील पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता.महापालिकेचे होते आहे अक्षम्य दुर्लक्षमहानगरपालिका लक्ष देत नाही, तरी परिसरातील सुजाण नागरिक आणि विद्यार्थी पापडखींड धरण परिसरात स्वच्छता मोहिम हाती घेत असतात. 1972 साली धरण बांधले तेव्हा विरारची लोकसंख्या 15 हजार होती.धरणाची निर्मिती करण्यात आल्यानंतर दर दिवशी एक दशलक्ष लिटर पाणीपुरवठा विरार शहराला करण्यात येऊ लागला. मात्र प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हे धरण आता प्रदुषित झाले आहे.धरणाच्या पाण्यात छटपूजा, आंघोळ, वाहनांची धुलाई, तेलाचे दिवे सोडणे, निर्माल्य विसर्जन याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही करण्यात येतो आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार