शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

वसई तालुक्यातील पाली-सत्पाळ्यात ४० जणांची माघार, ३५ उमेदवार रिंगणात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 00:15 IST

१५ जानेवारी रोजी मतदान : १८ जानेवारीला होणार उमेदवारांचा फैसला

सुनील घरतलोकमत न्यूज नेटवर्कपारोळ :  वसई तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले असून नवीन वर्षातील ही पहिली निवडणूक असल्याने सर्व राजकीय पक्षांनी पाली व सत्पाळा ग्रामपंचायत निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले आहेत. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ४० उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून आता ३५ उमेदवार रिंगणात उरले आहेत.  कोरोनाकाळात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली असून यात पालघर जिल्ह्यात फक्त तीन ग्रामपंचायतींचा समावेश आहे. पालघर तालुक्यातील सांगावे तसेच वसईतील पाली आणि सत्पाळा या ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होत आहेत. वसईतील दोन ग्रामपंचायत निवडणुकांसाठी ७५ अर्ज आले होते. माघार घेण्याच्या दिवशी ४० जणांनी आपले अर्ज मागे घेतल्याने आता सत्पाळा ग्रामपंचायतीमध्ये २७ उमेदवार तर  पालीमध्ये आठ उमेदवार रिंगणात आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर कोरोना महामारीमुळे कोणतीही निवडणूक न झाल्याने वर्षभरातील ही पहिलीच ग्रामपंचायत निवडणूक आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांतील कार्यकर्ते यांनाही या ग्रामपंचायत निवडणुकीची उत्सुकता आहे. 

सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार आजमावताहेत नशीबवसई तालुक्याच्या ग्रामीण भागात होत असलेल्या दोन ग्रामपंचायत निवडणुकीकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. या निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांचे स्थानिक कार्यकर्ते निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. आधी बहुजन विकास आघाडीची सत्ता असलेल्या या ग्रामपंचायतींमध्ये अन्य पक्षांनीही मोठा जोर लावला आहे. 

उमेदवारांची निवडणुकीतून मोठ्या प्रमाणात माघार प्रत्येक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत निवडणूक ही राजकारणातील प्रवेशाची पहिली पायरी असते. त्यामुळे या दोन ग्रामपंचायतींच्या केवळ ७ प्रभागांसाठी तब्बल ७५ जणांनी उमेदवारी अर्ज भरले होते. मात्र देण्या-घेण्याचे व्यवहार तसेच अन्य बाबींमधील मतैक्यानंतर ४० जणांनी माघार घेतली आहे. 

वसई तालुक्यातील पाली आणि सत्पाळा या दोन ग्रामपंचायतींच्या होत असलेल्या  निवडणुकीमध्ये उमेदवारांना सोमवारीच निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले आहे. १५ जानेवारी रोजी होत असलेल्या मतदानासाठी प्रशासन सज्ज झालेले आहे. परिसरात काही अनुचित घटना घडू नये यासाठी काळजी घेतली जात असून १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. -उज्ज्वला भगत, तहसीलदार, वसई

राजकीय पक्षांसाठी महत्त्वाची लढाई कोरोनानंतर येथील राजकीय पक्षांसाठी ही पहिली निवडणूक असल्याने ती जिंकण्यासाठी मोठे हातपाय मारावे लागणार आहेत. वसई तालुक्यात वर्षभरात वसई-विरार शहर महापालिका तसेच अनेक काही ग्रामपंचायत निवडणुकींचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता असल्याने पुढे येऊ घातलेल्या निवडणुकीसाठी ही ग्रामपंचायत निवडणूक जिंकणे महत्त्वाचे ठरणार आहे.