शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

पिंजाळ नदीवरील पाली बंधाऱ्याला गळतीचा फटका; पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 23:17 IST

भाजीपाला लागवड केलेला शेतकरी चिंतातुर

वाडा : तालुक्यातील पिंजाळ नदीवरील पाली येथे असलेल्या कोल्हापुरी बंधाºयाला मोठ्या प्रमाणात गळती लागली असून बंधाºयातील पाणी मोठ्या प्रमाणात वाया जात आहे. काही दिवसातच हा बंधारा कोरडा पडण्याची भीती आहे. याचा फटका आजुबाजूच्या गावातील नळयोजना आणि भाजीपाला लावलेल्या शेतकऱ्यांना बसणार आहे.

वाडा आणि विक्रमगड तालुक्यातून वाहणाºया पिंजाळ नदीवर अनेक ठिकाणी बंधारे बांधले आहेत. काही ठिकाणी जुने झालेले बंधारे तर काही ठिकाणी निकृष्ट बांधकामामुळे हे बंधारे निकामी झाले आहेत. याचा फटका अनेक गावांना आणि शेतकºयांना बसत असून पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीसाठी लागणाºया पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे.

पिंजाळ नदीवरील पाली येथील बंधाºयाच्या पाण्याचा अनेक गावांना पाणीपुरवठा केला जातो. तसेच या पाण्याच्या आधारे मोठ्या प्रमाणात शेतकºयांनी भाजीपाला लागवड केली आहे. मात्र, बंधाºयाला लागलेल्या गळतीमुळे बंधाºयातील पाणी काही दिवसांतच पूर्णपणे खाली होणार आहे. अजूनही पावसाळा येण्यासाठी पाच महिने बाकी आहेत. जर बंधाºयाची गळती थांबली नाही, तर बंधारा पूर्ण कोरडा पडून पाण्याअभावी लावलेला भाजीपाला जळून जाणार असून शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. आधीच संकटात असलेला बळीराजा पुन्हा संकटात सापडणार आहे. त्यामुळे प्रशासनाने आणि लघू पाटबंधारे विभागाने त्वरित लक्ष देऊन या बंधाºयाची दुरूस्ती करून होणारी पाण्याची गळती थांबवण्याची मागणी शेतकरी आणि नागरिक करत आहेत. पाली येथील पिंजाळ नदीवर असलेल्या कोल्हापुरी बंधाºयाला २८ दरवाजे असून ते पावसाळ्यानंतर लोखंडी प्लेट टाकून बंद केले जातात. मात्र, या सर्व दरवाज्यांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती राहते. या प्लेट रबराने बंद करावयाच्या असतात.पिंजाळ नदीवरील पाली येथील बंधाºयाच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात भाजीपाला लागवड केली आहे. मात्र बंधाºयाला लागलेल्या गळतीमुळे या बंधाºयातील पाणी पूर्णपणे खाली होणार आहे. या गळतीमुळे काही दिवसांतच बंधारा कोरडा पडेल. त्यामुळे आम्हा शेतकºयांसाठी पाण्याचे मोठे संकट निर्माण होणार आहे. प्रशासनाने लवकरात लवकर ही गळती थांबवावी आणि आम्हा शेतकºयांना दिलासा द्यावा. - सागर सालकर, शेतकरीया बंधाºयाचे गेट चांगल्या प्रकारे बसविण्यात आले होते. मात्र वाळूमाफिया हे बंद केलेले गेट उघडत असल्याने पाणी वाया जात आहे. याबाबत आम्ही तहसीलदार आणि पोलीस कार्यालयात लेखी पत्र दिले आहे. तसेच बंधाºयाच्या दुरूस्तीचे काम काढण्यात आले आहे. मात्र, ठेकेदाराने ते काम केलेले नाही. यंदा हे दुरुस्तीचे काम केले जाईल. - एम.आर.पाटील, लघु पाटबंधारे विभाग