शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuwanshi: सोनमच्या हातात काठी, पाठीमागे चालतोय राजा; हत्येपूर्वी युट्यूबरच्या व्हिडीओत झाले कैद
2
अवघे २० दिवस उरले...! जुन्या, नव्या 'बाबा वेंगा'नी केलीय मोठी भविष्यवाणी; आधीच्या चार ठरल्यात खऱ्या...
3
Israel Iran Conflict : इस्त्रायली हल्ल्यात इराणमध्ये दोन भारतीय विद्यार्थी जखमी; भारताने परत आणण्याची तयारी केली, या मार्गाने आणले जाणार
4
मुंबई मेट्रो- १ मार्गिकेवर तांत्रिक बिघाड, वर्सोवाकडे जाणारी वाहतूक रखडली, प्रवाशांचे हाल
5
७२ तासांच्या युद्धात भीषण विध्वंस! ४०६ इराणींचा मृत्यू, इस्रायलचे किती नुकसान? जाणून घ्या...
6
VIDEO : 'मी घरीच आहे अन्...', लाइव्ह कॅमेरॅवरच डेल स्टेनला रडू कोसळलं; नेमकं काय घडलं?
7
शूटिंगसाठी निघालेल्या मॉडेलची निर्घृण हत्या;मृतदेह कालव्यात फेकला, टॅटूवरून पटली ओळख
8
इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात हैफा बंदराचं मोठं नुकसान? अदानी समुहानं दिली अशी माहिती   
9
Pune Bridge Collapse: पुलाखाली अडकलेल्यांना काढले; पुलाचा सांगाडा काढण्यास चार क्रेन
10
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
11
इराणने थेट अमेरिकन दूतावासावर डागली मिसाइल्स, इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये घबराट
12
'अनेक वेळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
13
G20 च्या पडद्यामागील हिरो अमिताभ कांत यांचा राजीनामा! ४५ वर्षांच्या सेवेला का दिली पूर्ण विराम?
14
संजय कपूर यांचा शेवटचा फोटो समोर, कॅप्टनसोबत हसताना दिसले; पोलो खेळतानाच गेला जीव
15
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
16
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
17
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
18
Monsoon Picnic: सध्या पावसाळी सहलीला जाताना जरा सांभाळूनच; वाचा 'ही' मार्मिक कथा!
19
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
20
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?

पिंजाळ नदीवरील पाली बंधाऱ्याला गळतीचा फटका; पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 23:17 IST

भाजीपाला लागवड केलेला शेतकरी चिंतातुर

वाडा : तालुक्यातील पिंजाळ नदीवरील पाली येथे असलेल्या कोल्हापुरी बंधाºयाला मोठ्या प्रमाणात गळती लागली असून बंधाºयातील पाणी मोठ्या प्रमाणात वाया जात आहे. काही दिवसातच हा बंधारा कोरडा पडण्याची भीती आहे. याचा फटका आजुबाजूच्या गावातील नळयोजना आणि भाजीपाला लावलेल्या शेतकऱ्यांना बसणार आहे.

वाडा आणि विक्रमगड तालुक्यातून वाहणाºया पिंजाळ नदीवर अनेक ठिकाणी बंधारे बांधले आहेत. काही ठिकाणी जुने झालेले बंधारे तर काही ठिकाणी निकृष्ट बांधकामामुळे हे बंधारे निकामी झाले आहेत. याचा फटका अनेक गावांना आणि शेतकºयांना बसत असून पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीसाठी लागणाºया पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे.

पिंजाळ नदीवरील पाली येथील बंधाºयाच्या पाण्याचा अनेक गावांना पाणीपुरवठा केला जातो. तसेच या पाण्याच्या आधारे मोठ्या प्रमाणात शेतकºयांनी भाजीपाला लागवड केली आहे. मात्र, बंधाºयाला लागलेल्या गळतीमुळे बंधाºयातील पाणी काही दिवसांतच पूर्णपणे खाली होणार आहे. अजूनही पावसाळा येण्यासाठी पाच महिने बाकी आहेत. जर बंधाºयाची गळती थांबली नाही, तर बंधारा पूर्ण कोरडा पडून पाण्याअभावी लावलेला भाजीपाला जळून जाणार असून शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. आधीच संकटात असलेला बळीराजा पुन्हा संकटात सापडणार आहे. त्यामुळे प्रशासनाने आणि लघू पाटबंधारे विभागाने त्वरित लक्ष देऊन या बंधाºयाची दुरूस्ती करून होणारी पाण्याची गळती थांबवण्याची मागणी शेतकरी आणि नागरिक करत आहेत. पाली येथील पिंजाळ नदीवर असलेल्या कोल्हापुरी बंधाºयाला २८ दरवाजे असून ते पावसाळ्यानंतर लोखंडी प्लेट टाकून बंद केले जातात. मात्र, या सर्व दरवाज्यांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती राहते. या प्लेट रबराने बंद करावयाच्या असतात.पिंजाळ नदीवरील पाली येथील बंधाºयाच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात भाजीपाला लागवड केली आहे. मात्र बंधाºयाला लागलेल्या गळतीमुळे या बंधाºयातील पाणी पूर्णपणे खाली होणार आहे. या गळतीमुळे काही दिवसांतच बंधारा कोरडा पडेल. त्यामुळे आम्हा शेतकºयांसाठी पाण्याचे मोठे संकट निर्माण होणार आहे. प्रशासनाने लवकरात लवकर ही गळती थांबवावी आणि आम्हा शेतकºयांना दिलासा द्यावा. - सागर सालकर, शेतकरीया बंधाºयाचे गेट चांगल्या प्रकारे बसविण्यात आले होते. मात्र वाळूमाफिया हे बंद केलेले गेट उघडत असल्याने पाणी वाया जात आहे. याबाबत आम्ही तहसीलदार आणि पोलीस कार्यालयात लेखी पत्र दिले आहे. तसेच बंधाºयाच्या दुरूस्तीचे काम काढण्यात आले आहे. मात्र, ठेकेदाराने ते काम केलेले नाही. यंदा हे दुरुस्तीचे काम केले जाईल. - एम.आर.पाटील, लघु पाटबंधारे विभाग