शहरं
Join us  
Trending Stories
1
१० टक्के पगारवाढ राहुद्या...! दिवाळी दोन दिवसांवर आली, NHM कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून पगारच नाही...
2
राऊत म्हणतात, राज ठाकरे सोबत जाण्यास इच्छूक; पण काँग्रेस नेते म्हणाले, मनसेबाबत चर्चा नाही!
3
भारताची खासगी बँक विकली जाणार! दुबईच्या शेखची मोठी बँक हजारो कोटी रुपये ओतणार, RBI ने दिला होकार...
4
छिंदवाडा'मध्ये झालेल्या मुलांच्या मृत्यूवर 'WHO' ने कडक कारवाई केली; या तीन सिरपबाबत इशारा दिला
5
VIDEO : गिलनं पहिली ट्रॉफी जिंकताच धोनी-विराट-रोहितची परंपरा जपली! पण...
6
नोकरी गमावली, वडिलांनी घराबाहेर काढलं..तरुणाने उभं केलं कोट्यवधींचे साम्राज्य, नेमकं काय करतो?
7
रिन्यूएबल्स, डिफेन्ससह फायनान्समधील 'हे' ५ स्टॉक्स देतील जबरदस्त परतावा; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राईज
8
हलगर्जीपणाचा कळस! नर्सने रागात चुकीची आयव्ही लाईन लावली, इन्फेक्शनमुळे हात कापण्याची वेळ
9
Diwali 2025: मनी प्लांटचा 'डबल धमाका'! दिवाळीत 'या' दिवशी' खरेदी करा, दुप्पट लाभ मिळवा!
10
HCL-TCS Salary Hike: एचसीएल आणि टीसीएस कर्मचाऱ्यांना मिळालं दिवाळी गिफ्ट; इनक्रिमेंट आणि बोनसची घोषणा
11
IND vs WI : दिल्लीच्या बालेकिल्ल्यात टीम इंडियाचा मोठा पराक्रम! दक्षिण आफ्रिकेच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी
12
दिवाळीत स्वामींना घरी आणताय? आयुष्यभर सोबत करतील; अनंत कृपा होईल, स्थापनेचे ‘हे’ नियम पाळा!
13
Cough Syrup : मोठा खुलासा! १०% कमिशनच्या नादात २३ मुलांचा मृत्यू; कफ सिरपसाठी डॉक्टरला मिळायचे पैसे
14
IND vs WI : KL राहुलचं नाबाद अर्धशतक; कसोटीत शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने जिंकली पहिली ट्रॉफी
15
बिहार निवडणूक: तेजस्वी यादव काँग्रेससोबतच्या बैठकीतून निघून आले; राहुल गांधी, खर्गेंना न भेटताच बिहारला पोहोचले...
16
बँकांच्या मागण्यांना कंटाळला विजय मल्ल्या; म्हणाला,"माझ्याकडून पैसे मागणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे," भारतातच प्रकरण मिटवण्याची दिली ऑफर
17
दिवाळी २०२५: धन-सुख-समृद्धीची इच्छा पूर्ण होईल, ‘अशी’ करा लक्ष्मी आगमनाची तयारी; शुभच घडेल!
18
ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! पहिल्याच वन-डेमधून 'हे' दोन महत्त्वाचे खेळाडू बाहेर; भारतीय संघाने टाकला सुटकेचा नि:श्वास...
19
ईपीएफओने पैसे काढण्यासंबंधी तब्बल १३ नियम बदलले; आता संपूर्ण शिल्लक काढता येणार नाही
20
दिवाळीच्या साफसफाईत आईला सापडला 'खजिना'; २ हजारांच्या तब्बल २ लाखांच्या नोटा, पण...

पिंजाळ नदीवरील पाली बंधाऱ्याला गळतीचा फटका; पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 23:17 IST

भाजीपाला लागवड केलेला शेतकरी चिंतातुर

वाडा : तालुक्यातील पिंजाळ नदीवरील पाली येथे असलेल्या कोल्हापुरी बंधाºयाला मोठ्या प्रमाणात गळती लागली असून बंधाºयातील पाणी मोठ्या प्रमाणात वाया जात आहे. काही दिवसातच हा बंधारा कोरडा पडण्याची भीती आहे. याचा फटका आजुबाजूच्या गावातील नळयोजना आणि भाजीपाला लावलेल्या शेतकऱ्यांना बसणार आहे.

वाडा आणि विक्रमगड तालुक्यातून वाहणाºया पिंजाळ नदीवर अनेक ठिकाणी बंधारे बांधले आहेत. काही ठिकाणी जुने झालेले बंधारे तर काही ठिकाणी निकृष्ट बांधकामामुळे हे बंधारे निकामी झाले आहेत. याचा फटका अनेक गावांना आणि शेतकºयांना बसत असून पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीसाठी लागणाºया पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे.

पिंजाळ नदीवरील पाली येथील बंधाºयाच्या पाण्याचा अनेक गावांना पाणीपुरवठा केला जातो. तसेच या पाण्याच्या आधारे मोठ्या प्रमाणात शेतकºयांनी भाजीपाला लागवड केली आहे. मात्र, बंधाºयाला लागलेल्या गळतीमुळे बंधाºयातील पाणी काही दिवसांतच पूर्णपणे खाली होणार आहे. अजूनही पावसाळा येण्यासाठी पाच महिने बाकी आहेत. जर बंधाºयाची गळती थांबली नाही, तर बंधारा पूर्ण कोरडा पडून पाण्याअभावी लावलेला भाजीपाला जळून जाणार असून शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. आधीच संकटात असलेला बळीराजा पुन्हा संकटात सापडणार आहे. त्यामुळे प्रशासनाने आणि लघू पाटबंधारे विभागाने त्वरित लक्ष देऊन या बंधाºयाची दुरूस्ती करून होणारी पाण्याची गळती थांबवण्याची मागणी शेतकरी आणि नागरिक करत आहेत. पाली येथील पिंजाळ नदीवर असलेल्या कोल्हापुरी बंधाºयाला २८ दरवाजे असून ते पावसाळ्यानंतर लोखंडी प्लेट टाकून बंद केले जातात. मात्र, या सर्व दरवाज्यांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती राहते. या प्लेट रबराने बंद करावयाच्या असतात.पिंजाळ नदीवरील पाली येथील बंधाºयाच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात भाजीपाला लागवड केली आहे. मात्र बंधाºयाला लागलेल्या गळतीमुळे या बंधाºयातील पाणी पूर्णपणे खाली होणार आहे. या गळतीमुळे काही दिवसांतच बंधारा कोरडा पडेल. त्यामुळे आम्हा शेतकºयांसाठी पाण्याचे मोठे संकट निर्माण होणार आहे. प्रशासनाने लवकरात लवकर ही गळती थांबवावी आणि आम्हा शेतकºयांना दिलासा द्यावा. - सागर सालकर, शेतकरीया बंधाºयाचे गेट चांगल्या प्रकारे बसविण्यात आले होते. मात्र वाळूमाफिया हे बंद केलेले गेट उघडत असल्याने पाणी वाया जात आहे. याबाबत आम्ही तहसीलदार आणि पोलीस कार्यालयात लेखी पत्र दिले आहे. तसेच बंधाºयाच्या दुरूस्तीचे काम काढण्यात आले आहे. मात्र, ठेकेदाराने ते काम केलेले नाही. यंदा हे दुरुस्तीचे काम केले जाईल. - एम.आर.पाटील, लघु पाटबंधारे विभाग