शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पालघरची अ‍ॅकॅडमी मोदींनी गुजरातला पळविली

By admin | Updated: February 9, 2016 02:20 IST

सफाळे जवळील खार्डी येथील उभारण्यात येणाऱ्या कोस्टल पोलीस अ‍ॅकॅडमीसाठी आघाडी सरकारने केंद्र सरकारला विनामोबदला जमीन दिली. या अ‍ॅकॅडमीच्या स्थापनेमुळे परिसरात

पालघर : सफाळे जवळील खार्डी येथील उभारण्यात येणाऱ्या कोस्टल पोलीस अ‍ॅकॅडमीसाठी आघाडी सरकारने केंद्र सरकारला विनामोबदला जमीन दिली. या अ‍ॅकॅडमीच्या स्थापनेमुळे परिसरात विकासाचे जाळे निर्माण होणार असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही अ‍ॅकॅडमी आपल्या गुजरात राज्यात पळविली. यावेळीही आपले मुख्यमंत्री मात्र बघ्याची भूमिका घेत बसले, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पालघर येथील पत्रकार परिषदेत केला.पालघर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचार सभेसाठी आज माजी मुख्यमंत्री चव्हाण पालघर येथे आले होते. त्यावेळी केंद्रीय निरीक्षक बालाबच्चन, आ. भाई जगताप, राजेंद्र गावित, केदार काळे, जिल्हाध्यक्ष मनिष गणोरे, राष्ट्रवादीचे अनील गावड, इ. मान्यवर उपस्थित होते.पालघर जिल्हा निर्मिती ही खर्चीक बाब असताना व मोठा विरोध असताना माझे सहकारी माजी राज्यमंत्री राजेंद्र गावितांनी आदिवासी बहुल जिल्ह्याचा विकास होईल व अनेक विकासाच्या संधी निर्माण होतील हे मला त्यांनी पटवून दिले. त्यामुळे पालघर जिल्हा निर्मिती हा माझ्या कारकिर्दीतला एक महत्वाचा निर्णय असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. आघाडी सरकारच्या दरम्यान राज्यात भीषण दुष्काळ पडला असताना १० लाख जनावरांसाठी चारा छावण्यांची उभारणी करून, पाण्याचे नियोजन केले. परंतु आताचे सरकार गंभीर नसल्याचेही त्यांनी सांगितले. सरकार खंबीर नाही हे अधिकारी आमचे ऐकत नाहीत या मुख्यमंत्र्यांच्या विधानावरून दिसून येत असून त्यांचा सहकारी पक्ष शिवसेना सत्तेत किती दिवस राहील याबाबतही चव्हाणांनी संशय व्यक्त केला.

पालघर जिल्ह्यातील आदिवासी बहुल ग्रामीण भागातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने आघाडी सरकारने राजमाता जिजाऊ योजना, ग्रामबाल विकास केंद्रे इ. सुरू केली. मात्र आताच्या सरकारने त्या योजना बंद केल्या आहेत. आघाडी सरकारने नरेगा सारखी गरीबांच्या फायद्याची योजना सुरू केली. मात्र आल्या आल्या मोदींच्या सरकारने या योजनेवर टीका केली. परंतु कालांतराने ही योजना महत्वपूर्ण असल्याचे दिसून आल्यानंतर आता ती चालू ठेवणे आवश्यक असल्याचा साक्षात्कार सरकारला झाल्याचेही चव्हाणांनी यावेळी सांगितले. यावेळी पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील राहणाऱ्या गावितांना पुन्हा निवडून आणण्याची संधी मतदारांना मिळालेली असून या संधीचे सोने करावे, असेही शेवटी त्यांनी सांगितले.