शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पालघरची वाहतूककोंडी आजपासून फुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 00:48 IST

बेशिस्त वाहनचालक, विक्रेत्यांवर होणार कारवाई : बैठक नावापुरती ठरू नये अशी नागरिकांची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : पालघर शहराच्या मागील २५ वर्षांपासून कळीचा मुद्दा ठरलेल्या वाहतूककोंडीच्या सोडवणुकीसाठी शहरात गुरुवारपासून कडक अंमलबजावणी करण्याची घोषणा पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी केली आहे. मात्र, या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर मागील २० वर्षांपासून झालेल्या बैठकीप्रमाणेच ही बैठकही नावापुरती ठरू नये, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

पालघरमधील वाहतूककोंडीच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आतापर्यंत १२ ते १५ वेळा नगर परिषद, लोकप्रतिनिधी, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, एसटी विभाग, रिक्षा युनियन, व्यापारी संघटना आदींमध्ये बैठका पार पडल्यानंतर आजही हा प्रश्न सुटलेला नाही. वाढते नागरिकीकरण आणि जिल्हा निर्मितीनंतर शहरावर वाहनांचा वाढता भार यामुळे वाहतूककोंडीच्या प्रश्नाने गंभीर स्वरूप प्राप्त केले आहे. पालघर-माहीम रोड, पालघर-मनोर रोड या दोन रस्त्यांवर प्रचंड वाहतूककोंडी होत असून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन, सहा आसनी रिक्षा, मोटारसायकली, चायनीज-वडे विक्रेत्यांच्या हातगाड्या, भाजी विक्रेते, मासे विक्रेते आदींमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी बुधवारी पालघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे, नगराध्यक्षा डॉ. उज्ज्वला काळे, मुख्याधिकारी स्वा ठरणाऱ्या बाबींविरोधात कडक कारवाईला सुरुवात होणार असल्याची घोषणा पोलीस अधीक्षक शिंदे यांनी केली. 

रेल्वेस्थानकाजवळील पोलीस चौकी आणि हुतात्मा स्तंभ येथील विद्युतखांब काढून टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या असून कचेरी रस्त्याकडे जाणारी, देवीसहाय रस्त्याकडे जाणारी आणि कचेरी रस्त्यावरून माहीम रस्त्याकडे जाणारी वाहने टर्न फ्री करण्यात आली आहेत.  

१०० मीटर्स अंतरापर्यंत वाहनांच्या पार्किंगला बंदी माहीम व मनोर या प्रमुख मार्गांवर १०० मीटर्स अंतरापर्यंत वाहनांच्या पार्किंगला बंदी घालण्यात आली असून संपूर्ण परिसर ‘ना फेरीवाला क्षेत्र’ घोषित करण्यात आले आहे. इतर फळे, फुले, भाजीपाला विक्रीसही बंदी घालण्यात आली आहे. रस्त्यावर बसणाऱ्या फळ, भाजीपाला, मासे विक्रेत्यांना पूर्वेला अथवा कचेरी रोड, लोकमान्यनगर येथील मोकळ्या जागेत बसण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघर