शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
6
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
7
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
8
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
9
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
10
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
11
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
12
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
13
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
14
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
15
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
16
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
17
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
18
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
19
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
20
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे

पश्चिम रेल्वेकडून पालघर अद्यापही दुर्लक्षितच, राजकीय पक्ष पदाधिकारी, पत्रकारांचा रेल्वे प्रशासनाकडे जोरदार पाठपुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 01:34 IST

भारतीय रेल्वे परिपत्रकानुसार जिल्ह्याच्या स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देणे बंधनकारक असतांना पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून पालघर स्थानकाला दुजाभावाची वागणूक दिली जात आहे. त्यामुळे डहाणू-वैतरणा सेवाभावी संस्थेने सर्व राजकीय पक्ष पदाधिकारी, पत्रकार संघांना एकत्र घेऊन रेल्वे प्रशासनाकडे आपल्या मागण्यांचा जोरदार पाठपुरावा सुरू केला आहे.

पालघर : भारतीय रेल्वे परिपत्रकानुसार जिल्ह्याच्या स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देणे बंधनकारक असतांना पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून पालघर स्थानकाला दुजाभावाची वागणूक दिली जात आहे. त्यामुळे डहाणू-वैतरणा सेवाभावी संस्थेने सर्व राजकीय पक्ष पदाधिकारी, पत्रकार संघांना एकत्र घेऊन रेल्वे प्रशासनाकडे आपल्या मागण्यांचा जोरदार पाठपुरावा सुरू केला आहे.पालघर ला जिल्ह्याचा दर्जा मिळून जवळजवळ साडेतीन वर्षाचा कालावधी पूर्ण होत आला. पण रेल्वेच्या लेखी अजूनही पालघर दुर्लक्षीतच ठेवण्यात आले आहे. बाहेरगावी जाण्यासाठी आणि येण्यासाठी हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच लांबपल्ल्याच्या गाड्यांना ह्या स्थानकात थांबा आहे. विशेष म्हणजे मागच्या १४ वर्षात पालघरचे झपाट्याने नागरिकरण होऊन सुद्धा पश्चिम रेल्वेने एकाही लांब पल्ल्याच्या नव्या गाडीला पालघर स्थानकात थांबा दिलेला नाही. अगदी ह्याच धोरणावर बोट ठेऊन डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेने लांबपल्ल्याच्या काही गाड्यांना पालघर स्थानकात थांबा देण्याची मागणी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता ह्यांच्याकडे केली आहे.तसेच संस्थेच्या शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी डॉ. नवनाथ झरे यांची भेट घेत सखोल चर्चा केली. शिष्टमंडळाची विनंती मान्य करुन जिल्हाधिकारी डाँ. प्रशांत नारनवरे ह्यांनी अधिकृत रित्या पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्र लिहिले।तसेच सेनेचे नगराध्यक्ष तथा जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे,पालघर पंचायत समिती सभापती मनिषा पिंपळे ह्यांनीसुद्धा डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या मागणीला दुजोरा देऊन ही मागणी लवकरात लवकर पुर्ण करण्यासाठी रेल्वेशी पत्रव्यवहार केला आहे.तसेच पालघर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रमाकांत पाटिल ह्यांनी रेल्वेला लिहिलेल्या पत्रात संघटनेची मागणी रास्त असल्याचे आपल्या पत्रात नमूद केले आहे.महाराष्टÑ संपर्क क्रांतीला थांबा द्या !पालघरला रोज ४८, डहाणूला ५५ तर बोईसरला ६० गाड्यांना थांबा आहे. महाराष्ट्र संपर्क क्रांतीला महाराष्ट्रात बोरिवलीत थांबा असून ही गाडी दररोज १२ ते १५ मिनिटे केळवे अथवा पालघरला सायडिंगला असते.

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकल