शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
3
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
4
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
5
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
6
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
7
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
8
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
9
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
10
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
11
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
12
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
13
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
14
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
15
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
16
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
17
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
18
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
19
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
20
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त

पश्चिम रेल्वेकडून पालघर अद्यापही दुर्लक्षितच, राजकीय पक्ष पदाधिकारी, पत्रकारांचा रेल्वे प्रशासनाकडे जोरदार पाठपुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 01:34 IST

भारतीय रेल्वे परिपत्रकानुसार जिल्ह्याच्या स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देणे बंधनकारक असतांना पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून पालघर स्थानकाला दुजाभावाची वागणूक दिली जात आहे. त्यामुळे डहाणू-वैतरणा सेवाभावी संस्थेने सर्व राजकीय पक्ष पदाधिकारी, पत्रकार संघांना एकत्र घेऊन रेल्वे प्रशासनाकडे आपल्या मागण्यांचा जोरदार पाठपुरावा सुरू केला आहे.

पालघर : भारतीय रेल्वे परिपत्रकानुसार जिल्ह्याच्या स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देणे बंधनकारक असतांना पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून पालघर स्थानकाला दुजाभावाची वागणूक दिली जात आहे. त्यामुळे डहाणू-वैतरणा सेवाभावी संस्थेने सर्व राजकीय पक्ष पदाधिकारी, पत्रकार संघांना एकत्र घेऊन रेल्वे प्रशासनाकडे आपल्या मागण्यांचा जोरदार पाठपुरावा सुरू केला आहे.पालघर ला जिल्ह्याचा दर्जा मिळून जवळजवळ साडेतीन वर्षाचा कालावधी पूर्ण होत आला. पण रेल्वेच्या लेखी अजूनही पालघर दुर्लक्षीतच ठेवण्यात आले आहे. बाहेरगावी जाण्यासाठी आणि येण्यासाठी हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच लांबपल्ल्याच्या गाड्यांना ह्या स्थानकात थांबा आहे. विशेष म्हणजे मागच्या १४ वर्षात पालघरचे झपाट्याने नागरिकरण होऊन सुद्धा पश्चिम रेल्वेने एकाही लांब पल्ल्याच्या नव्या गाडीला पालघर स्थानकात थांबा दिलेला नाही. अगदी ह्याच धोरणावर बोट ठेऊन डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेने लांबपल्ल्याच्या काही गाड्यांना पालघर स्थानकात थांबा देण्याची मागणी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता ह्यांच्याकडे केली आहे.तसेच संस्थेच्या शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी डॉ. नवनाथ झरे यांची भेट घेत सखोल चर्चा केली. शिष्टमंडळाची विनंती मान्य करुन जिल्हाधिकारी डाँ. प्रशांत नारनवरे ह्यांनी अधिकृत रित्या पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्र लिहिले।तसेच सेनेचे नगराध्यक्ष तथा जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे,पालघर पंचायत समिती सभापती मनिषा पिंपळे ह्यांनीसुद्धा डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या मागणीला दुजोरा देऊन ही मागणी लवकरात लवकर पुर्ण करण्यासाठी रेल्वेशी पत्रव्यवहार केला आहे.तसेच पालघर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रमाकांत पाटिल ह्यांनी रेल्वेला लिहिलेल्या पत्रात संघटनेची मागणी रास्त असल्याचे आपल्या पत्रात नमूद केले आहे.महाराष्टÑ संपर्क क्रांतीला थांबा द्या !पालघरला रोज ४८, डहाणूला ५५ तर बोईसरला ६० गाड्यांना थांबा आहे. महाराष्ट्र संपर्क क्रांतीला महाराष्ट्रात बोरिवलीत थांबा असून ही गाडी दररोज १२ ते १५ मिनिटे केळवे अथवा पालघरला सायडिंगला असते.

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकल