शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

हुतात्मा वंदनेसाठी आज पालघर उत्स्फूर्त बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 02:47 IST

इंग्रजांविरोधातील चलेजाव चळवळीत सहभागी झालेल्या व हौतात्म्य प्राप्त झालेल्या तालुक्यातील ५ हुतात्म्यांना मंगळवारी (१४ आॅगस्ट) श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तालुक्यातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार आहेत.

- हितेंन नाईकपालघर : इंग्रजांविरोधातील चलेजाव चळवळीत सहभागी झालेल्या व हौतात्म्य प्राप्त झालेल्या तालुक्यातील ५ हुतात्म्यांना मंगळवारी (१४ आॅगस्ट) श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तालुक्यातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार असून संपूर्ण पालघर शहरातील व्यवहार उत्स्फूर्तपणे बंद ठेवले जाणार आहेत.७ आॅगस्ट १९४२ रोजी मुंबईत भरलेल्या काँग्रेसच्या महाअधिवेशनात इंग्रजांविरोधातील चलेजाव चळवळीला सुरु वात करण्यात आली. देशभरातून ‘करेंगे या मरेंग’ ह्या निर्धाराने जिल्ह्यातील देशबांधव मोठ्या संख्येने तिच्यात सहभागी झाले होते. पालघर मध्येही १४ आॅगस्ट रोजी कचेरीवर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सहभागी होण्यासाठी तालुक्यातील सातपाटी, शिरगाव, धनसार, अल्याळी, खारेकुरण, मुरबे, नवापूर, पामटेम्भी, पोफरण, आलेवाडी, उनभाट, आदी भागातून हजारो देशभक्त सहभागी झाले होते.देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या उत्स्फूर्त प्रेरणेने भारावलेले हे स्वयंसेवक इंग्रजांनो चालते व्हा, अशा घोषणा देत कचेरीच्या दिशेने हळूहळू कूच करीत होते.मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असल्याने वातावरण तंग होते. अशावेळी इंग्रजांनी मोर्चा वर लाठीमार करायला सुरुवात केली. त्यामुळे नांदगावच्या सेवादलाचे प्रमुख गोविंद गणेश ठाकूर ह्यांनी वंदे मातरमची घोषणा देत तिरंगा फडकवीत कचेरीवर चाल केली. ह्यावेळी इंग्रज अधिकाऱ्याने जवळून केलेल्या गोळीबारात ह्या १७ वर्षीय देशभक्ताला हौतात्म्य प्राप्त झाले. हया दरम्यान सातपाटीचे काशीनाथभाई पागधरे, पालघरचे राम प्रसाद तेवारी, मुरब्याचे रामचंद्र चुरी, तर सालवडचे सुकुर मोरे ह्यां ५ देशभक्तांनाही हौतात्म्य प्राप्त झाल.ह्या ५ ही हुतात्म्यांना १४ आॅगस्ट १९४४ पासून १४ आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजता हुतात्मा स्मारक ते हुतात्मा स्तंभा पर्यंत मूक मिरवणूक काढली जाते. १२ वाजून ३९ मिनिटांनी शालेय विद्यार्थ्यांकडून देशभक्तीपर गीत गाऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात येते. 

टॅग्स :palgharपालघरnewsबातम्या